शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

महाराष्ट्राला हुडहुडी , महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये 0 अंश तापमान

By admin | Updated: January 8, 2017 11:48 IST

जवळपास संपूर्ण महाराष्ट्र सध्या थंडीने गारठला आहे. सर्वत्र प्रचंड गारवा, बोचणारा थंडगार वारा आणि त्यापासून बचावासाठी शेकोटीची धडपड

ऑनलाइन लोकमत
 
सातारा, दि. 8 - जवळपास संपूर्ण महाराष्ट्र सध्या थंडीने गारठला आहे. सर्वत्र  प्रचंड गारवा, बोचणारा थंडगार वारा आणि त्यापासून बचावासाठी शेकोटीची धडपड असे चित्र पाहायला मिळत आहे. 
 
महाबळेश्वरच्या सुप्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  तापमान खालावल्यामुळे पर्यटक चांगलेच गारठले आहेत. मात्र, गुलाबी थंडीमुळे पर्यटकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. शून्य अंश तापमानामुळे हिमकणांचा गालिचा पसरला आहे. झाडांवरील दवबिंदू गोठले असून परिसराला बर्फाच्छादित रूप आलं आहे.
 
पुण्यामध्येही तापमानाचा पारा सातत्याने खालावत आहे.  पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात धुक्याची दाट चादर पसरली आहे. दाट धुक्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावरची वाहतूक धीम्यागतीनं सुरू आहे. वाहनं चालवताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 
पुढील काही दिवस राज्यातील गारठा असाच कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. उत्तरेतील वाढत्या थंडीच्या कहराचा परिणाम महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, ओडिशा, कोकण, गोवा, कर्नाटकपर्यंत जाणवत आहे. येथील किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून गारठा चांगलाच वाढला आहे. नगर, नाशिकसह खान्देशात तर थंडी आहे. मुंबई व कोकणपट्टीतही दोन दिवस चांगला गारठा आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान नगर येथे 6.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पश्चिम महाराष्ट्रातही गारठा कमालीचा वाढला आहे. पुण्यात हंगामातील सर्वात निच्चांकी 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुणेकरांनाही बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
 
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या व विदर्भातही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. तापमान कमी होणे आणि थंडीची लाट येणे नाशिककरांना नवीन नाही, सातत्याने नाशिकमध्ये कमी तापमानाची नोंद केली जात आहे. मुंबई- नाशिक महामार्गावरही धुक्यामुळे वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे.  नाशिकमध्ये 9.1 तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर  धुळ्यामध्ये 8.8 अंश सेल्सियस इतका पारा खाली उतरला आहे. कोल्हापूरचा पारा 14 अंशावर घसरला आहे तर  मालेगावचा पाराही 11.6 अंशावर आला आहे.  तर, एरवी घामाच्या धारांनी ओथंबळणारे मुंबईकरही सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
 
महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर भारताच्या अनेक भागांत थंडीची लाट पसरली आहे. तुफान बर्फवृष्टीमुळे काश्मीरचा उर्वरित देशापासूनचा संपर्क सलग दुसऱ्या दिवशी तुटलेला आहे. बहुतांश ठिकाणी पारा शून्याच्या खाली आला आहे. गुलमर्ग हे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडातही बर्फवृष्टी झाली असून, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत पाऊस झाला आहे.
 
काश्मीर खोऱ्याची जीवन रेषा असलेला श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीसाठी बंद राहिला. पीर पांजाल पर्वतराजीत अनेक ठिकाणी बर्फाचे कडे कोसळून, तसेच जमीन खचून महामार्ग बंद झाला आहे. श्रीनगर विमानतळाच्या धावपट्टीवर बर्फ साचला असल्याने, हवाई वाहतूकही ठप्प आहे. गुलमर्ग स्की रिसॉर्ट येथील तापमान उणे (-) ८.४ अंशावर घसरले आहे. हे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले. पहलगाम, लेह लदाख आणि राजधानी श्रीनगर अशा बहुतांश सर्वच ठिकाणी तापमान शून्याच्या खाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली.
शनिवारी राज्यातील विविध शहरांत नोंदवण्यात आलेलं तापमान -