शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : म्हणून विधानसभा निवडणुकीत झाली महायुतीची पिछेहाट

By बाळकृष्ण परब | Updated: October 24, 2019 22:52 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज जाहीर झालेला निकाल अनेकांना धक्का देणारा ठरला.

 - बाळकृष्ण परब महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज जाहीर झालेला निकाल अनेकांना धक्का देणारा ठरला. राज्यात आणि केंद्रास सत्तेवर असलेल्या भाजपाच्या महत्वाकांक्षेला या निकालांनी जोरदार धक्का दिला. तर मतदारांनी अनपेक्षित साथ देऊन जागांचे भरभरून दान पदरात टाकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला या निकालांनी सुखद धक्का दिला आहे. आता शिवसेना आणि भाजपा महायुतीचा विचार करावयाचा झाल्यास लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बंपर यशानंतर भाजपाला राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पडू लागले होते. मात्र अखेरच्या क्षणी शिवसेनेशी युती केल्यानंतरही भाजपाचे नेते २२० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा छातीठोकपणे करत होते. पण प्रत्यक्ष निकालांनंतर महायुतीच्या नेत्यांचा हा दावा सपशेल फोल ठरला आहे. गतवेळी स्वतंत्रपणे लढून १८५ जागा जिंकणाऱ्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत २२७ जागांवर मुसंडी मारणाऱ्या महायुतीला आजच्या निकालांत केवळ १६० जागांपर्यंतच मजल मारता आली. समोर विस्कळीत विरोधी पक्ष असताना एकत्र लढूनही भाजपा आणि शिवसेना महायुतीच्या झालेल्या या पिछेहाटीची अनेक कारणे आहेत. अतिआत्मविश्वास महायुतीच्या पिछेहाटीचे सर्वात मोठे कारण म्हणजे दोन्ही पक्षांचा अतिआत्मविश्वास. गेली पाच वर्षे राज्यात निर्विवाद सत्ता राबवल्याने तसेच लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्याने भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांना विजयाबाबत अतिआत्मविश्वास होता. गलितगात्र झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आपण सहजपणे नमवू, आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही, अशी धारणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची झाली होती. त्यांच्या देहबोलीतून ती जाणवत होती. त्यातूनच विरोधी पक्षांना गृहित धरले गेले आणि त्याचा फटका भाजपा आणि सेनेला बसला.  

शिवसेना आणि भाजपातील मतभेद २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजपाच्या नात्यात म्हणावा तसा गोडवा राहिला नव्हता. जरी हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत राबत असले तरी त्यांच्यात अंतर्गत मतभेद खूप होते. त्यातून एकमेकांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष ज्या एकदिलाने लढले तसे चित्र विधानसभेत दिसले नाही. परस्परविरोधी बंडाळीला उत आला. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाडापाडी झाली. अखेरीस त्याची परिणती पिछेहाटीमध्ये झाली. 

 पुरस्थिती वेळी दाखवलेली अनास्थायंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व पुरस्थितीने थैमान घातले. त्यात कोल्हापूर, सांगली या भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली. मात्र राज्यात पुराने थैमान घातले असताना भाजपाची महाजनादेश यात्रा सुरू होती. त्यातच सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पुरग्रस्तांबाबत कमालीची अनास्था दाखवली. त्यामुळे तेव्हापासूनच संतापाचे वातावरण निर्माण झालेले होते. त्याचा फटका या भागात युतीला बसला. 

स्थानिक मुद्द्यांपेक्षा कलम ३७० वर दिलेला भर यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाने स्थानिक मुद्द्यांपेक्षा कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर अधिक भर दिला. अगदी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आपल्या प्रत्येक सभेत या मुद्द्याचा वारंवार उल्लेख केला. मात्र राज्यातील स्थानिक मुद्द्यांपेक्षा कलम ३७० ला दिलेले अधिक महत्त्व मतदारांना फारसे रुचले नाही. त्याची परिणती मतदार भाजपापासून दूर जाण्यात झाली. 

मेगाभरतीचे बुमरँग लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला मोठे यश मिळाल्यानंत दोन्ही पक्षांत प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. त्यातून काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांना प्रवेश दिला गेला. यातील काही नेते विजयी झाले, तर अनेक जणांना पराभव पत्करावा लागला. मात्र भाजपा आणि शिवसेनेने राबवलेल्या सरसकट मेगाभरतीच्या धोरणामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला. तसेच ही मेगाभरती भाजपा आणि शिवसेनेवरच उलटली.     इडीची कारवाई विधानसभा निवडणुकीला काही दिवसच उरले असताना राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही कळीचा मुद्दा ठरली. शरद पवार यांनी या कारवाईचा पुरेपूर राजकीय फायदा उठवत भाजपाविरोधात वातावरण निर्मिती केली.   शरद पवार यांचा झंझावाती प्रचारया सर्वांबरोबरच शरद पवार यांनी केलेला झांझावाती प्रचार हे या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.  एकीकडे भाजपा आणि शिवसेना लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही बंपर यश मिळवणार या कल्पनेनेच विरोधी पक्षांचे अवसान गळाले होते. अनेक नेते भाजपा आणि सेनेची वाट धरत होते. मात्र अशा परिस्थितीत शरद पवार यांनी विरोधी पक्षांचा किल्ला जिद्दीने लढवला.  राज्यभर झंझावाती दौरे करत राज्यसरकारविरोधात वातावरणनिर्मिती केली. त्यातच सातारा येथील त्यांची सभा ही पश्चिम महाराष्ट्रातील निकालांच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट ठरली. बाकी पवारांचा या निवडणुकीवर पडलेला प्रभाव निकालांमधून स्पष्टच दिसत आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना