शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Vidhan Sabha 2019: भाजपप्रमाणे शिवसेनेच्या अजेंड्यावरही कलम 370

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 12:34 IST

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडले आहे. तर युतीतील दोन्ही पक्षांनी सुद्धा राज्यातील विविध मतदारसंघात महत्वाच्या नेत्यांच्या सभेंचा धडाकाच लावला आहे. मात्र भाजपकडून स्थानिक प्रश्न सोडून कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे आरोप होत असताना, आता शिवसेनेने सुद्धा आपल्या प्रचारात कलम 370 वर भर दिला असल्याचे पहायला मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे मंत्र्यांनी आपल्या भाषणातून शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न यासारख्या स्थानिक मुद्द्यांऐवजी देशभक्ती आणि कलम 370 च्या मुद्द्यांवर भर दिला असल्याचा आरोप होत आहे. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सुद्धा कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपप्रमाणे शिवसेनेचा सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात कलम 370 चा मुद्दाच अजेंडा असणार असल्याचे चर्चा पहायला मिळत आहे.

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता. त्यांनतर बुधवारी अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कलम 370 काढले गेले, हे आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. कलम 370 हटवणार हे आमच्या 'वचन'नाम्यात वचन होते, आणि ते आम्ही पाळले सुद्धा. ज्यावेळी आम्ही हे वचन दिले त्यावेळी काँग्रेसवाले म्हणत होते. काही झाले तरीही आम्ही कलम 370 रद्द करणार नाही. असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही गप्प्प बसणार नाही, अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे आता पुन्हा सरकार आल्यावर कर्जमाफी करणारच असे म्हणत आहे. तर भाजपप्रमाणे शिवसेना सुद्धा कलम 370 मुद्दा आपल्या प्रचारात मांडत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सभेमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर भर देण्याचा भाजप-शिवसेनेचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे.