शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

द्राक्ष, आंबा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल; देशातून ५८ हजार कोटींची शेतमाल निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 08:27 IST

देशातील शेतमाल परदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा सर्वाधिक वापर महाराष्ट्राने केला. आतापर्यंत या यंत्रणेला राज्यातील ८० हजार शेतकरी कृषी विभागाने जोडले आहेत.

- राजू इनामदारपुणे : कोरोनाकाळात म्हणजे  एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात भारतातून ५८ हजार ७६ कोटींची  फळफळाव व शेतमालाची निर्यात झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचा १३ हजार ८७७ कोटींचा असून, द्राक्ष आणि आंबा निर्यातीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील शेतमाल परदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा सर्वाधिक वापर महाराष्ट्राने केला. आतापर्यंत या यंत्रणेला राज्यातील ८० हजार शेतकरी कृषी विभागाने जोडले आहेत. राज्यानेही स्वतंत्र निर्यात कक्ष तयार केला आहे.  फळे व भाजीपाल्यांसाठी ४५ प्रकारच्या संगणकीय यंत्रणा तयार आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना निर्यातक्षम माल तयार करण्यापासून ते परदेशी बाजारपेठ शोधण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत केली जाते. या माध्यमातूनच कोरोनाकाळात राज्याने २ हजार २५० कोटींची द्राक्ष निर्यात केली. देशाची द्राक्षांची एकूण निर्यात २ हजार २९०  कोटी रुपयांची आहे. राज्याचा त्यातला वाटा ९८.२५ टक्के आहे. केळी आणि आंबा निर्यातीतही महाराष्ट्र आघाडीवर असून अनुक्रमे ४५५ व १९२ कोटींची निर्यात झाली आहे. देशात या दोन्ही फळांमध्ये राज्याचा वाटा अनुक्रमे ७३.८६ व ८९.७२ टक्के आहे.  निर्यात कक्षातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फळं व भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्राला मोठा वाव आहे. द्राक्ष वगैरेसाठी प्लॉटची नोंदणी करून मागणी करणारे देश सांगतील त्याप्रमाणेच, त्याच औषधांची फवारणी करावी लागते. या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी सवयीच्या करून घेतल्या, तर महाराष्ट्राला शेतमाल निर्यातीत अजून भरपूर वाव आहे. आमचा तोच प्रयत्न आहे-गोविंद हांडे, राज्य सल्लागार, निर्यात कक्ष

टॅग्स :Mangoआंबा