शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्हिपवरून संभ्रम, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवरून पेच, महाराष्ट्र विधानसभेचं निवडणूक आयोगाला पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:47 IST

Maharashtra Rajya Sabha Election 2024: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्याच्या अखेरीस राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून या निवडणुकीसाटी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचदरम्यान, राज्यातील दोन पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे या निवडणुकीत व्हिप कुणाचा चालणार, या पक्षांच्या आमदारांना मतदान कुणाला करावे लागणार याबाबतचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेने निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून महत्त्वपूर्ण माहिती मागवली आहे. 

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्याच्या अखेरीस राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सध्याच्या समिकरणांनुसार भाजपाला ३, तर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक खासदार निवडून येऊ शकतो. मात्र भाजपाने येथे चौथा उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. तपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे मतदानावेळी नेमका व्हिप कुणाचा चालणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच त्याबाबत स्पष्टता यावी यासाठी राज्य विधानसभेने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.   

२०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर काही दिवसांनी शिवसेनेत फूट पडली होती. तर गतवर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने अनुक्रमे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना खरे पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तर सभागृहामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना वेगळे गट म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या आमदारांना कुणाचा व्हिप लागू होईल याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे राज्य विधानसभेच्या सचिवालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राज्यसभा निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया कशी असेल, कुणाचा व्हिप ग्राह्य धरला जाईल, व्हिपचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होईल, याबाबतची माहिती मागवली आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाVidhan Bhavanविधान भवनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग