ऑनलाइन टीम-
मुंबई, दि. १ - छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत उद्धव ठाकरेंनी सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार केला. तसेच अनिल परब आणि आदेश बांदेकर यांनाही पुष्पगुच्छ देत त्यांच्या सहयोगाचे आभार मानले. त्याचप्रमाणे सदा सरणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर, नेहमीच्याच शैलीत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरवात केली. विजयाचे शिल्पकार जनता आहे असं ठाकरे यांनी म्हटलं. सर्वांनी आपली जबाबदारी निकराने पूर्ण केली असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. तसेच युवासेनेच्या कार्यचीही दखल घेतली. वियजाच्या जल्लोषाकरता आपण जमलो आहोत. तसेच आपला आवाज बुलंद करण्यासाठी आपले खासदार दिल्लीला गेले आहेत. मुंबई जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे आश्वासन दिले. तसेच, सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले. दिल्ली जिंकली आता महाराष्ट्र जिंकायचा आहे. ही तर विजयाची सुरवात आहे, असं म्हणत महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं राज्य करण्याचीही घोषणा केली. अनंत गितेंपासून विजयी उमेदवारांच्या सत्काराची सुरवात करत चंद्रकांत खैरे - औरंगाबाद, बुलढाणा - प्रतापराव जाधव, अमरावती- आनंदराव अडसुळ, यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी ठाण्याचे राजन विचारे मुंबई उत्तर पश्चिम गजानन किर्तीकर मावळचे खासदार श्रीरंग बारणे रत्नागिरी - विनायक राऊत, रामटेक - विनायक तुमाने परभणी संजय जाधव नाशिक हेमंत गोडसे शिर्डी लोखंडे शिरुर शिवाजीराव अढळराव पाटील, रविंद्र गायकवाड दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य चे खासदार राहूल शेवाळे इ.चा पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.