शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणा-या दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 06:16 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाते. मंडळाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाते. मंडळाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येईल. हे वेळापत्रकच अंतिम असेल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरला सुरू झाली होती. यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून ठेवावी, असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले होते.

दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्जामध्ये या वर्षी काही बदल करण्यात आले होते. या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला होता. हा अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही, तसेच वेळेत काम पूर्ण होईल, यासाठी आधीच माहिती संकलित करणे आवश्यक होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाचे अचूक स्पेलिंग, जन्मदिनांक, आईचे नाव, जन्मस्थळ, विद्यार्थ्यांनी परीक्षेला घ्यायचे विषय व माध्यम, विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक, विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व सही स्कॅन करून ठेवणे, तसेच अर्ज भरताना विद्यार्थी कला, चित्रकला, लोककला व क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठी अर्ज करणार आहे किंवा नाही, याबाबत उल्लेख करणे, या सर्व बाबींचे माहिती संकलित करणे आवश्यक आहे, असे आवाहन पाटील यांनी केले होते.