शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 14:02 IST

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण राजकी वर्तुळाला नारायण राणे पुढे काय राजकीय भूमिका घेतात याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राणेंनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण राजकी वर्तुळाला नारायण राणे पुढे काय राजकीय भूमिका घेतात याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राणेंनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असून, राणेंनी आपल्या नव्या पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे जाहीर केले आहे. नव्या राजकीय पक्षाची घोषणा करताना राणे म्हणाले, "माझा नवा पक्ष राज्यघटनेवर अविचल निष्ठा ठेवून, घटनेच्या चौकटीत राहून राज्याच्या विकासासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करणार. पक्षाचे चिन्ह, झेंडा लवकर घोषित करू. नोंदणीही लवकरच करू. शिवसेना, काँग्रेस तसेच सत्तेतील अनुभवातून राज्याचा विकास करण्यात आमचा पक्ष नक्कीच यशस्वी होईल. सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीच राजकारण करू. दिला शब्द पाळू हेच आमचं ब्रीद वाक्य असेल." यावेळी नारायण राणे यांनी रालोआत जाण्याबाबत मात्र सस्पेन्स कायम ठेवला. "रालोआत जाणार का, याच उत्तर पक्ष स्थापनेनंतर ठरवू. आज दुकान उघडणार असे सांगितले आहे. उघडल्यावर बघू कोण कोण येतो. शिवसेना नंबर एकचा विरोधक असेल. सैनिक नव्हे तर उद्धव यांना विरोध. चांगल्याला चांगल म्हणण्याची नियत त्यांच्यात नाही," असा टोलाही नारायण राणेंनी लगावला. नारायण राणेंनी सुरुवातीलाच शिवसेनेवर जोरदार टीका केली, "दसरा मेळाव्याकडे पत्रकार आणि जनतेच लक्ष होतं. शिवसेना सत्तेत की सत्तेबाहेर अशी चर्चा होती. मी आधीही सांगितले होत की, हाकलल्याशिवाय शिवसेना सत्तेबाहेर पडणार नाही. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान,  शरद पवार आदींवर टीका केली. उद्धव यांच कतृत्व काय? नोटाबंदी म्हणजे देशद्रोह म्हणणा-या ठाकरे यांच्या केंद्रातील मंत्र्यांनी लोकसभेत किंवा कॅबिनेटमध्ये साधी नोट अथवा निषेध नोंदविला नाही."   नोटाबंदी, महागाई यावरून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेचे मंत्री अभ्यासपूर्ण मुद्दे कधी मांडतात का, "असा सवालही त्यांनी केला."नोटबंदी, दरवाढ, महागाई, शेतकरी कर्जमाफी आदी विषयात शिवसेनेच्या मंत्री नेत्यांनी कधी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले का? कधीच नाही. सत्तेत मंत्रिमंडळात भांडण्याशिवाय कधीच काही केले नाही. लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येतो म्हणता मग सत्तेत का गेलात. महागाई विरोधात ओरड करणाऱ्या मुंबई महापालिकेने प्रचंड कर लावले. त्यामुळे आज लोकांना इथे घर घेता येत नाही. महापालिकेचे कर आणि महागाईवर बोलतात. भ्रष्टाचारविरोधात बोलणारे ठाकरे महापालिकेच्या भ्रष्टाचारावर चकार शब्द काढत नाही. टक्केवारी घेणा-यांना भ्रष्टाचारावर बोलायचा अधिकार नाही. शिवसेनेतील निष्ठावंत, काम करणाऱ्यांना पद, उमेदवारी मिळत नाहीत. पैसे घेऊन तिकटे विकले जातात. हिंमत असेल तर हा आरोप नाकारून दाखवावा." असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला,"मराठी माणसाने मनाची श्रीमंती ठेवा तर एक दिवस श्रीमंती पाहाल, असे बाळासाहेब एका सभेत म्हणाले. पण उद्धव कुजक्या मनाचा. चांगल त्यांना बघवत नाही. केवळ टीका करतात. पंतप्रधानांवर टीका करण्यासारखं त्यांनी काय केले, सर्वकाही बाळासाहेबांच्या कृपेवर आहे. आयत्या बिळावरचा नागोबा."(लोकमतने 29 सप्टेंबरलाच दिले होते नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाच्या नावाचे  वृत्त)

यावेळी राजकीय पक्षाविषयी बोलताना ते म्हणाले, "सत्तेत असेन तर सत्तधारी आणि विरोधात असेन तर विरोधकांचीच भूमिका बजावेन. दोन्ही भूमिका एकाचवेळी बजावणार नाही. मला वाटलं म्हणून पक्ष काढला. सर्वांनी प्रवेशाबाबत बोलणी होत होती.  भाजपासोबत जाण्यात शिवसेनॆची अडचण नव्हती. पदासाठी वगैरे पक्ष काढला. काँग्रेसने सीएमचा आश्वासन दिले म्हणून त्यांना विरोध केला."

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे