शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

नवा पेच! निलंबनाची नोटीस असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी कसा?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:24 IST

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात असा आरोप शिवसेनेने केला आहे.

मुंबई - राज्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपानं शिंदे गटाच्या ५० आमदारांना पाठिंबा देत राज्यात बंडखोरांचे सरकार स्थापन केले. गुरुवारी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. परंतु आता शिंदे सरकारसमोर नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला कसा? असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला आहे. 

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं हीच मागणी उद्धव ठाकरे करत होते. मात्र भाजपाने अडीच वर्षापूर्वी ते केले नाही. मात्र आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात. शपथविधीला सर्वात मोठ्या पक्षाला बोलवलं जातं. मग एकनाथ शिंदेंना काय म्हणून बोलावलं. निलंबनाची नोटीस असताना शपथविधी कसा झाला? अपात्रतेची कारवाई होण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका आहे. ११ जुलैला सुनावणी होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

त्याचसोबत मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यानंतर दिल्लीवरून फोन आल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाच्या आदेशाचा मान देवेंद्र फडणवीसांनी राखला पण हीच पक्षशिस्त एकनाथ शिंदे यांच्यात कुठे आहे? असं सांगत अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. 

...त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन होतेय एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याचा आनंद सगळ्या शिवसैनिकांना आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आजूबाजूचे लोक चुकीचं मार्गदर्शन करतात. शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय ते स्वीकारलं पाहिजे. परंतु कुठेतरी अडवायचं त्यासाठी केले जातेय. परंतु यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलीन होतेय. उद्धव ठाकरेंच्या स्वभावाबाबत नाराजी नाही. परंतु दुसऱ्याबाजूला मृतदेह येतील, घाण, डुकरं बोलले गेले. एकीकडे गटनेतेपदावरून काढायचं, आमच्याविरोधात आक्षेपार्ह बोलायचं हे कोण ऐकून घेईल असा सवाल शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी विचारला आहे. 

तसेच कायदेशीर लढाईला आम्ही पूर्णपणे तयार आहोत. परंतु आता हे वाद संपले पाहिजेत. महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम झाले पाहिजे. तुम्ही विकासाच्या गोष्टी कुठे करतायेत. सत्तास्थापन झाली आता भांडणं संपवली पाहिजे. मतभेद विसरून राज्याचा विकास करायला हवा असंही शिरसाट यांनी सांगितले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस