शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: July 18, 2015 00:15 IST

महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले.

मुंबई : महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. तसेच दमणगंगा-पिंजाड नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचे पाणी बाहेर सोडले गेले होते, ते आम्ही परत आणले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला जाणार नाही. विरोधकांनी राजकारण करू नये. विरोधकांची मते जाणून याप्रकरणी राज्य सरकार विचार करेल आणि यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार या नद्यांचे पाणी गुजरातला वळविणयाबाबतचे वृत्त खोटे असून नर्मदा जोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प केंद्र सरकार मान्यता देणार आहे. कारण केंद्रीय जलसंधारण मंत्र्यांच्या अध्यक्शतेखाली मे २०१५ मध्ये नदीजोड प्रकल्पासाठीच्या विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नादीजोड प्रकल्प राबून मुंबईस पाणी द्यावे. तसेच दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार नर्मदा हे नदीजोड प्रकल्पासाठी २ हजार ६७५ कोटी रूपयांचा निधी खर्च होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नार-पार-तापी नर्मदा खोर्यातील सर्वसाधारण २०० मीटर उंचीच्या टप्प्यातील आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नदीजोड योजनांद्वारो गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर उर्वरित उपलब्ध पाण्यापैकी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील जास्तीत जास्त पाणी बोगद्याद्वारे वळवून महाराष्ट्रात कसे वापरात आणता येईल, याप्रकरणीचा अभ्यास राष्ट्रीय जलविकास अभिकरण यांनी करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील नार-पार योजनेंतर्गत नर्मदा नदीतून महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ७५ टक्के पाणी मुंबईसाठी वापरण्यात येणार असून वैतरणातून मुंबईला दिले जाणारे पाणी गोदावरीला दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)