शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

Vidhan Sabha 2019: भाजपप्रमाणे शिवसेनेच्या अजेंड्यावरही कलम 370

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 12:34 IST

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडले आहे. तर युतीतील दोन्ही पक्षांनी सुद्धा राज्यातील विविध मतदारसंघात महत्वाच्या नेत्यांच्या सभेंचा धडाकाच लावला आहे. मात्र भाजपकडून स्थानिक प्रश्न सोडून कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे आरोप होत असताना, आता शिवसेनेने सुद्धा आपल्या प्रचारात कलम 370 वर भर दिला असल्याचे पहायला मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे मंत्र्यांनी आपल्या भाषणातून शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न यासारख्या स्थानिक मुद्द्यांऐवजी देशभक्ती आणि कलम 370 च्या मुद्द्यांवर भर दिला असल्याचा आरोप होत आहे. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सुद्धा कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपप्रमाणे शिवसेनेचा सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात कलम 370 चा मुद्दाच अजेंडा असणार असल्याचे चर्चा पहायला मिळत आहे.

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता. त्यांनतर बुधवारी अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कलम 370 काढले गेले, हे आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. कलम 370 हटवणार हे आमच्या 'वचन'नाम्यात वचन होते, आणि ते आम्ही पाळले सुद्धा. ज्यावेळी आम्ही हे वचन दिले त्यावेळी काँग्रेसवाले म्हणत होते. काही झाले तरीही आम्ही कलम 370 रद्द करणार नाही. असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही गप्प्प बसणार नाही, अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे आता पुन्हा सरकार आल्यावर कर्जमाफी करणारच असे म्हणत आहे. तर भाजपप्रमाणे शिवसेना सुद्धा कलम 370 मुद्दा आपल्या प्रचारात मांडत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सभेमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर भर देण्याचा भाजप-शिवसेनेचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे.