शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget Session 2022: अभूतपूर्व! अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण; राज्यपाल आले अन् गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 05:52 IST

Maharashtra Budget Session 2022: विधिमंडळ सदस्यांच्या जोरदार गोंधळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण करून सभागृहाबाहेर पडल्याचा अभूतपूर्व प्रसंग विधिमंडळ अधिवेशनात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधिमंडळ सदस्यांच्या जोरदार गोंधळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण करून सभागृहाबाहेर पडल्याचा अभूतपूर्व प्रसंग विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी घडला. त्यावरून सत्तापक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. 

राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होते. सकाळी ११ वाजता राज्यपालांचे संयुक्त सभागृहात दोन्ही सदनांच्या सदस्यांना संबोधित करण्यासाठी आगमन झाले. वंदे मातरम् झाल्यानंतर राज्यपालांनी अभिभाषण वाचनाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या उल्लेखाने सुरुवात केली. त्यावेळी प्रथम सत्ताधारी बाजूने ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदस्यांना हाताने इशारा करीत शांत केले. या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देत विरोधकांनी ‘दहशतवाद्यांचे हस्तक असलेल्या सरकारचा निषेध असो’, ‘दाऊदच्या हस्तकांचे राजीनामे घ्या’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. फलक फडकाविले. घोषणाबाजीनंतर राज्यपाल आपल्या भाषणाचा एकदम शेवटचा परिच्छेद वाचत सभागृहातून बाहेर पडले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य अवाक् झाले.

कशामुळे, कसे घडले?

राज्यपाल कोश्यारी यांनी ‘समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते व गुरुशिवाय शिष्याचे महत्त्व नसते’ अशा आशयाचे विधान केले होते. त्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यपाल अभिभाषणासाठी येताच महाविकास आघाडीच्या सदस्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.

भाजपच्या चुकीच्या वर्तनामुळे हे घडले

राज्यपालांनी राष्ट्रगीताचा मान राखला पाहिजे. राष्ट्रगीत हा कार्यक्रमाचाच भाग असतो. सुरुवातीला जसे राष्ट्रगीत असते, तसेच राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपतो; पण या सर्व गोष्टींचे भान न ठेवता ते त्वरित पायउतार झाले. या सगळ्याची जबाबदारी भाजपवर टाकावी लागेल; कारण भाजपच्या चुकीच्या वर्तनामुळे हे घडले. राष्ट्रगीताचा अवमान करणे अपेक्षित नव्हते. जयंत पाटील, जलसंपदामंत्री

सदस्यांच्या भावना तीव्र होत्या

राज्यपाल कोश्यारी सरकारच्या वतीने भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना तीव्र होत्या. तुम्ही सरकारच्या वतीने भाषण करीत आहात; पण तेच सरकार दाऊदला शरण होत असेल तर हे भाषण कशाला ऐकायचे, हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करीत होते की, नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे. ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी