शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Maharashtra SSC Results 2018 : राज्यातील १२५ विद्यार्थांचे शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:11 IST

बेस्ट आॅफ फाइव्ह पध्दतीने राज्यातील १२५ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळविण्यात यश आले आहे. 

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च/एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. बेस्ट आॅफ फाइव्ह पध्दतीने राज्यातील १२५ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळविण्यात यश आले आहे. दहावीच्या निकाला मध्ये लातूर पॅटर्नला पुन्हा चांगले यश मिळाले आहे. शंभर टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभागातील सर्वाधिक ७० विद्यार्थी असून त्यापाठोपाठ औरंगाबादमधील २३, कोल्हापूर ११, पुण्यामधील ४, अमरावती ६, कोकण ४, नागपूर २, नाशिक १ विद्यार्थी आहे. राज्यातील एकूण १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.  दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात अव्वल राहण्याची परंपरा मुलींनी कायम राखली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.९७ तर मुलांची ८७.२७ इतकी आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४.७० टक्क्यांनी जास्त आहे.

राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दहावीचा निकाल जाहीर केला. राज्यातून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी (८९.४१ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.  मागील वर्षी दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला होता, त्यातुलनेत यंदाच्या निकालात ०.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६ टक्के इतका लागला आहे तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ८५. ९७ टक्के इतका लागला आहे. मुंबई ९०.४१, कोकण ९६, पुणे ९२.०८, नाशिक ८७.८२, नागपूर  ८५.९७, कोल्हापूर ९३.८८, अमरावती ८६.४९, औरंगाबाद ८८.८१, लातूर ८६.३० अशी विभागनिहाय निकालाची टक्केवारी आहे. राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६.८७ टक्के इतका लागला आहे.

मागील वर्षी १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते, यंदा १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळविण्यात यश मिळाले आहे. कला व क्रीडाच्या अतिरिक्त २५ गुणांच्या जोरावर १०० टक्के गुण मिळविण्यात विद्यार्थ्यांना यश मिळते आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या ६३ हजार ३३१ इतकी आहे. तर ३५ ते ४५ टक्क्यांदरम्यान गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९९ हजार २६२ इतकी आहे. ४ लाख ३ हजार १३७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ५ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत कॉपीचे गैरप्रकार करणाºया ६६१ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मंडळाकडून एकूण ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती, त्यापैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८