शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

यामुळे आठवलेंच्या पत्नीची निवडणूक लढवण्याची इच्छा अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 17:13 IST

तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचं सीमा आठवले यांनी महिला मेळाव्यात बोलताना सांगितले होते.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध नेत्यांनी निवडणुका लढवण्याचे आवाहन केले होते. मात्र ऐनवेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला असल्याचे पहायला मिळाले. त्याचप्रमाणे आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी तासगावातून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली होती. मात्र महायुतीत ही जागा शिवसेनेकडे गेली असल्याने सीमा आठवले तिसगावमधून निवडणूक लढवणार असल्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.

तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचं सीमा आठवले यांनी महिला मेळाव्यात बोलताना सांगितले होते. हा मतदारसंघ आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला होता. आबांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी विजय मिळवला होता. तर यावेळीही सुद्धा राष्ट्रवादीकडून तासगावातून सुमन पाटील यांनाच उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात खरचं सीमा आठवले ह्या निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला असून हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असून येथून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सीमा आठवले यांनी या मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलीच नाही. त्यामुळे तासगावात आर. आर. आबांच्या पत्नीविरोधात आठवलेंच्या पत्नीची निवडणूक लढवण्याची इच्छा अपूर्ण राहणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.