शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

Vidhan Sabha 2019: भाजपप्रमाणे शिवसेनेच्या अजेंड्यावरही कलम 370

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 12:34 IST

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडले आहे. तर युतीतील दोन्ही पक्षांनी सुद्धा राज्यातील विविध मतदारसंघात महत्वाच्या नेत्यांच्या सभेंचा धडाकाच लावला आहे. मात्र भाजपकडून स्थानिक प्रश्न सोडून कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे आरोप होत असताना, आता शिवसेनेने सुद्धा आपल्या प्रचारात कलम 370 वर भर दिला असल्याचे पहायला मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे मंत्र्यांनी आपल्या भाषणातून शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न यासारख्या स्थानिक मुद्द्यांऐवजी देशभक्ती आणि कलम 370 च्या मुद्द्यांवर भर दिला असल्याचा आरोप होत आहे. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सुद्धा कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपप्रमाणे शिवसेनेचा सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात कलम 370 चा मुद्दाच अजेंडा असणार असल्याचे चर्चा पहायला मिळत आहे.

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता. त्यांनतर बुधवारी अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कलम 370 काढले गेले, हे आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. कलम 370 हटवणार हे आमच्या 'वचन'नाम्यात वचन होते, आणि ते आम्ही पाळले सुद्धा. ज्यावेळी आम्ही हे वचन दिले त्यावेळी काँग्रेसवाले म्हणत होते. काही झाले तरीही आम्ही कलम 370 रद्द करणार नाही. असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही गप्प्प बसणार नाही, अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे आता पुन्हा सरकार आल्यावर कर्जमाफी करणारच असे म्हणत आहे. तर भाजपप्रमाणे शिवसेना सुद्धा कलम 370 मुद्दा आपल्या प्रचारात मांडत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सभेमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर भर देण्याचा भाजप-शिवसेनेचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे.