शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
4
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
5
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
6
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
7
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
8
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
9
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
10
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
11
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
13
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
14
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
15
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
16
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
17
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
18
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
19
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव

बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला

By अतुल कुलकर्णी | Updated: May 7, 2024 09:47 IST

Ramesh Chennithala Interview: आम्ही कमी जागा मिळत असतानाही समन्वयाची भूमिका ठेवली. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे मत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केले.

- अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत. त्यांचे महाराष्ट्र आणि देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्यावर ‘भटकती आत्मा’ म्हणून टीका करणे, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्यांच्या शिवसेनेला ‘नकली सेना’ म्हणणे आणि महाराष्ट्रात जोडतोड करून सत्ता स्थापन करणे महाराष्ट्रातल्या लोकांना बिलकुल आवडलेले नाही, त्यामुळेच आम्ही कमी जागा मिळत असतानाही समन्वयाची भूमिका ठेवली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण तयार झाले आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे मत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केले.

मुंबई लोकमत कार्यालयात ते आले होते. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात अंडर करंट काम करत आहेत. भाजपने दिलेले एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आले नाही, त्याची यादी लोकच आम्हाला वाचून दाखवत आहेत. लोकांना परिवर्तन पाहिजे. महाराष्ट्रातल्या मोडतोड करून सत्तेवर आलेल्या सरकार प्रति लोकांची नाराजी आहे. शेतकरी, महिला, बेरोजगारी हे प्रमुख प्रश्न आहेत आणि महागाई सिलिंडरचे वाढलेले दर याविषयी लोकांच्या मनात तीव्र संताप आहे, हे प्रश्न निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देतील, असेही चेन्निथला म्हणाले.

महाराष्ट्रात तुम्हाला किती जागा मिळतील, असे विचारले असता चेन्निथला म्हणाले, काँग्रेसने महाराष्ट्रात १७ जागी उमेदवार दिले आहेत. यातील प्रत्येक जागा विजयाच्या जवळ आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २१ जागी तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागी उमेदवार उभे केले आहेत. तिन्ही पक्षांमध्ये एकोपा आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांच्या प्रचारसभेसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आले. मुंबई उत्तर मतदारसंघात भूषण पाटील यांच्यासाठी ठाकरे, विनोद घोसाळकर प्रचारासाठी उतरले आहेत. वर्षा गायकवाड यांना मी मतदान करणार, असेही त्यांनी सांगितले आहे. आमचे लोक ठाकरे, शरद पवार यांच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत, हा एकोपा आमच्या विजयाचा मुख्य आत्मा आहे, असेही चेन्निथला यांनी सांगितले.

शरद पवारांचा या वयात ज्या पद्धतीने उल्लेख केला गेला किंवा अजित पवार गटाकडून बारामतीमध्ये मडके फोडण्यात आले, ही गोष्ट महाराष्ट्रातल्या संवेदनशील जनतेला आवडलेली नाही. या गोष्टींचा राग ते आपल्या मतदानातून दाखवून देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती दाखविली, याचा अर्थ भाजप ठाकरे यांच्याशी जुळवून घेईल का? असा थेट सवाल विचारला असता, चेन्निथला म्हणाले, याचा अर्थ, भाजपला महाराष्ट्रात त्यांचा पराभव दिसत आहे. कोणतीही खिडकी, दरवाजे उघडे केलेले नाहीत. त्यामुळे त्यातून आता कोणीही येणार जाणार नाहीत. 

मुंबईत तुम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत. मात्र, तुमचे नेते एकदिलाने काम करताना दिसत नाहीत त्याचे काय?  उद्या सगळ्यांची एकत्रित मीटिंग आपण बोलावली आहे. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली जाणार आहे. प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेण्याची काँग्रेसची वेगळी यंत्रणा आहे. कोण काय काम करत आहे, यावर आमचे बारीक लक्ष आहे. वर्षा गायकवाड यांनाही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझे एवढे सांगणे सगळ्यांना पुरेसे ठरेल, असे मला वाटते.

तुमचे महाराष्ट्रातील नेते विजय वडेट्टीवार यांनी सेल्फ गोल केला, त्याचे काय?  ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. निवडणुकीच्या काळात नेते बोलत असतात. मात्र, भाजपने लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम केले. हिंदू-मुस्लीम राजकारण ऐकून लोक थकून गेले आहेत. यापेक्षा महाग झालेला सिलिंडर स्वस्त कसा मिळेल, याची चिंता लोकांना आहे. भारत-पाकिस्तान म्हणत या निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत-पाकिस्तान म्हणायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? 

टॅग्स :congressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४