शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

१ मेपर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:33 IST

एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, लोक सहभागाशिवाय प्लास्टिक बंदीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. यासाठी लोकांनीही प्लास्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहीजे, अशी भावना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत व्यक्त केली. येत्या १ मे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्ष होत आहेत. तोपर्यंत एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यात २०१८ साली प्लास्टिक व थर्माकॉल बंदीचा कायदा करण्यात आला. मात्र, तरीही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. काही सदस्यांनी जाड प्लास्टिक पिशव्यांना परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, प्लास्टिक पिशव्यांमुळे कचरा आणि नाले तुंबण्याच्या समस्या निर्माण होत असल्याने अशी परवानगी देता येणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.पीओपी मृर्तींवर बंदी नाहीराष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पीओपी मूर्तींवर बंदी आणणार का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर, हा प्रश्न भावनेशी निगडित असल्याने इतक्या लवकर बंदी आणता येणार नाही. मात्र गणपती सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे मखर बंद करण्यात सरकारला यश आले आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.पाण्याच्या बाटल्यांना सूटप्लास्टिक बंदीतून पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या वगळण्यात आले आहे. या बाटल्यांचा पुर्नवापर करता येतो. तसेच त्याला अद्याप पर्याय निर्माण झाला नसल्याने त्या आताच बंद करता येणार नाही असेही, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी