शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'इश्क करना है तो आग में कूद जाओ'; ओवेसींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 13:10 IST

उद्धव ठाकरे हे मोदींना खूप घाबरतात असा टोला यावेळी ओवेसींंनी लगावला. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर राज्यात भाजप-शिवसेनेकडून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या मुद्यावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना सेनेचा मुख्यमंत्री बनवायचा पण ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जाण्यास घाबरत असल्याचे ओवेसी म्हणाले. हैदराबाद येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलोत होते.

आपल्या भाषणात बोलताना ओवेसी म्हणाले की, महाराष्ट्रात सुरु असलेल्या भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष पाहता या दोन्ही पक्षाला पाठींबा न देण्याची आमची भूमिका असणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा पाठींबा घेऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र उद्धव ठाकरे यासाठी हिम्मत करणार नाहीत असे ही ओवेसी म्हणाले.

उद्धव यांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा असेल तर, त्यांनी आधी दिल्लीत बसलेल्या त्यांच्या मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले पाहिजे. मात्र भाजपसोबत जायचे की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांचे तळ्यात-मळ्यात सुरु आहे. शिवसेनेची परिस्थिती दोन पाऊल पुढे अन् तीन मागे अशी झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मोदींना खूप घाबरतात असा टोला यावेळी ओवेसींंनी लगावला. 

'इश्क करना है तो आग में कूद जाओ' म्हणत मुख्यमंत्री बनवायचाचं असेल तर घाबरता कशाला, थेट निर्णय घ्यावा असा टोला ओवेसींनी उद्धव ठाकरेंना लगावला. मात्र आमच्या पक्षाला तुमच्या सत्तेशी काहीही देण-घेणे नसून आम्हाला मंत्रीपदाची कोणतेही अपेक्षा नसून ज्याला कुणाला मुख्यमंत्री बनवायचा आहे त्यांनी खुशाल बनवावा असे ही ओवेसी म्हणाले.