शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Vidhan Sabha 2019: सरसकट कर्ज माफीवरून शिवसेना तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 18:15 IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते. आदित्य यांनी ...

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते. आदित्य यांनी आपल्या अनेक सभेतून राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनाही शेवटपर्यंत सरसकट कर्जमाफी होण्याची अपेक्षा होती. निवडणुका जाहीर होईपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सरसकट कर्ज माफीवरून शिवसेना तोंडघशी पडली असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

शिवसेनेने आघाडीचं सरकार असताना 'कर्जमाफी देता की जाता' म्हणत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढलेले भाजप- शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. मात्र सत्तेत असून सुद्धा शिवसेनेने कर्जमाफीचा मुद्दा कायम लावून धरला होता. तर शेवटच्या काळात आदित्य ठाकरे यावरून आक्रमक होताना पहायला मिळाले होते. जो पर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही,तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचे आदित्य म्हणाले होते.

राजकरणाचे काय ते होऊ द्या, मात्र शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार. राज्यातील शेतकऱ्यांची जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याची भूमिका सुद्धा आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. मात्र ज्या भाजपसोबत पुन्हा शिवसेनेने युती केली आहे. त्या भाजप सरकारने निवडणुका जाहीर होईपर्यंत सुद्धा सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला नसल्याने, युती झाली पण आदित्य ठाकरेंच्या सरसकट कर्ज माफीच्या आश्वासनाचे काय असा प्रश्न विचारला जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीचा मुद्दा गाजणार आहे. तर भाजपवर याच मुद्द्यावरून विरोधक आत्तापासूनच टीका करतांना सुद्धा पहायला मिळत आहे. तर निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शिवसेनेने आता पुन्हा भाजपसोबत युती केली आहे. त्यामुळे निवडणुकीत ह्या मुद्यावरून विरोधीपक्ष भाजप-शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.