शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

राज्यात अभियांत्रिकी पदविका बंद करणार नाही

By admin | Updated: March 31, 2015 02:28 IST

राज्यात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदमार्फत सुरू असलेली अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची महाविद्यालये बंद करण्याचा कोणताही मानस न

मुांई : राज्यात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदमार्फत सुरू असलेली अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची महाविद्यालये बंद करण्याचा कोणताही मानस नसल्याचा खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केला. मात्र ही महाविद्यालये परिणामकारक असायला हवीत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. सतीश चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेच्या उत्तरादाखल तावडे बोलत होते. यासंदर्भात एका महाविद्यालयातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मी प्रश्न विचारला की, डिप्लोमा झाल्यावर काय करणार? तेव्हा ९० टक्के मुलांनी पुढे अभियांत्रिकी पदवी घेणार असल्याचे सांगितले. पदविका शिक्षणाचा हेतू उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे हा आहे. जर पदविकेनंतर मुले पदवीला जाणार असतील तर पदविका हवी का, त्यासाठी अभ्यासक्रमात काही बदल करण्याची गरज आहे का, याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी निर्णय घ्यायला हवा. जी महाविद्यालये आहेत, ती परिणामकारक असली पाहिजेत, अशी भूमिका त्या कार्यक्रमात मांडली. यात पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचा कोणता विषय नव्हता, असे तावडे यांनी स्पष्ट केले. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केल्यास केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे पदवी अभ्यासक्रमाला थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. या महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता देण्यात येते, तर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्याकडून संलग्नता देण्यात येते. मात्र राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम बंद करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आला नसून, यासाठी सरकारने ही महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला नसल्याचेही तावडे यांनी सांगितले.