शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: July 18, 2015 00:15 IST

महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले.

मुंबई : महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. तसेच दमणगंगा-पिंजाड नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचे पाणी बाहेर सोडले गेले होते, ते आम्ही परत आणले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला जाणार नाही. विरोधकांनी राजकारण करू नये. विरोधकांची मते जाणून याप्रकरणी राज्य सरकार विचार करेल आणि यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार या नद्यांचे पाणी गुजरातला वळविणयाबाबतचे वृत्त खोटे असून नर्मदा जोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प केंद्र सरकार मान्यता देणार आहे. कारण केंद्रीय जलसंधारण मंत्र्यांच्या अध्यक्शतेखाली मे २०१५ मध्ये नदीजोड प्रकल्पासाठीच्या विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नादीजोड प्रकल्प राबून मुंबईस पाणी द्यावे. तसेच दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार नर्मदा हे नदीजोड प्रकल्पासाठी २ हजार ६७५ कोटी रूपयांचा निधी खर्च होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नार-पार-तापी नर्मदा खोर्यातील सर्वसाधारण २०० मीटर उंचीच्या टप्प्यातील आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नदीजोड योजनांद्वारो गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर उर्वरित उपलब्ध पाण्यापैकी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील जास्तीत जास्त पाणी बोगद्याद्वारे वळवून महाराष्ट्रात कसे वापरात आणता येईल, याप्रकरणीचा अभ्यास राष्ट्रीय जलविकास अभिकरण यांनी करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील नार-पार योजनेंतर्गत नर्मदा नदीतून महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ७५ टक्के पाणी मुंबईसाठी वापरण्यात येणार असून वैतरणातून मुंबईला दिले जाणारे पाणी गोदावरीला दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)