शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’

By admin | Updated: June 3, 2017 05:46 IST

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबई, पुण्यात दूध आणि भाजीपाल्यांची चांगलीच टंचाई निर्माण झाली असून, ही कोंडी फोडण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबई, पुण्यात दूध आणि भाजीपाल्यांची चांगलीच टंचाई निर्माण झाली असून, ही कोंडी फोडण्यासाठी किसान क्रांतीच्या कोअर कमिटी सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईला पाचारण केले आहे. मात्र, राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांनी सरकारविरोधात बंदचा आसूड उगारला असून, ५ जून रोजी मुंबई वगळता ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.कर्जमुक्ती आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी कालपासून संपावर गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन न देता, केवळ कृषी पतपुरवठ्याची आकडेमोड जाहीर केल्याने संपकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. आंदोलनाचे लोण राज्यभर पसरल्याने भाजीबाजार उठला असून, दूध संकलन केंद्रांना टाळे लागले आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. शुक्रवारी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्ये २० हजार टन मालाची आवक झाली आहे. मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस बंदोबस्तात गुजरातहून दूध मागविण्यात आले आहे. शिवाय, महानंदमध्ये दूध भूकटीपासून दूध तयार करण्यात येत आहे. या संपाला राजकीय पक्षांचे पाठबळ मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे आणि शिवसेनाही संपात उतरल्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत सरकारकडून मिळत असले तरी, सरकारचा हा कुटील डाव असून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांची फसवणूक करून हे सरकार सत्तेवर आल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातील जवान आणि शेतकरी मरत असताना भाजपवाले खुशाल आहेत, असा टोलाही त्यांनी लागवला.आंदोलनाची रूपरेषा५ तारखेपर्यंत संपाबाबत निर्णय न झाल्यास, मुंबई वगळता राज्यभरात ५ जूनला कडकडीत बंद, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य न केल्यास, ६ तारखेला राज्यातील सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले जाईल. त्यानंतरही निर्णय न झाल्यास ७ तारखेला राजकीय पुढाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा कार्यक्रम समन्वय समितीने जाहीर केला आहे. मग शाळेत जा!- राज ठाकरेशेतकरी संपावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. कर्जमाफी, आरक्षण वगैरे प्रत्येक मुद्द्यावर अभ्यास करू, या आश्वासनाचाही त्यांनी ठाकरी शैलीत समाचार घेतला. -वृत्त/७बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडलेशेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे.संप चिघळू नये, म्हणून मध्यस्थी करण्याची तयारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दर्शविली आहे. मात्र, किसान क्रांतीने अण्णांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. अण्णांच्या माध्यमातून सरकार आंदोलनात फूट पाडत असल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे.मुंबईत आले गुजरातचे दूध : राज्यामध्ये शेतकऱ्यांचा संप सुरू असल्याने दुधाची टंचाई निर्माण झाली असताना, गुजरातहून वसई-वर्सोवा मार्गे अमूल कंपनीचे दूध बाजारात दाखल होत आहे. वसई व इतर मार्गावरून येणाऱ्या पट्ट्यात शेतकऱ्यांचा संप नसून, खासगी टँकरद्वारे दोन दिवसांत अमूल कंपनीने १६ लाख लीटर दुधाची विक्र ी मुंबईमध्ये केली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, शहरातील दूधविक्रेत्यांनी दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांना या संपाचा फटका बसत आहे.मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा!मुंबई भाजी मार्केटमध्ये १४७ वाहनांची आवक झाली. कांद्याची एकही गाडी आली नाही. आवक कमी झाल्याने दर प्रचंड वाढले आहेत. कोथिंबिरीची छोटी जुडी ५० व मोठी १०० रुपयांना विकली जात होती. इतर भाजीपाल्याचे दरही दुप्पट झाले असून, संप असाच राहिला, तर सर्वच भाज्यांचे दर शंभरी पार करण्याची शक्यता आहे. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रतिकिलो ५ ते १२ रुपयांवरून १४ ते ३० रुपयांवर गेले आहेत. भेंडी १० ते १८ रुपयांवरून १४ ते ३२ रुपये, कोबी ८ ते १० रुपयांवरून २० ते २५ रुपये किलोने विकली जात होती.