शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

१ मेपर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:33 IST

एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, लोक सहभागाशिवाय प्लास्टिक बंदीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. यासाठी लोकांनीही प्लास्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहीजे, अशी भावना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत व्यक्त केली. येत्या १ मे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्ष होत आहेत. तोपर्यंत एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यात २०१८ साली प्लास्टिक व थर्माकॉल बंदीचा कायदा करण्यात आला. मात्र, तरीही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. काही सदस्यांनी जाड प्लास्टिक पिशव्यांना परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, प्लास्टिक पिशव्यांमुळे कचरा आणि नाले तुंबण्याच्या समस्या निर्माण होत असल्याने अशी परवानगी देता येणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.पीओपी मृर्तींवर बंदी नाहीराष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पीओपी मूर्तींवर बंदी आणणार का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर, हा प्रश्न भावनेशी निगडित असल्याने इतक्या लवकर बंदी आणता येणार नाही. मात्र गणपती सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे मखर बंद करण्यात सरकारला यश आले आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.पाण्याच्या बाटल्यांना सूटप्लास्टिक बंदीतून पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या वगळण्यात आले आहे. या बाटल्यांचा पुर्नवापर करता येतो. तसेच त्याला अद्याप पर्याय निर्माण झाला नसल्याने त्या आताच बंद करता येणार नाही असेही, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी