शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नवा पेच! निलंबनाची नोटीस असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी कसा?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:24 IST

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात असा आरोप शिवसेनेने केला आहे.

मुंबई - राज्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपानं शिंदे गटाच्या ५० आमदारांना पाठिंबा देत राज्यात बंडखोरांचे सरकार स्थापन केले. गुरुवारी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. परंतु आता शिंदे सरकारसमोर नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला कसा? असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला आहे. 

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं हीच मागणी उद्धव ठाकरे करत होते. मात्र भाजपाने अडीच वर्षापूर्वी ते केले नाही. मात्र आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात. शपथविधीला सर्वात मोठ्या पक्षाला बोलवलं जातं. मग एकनाथ शिंदेंना काय म्हणून बोलावलं. निलंबनाची नोटीस असताना शपथविधी कसा झाला? अपात्रतेची कारवाई होण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका आहे. ११ जुलैला सुनावणी होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

त्याचसोबत मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यानंतर दिल्लीवरून फोन आल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाच्या आदेशाचा मान देवेंद्र फडणवीसांनी राखला पण हीच पक्षशिस्त एकनाथ शिंदे यांच्यात कुठे आहे? असं सांगत अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. 

...त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन होतेय एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याचा आनंद सगळ्या शिवसैनिकांना आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आजूबाजूचे लोक चुकीचं मार्गदर्शन करतात. शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय ते स्वीकारलं पाहिजे. परंतु कुठेतरी अडवायचं त्यासाठी केले जातेय. परंतु यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलीन होतेय. उद्धव ठाकरेंच्या स्वभावाबाबत नाराजी नाही. परंतु दुसऱ्याबाजूला मृतदेह येतील, घाण, डुकरं बोलले गेले. एकीकडे गटनेतेपदावरून काढायचं, आमच्याविरोधात आक्षेपार्ह बोलायचं हे कोण ऐकून घेईल असा सवाल शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी विचारला आहे. 

तसेच कायदेशीर लढाईला आम्ही पूर्णपणे तयार आहोत. परंतु आता हे वाद संपले पाहिजेत. महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम झाले पाहिजे. तुम्ही विकासाच्या गोष्टी कुठे करतायेत. सत्तास्थापन झाली आता भांडणं संपवली पाहिजे. मतभेद विसरून राज्याचा विकास करायला हवा असंही शिरसाट यांनी सांगितले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस