शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

१ मेपर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:33 IST

एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, लोक सहभागाशिवाय प्लास्टिक बंदीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. यासाठी लोकांनीही प्लास्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहीजे, अशी भावना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत व्यक्त केली. येत्या १ मे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्ष होत आहेत. तोपर्यंत एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यात २०१८ साली प्लास्टिक व थर्माकॉल बंदीचा कायदा करण्यात आला. मात्र, तरीही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. काही सदस्यांनी जाड प्लास्टिक पिशव्यांना परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, प्लास्टिक पिशव्यांमुळे कचरा आणि नाले तुंबण्याच्या समस्या निर्माण होत असल्याने अशी परवानगी देता येणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.पीओपी मृर्तींवर बंदी नाहीराष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पीओपी मूर्तींवर बंदी आणणार का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर, हा प्रश्न भावनेशी निगडित असल्याने इतक्या लवकर बंदी आणता येणार नाही. मात्र गणपती सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे मखर बंद करण्यात सरकारला यश आले आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.पाण्याच्या बाटल्यांना सूटप्लास्टिक बंदीतून पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या वगळण्यात आले आहे. या बाटल्यांचा पुर्नवापर करता येतो. तसेच त्याला अद्याप पर्याय निर्माण झाला नसल्याने त्या आताच बंद करता येणार नाही असेही, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी