शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Maharashtra Political Crisis: बच्चू कडू उद्या मुंबईत येण्याची शक्यता; शिंदे गट अपक्षांना राज्यपालांच्या भेटीला पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:00 IST

Maharashtra Political Crisis: या आमदारांच्या संरक्षणासाठी तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना तैनात केले जाईल. 

एकीकडे मविआ सरकार संकटात आलेले असताना मंत्रिमंडळ बैठकांमध्ये लोकहिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मविआ सरकार निवडणुकीची तयारी करत आहे. असे असताना तिकडे शिंदे गट मविआ सरकारला सुरुंग लावण्याची तयारी करत आहे. अशातच शिंदे गटाचे काही आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

आषाढी अमावास्येमुळे शिंदे गटाने राज्यपालांना भेटण्याचे पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला चर्चेला मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तर शिंदे यांनी एका दिवसाची मुदत देत, ठाकरेंनी निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. यामुळे अमावास्या संपली की उद्या बच्चू कडू १० बंडखोर आमदारांना घेऊन मुंबईत येणार असून राज्यपालांना भेटतील असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. मराठी वृत्त वाहिन्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

कडू हे राज्यपालांना ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे पत्र देतील. या पत्रावर शिवसेनेच्या गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांची सही असणार आहे. पत्र तयार आहे, रात्रीपर्यंत सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या जातील. या आमदारांमध्ये शिवसेना नाही तर अपक्ष आमदार अधिक असण्याची शक्यता आहे. तसे सूतोवाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. शिवसेना आमदारांपेक्षा अपक्ष आमदारच पुढे होऊन राज्यपालांना ठाकरे सरकारविरोधात पत्र देतील, असे ते म्हणाले होते. 

या आमदारांच्या संरक्षणासाठी तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना तैनात केले जाईल. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBacchu Kaduबच्चू कडूShiv Senaशिवसेना