शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

चाराटंचाई निवारणावर महाबीजचा भर

By admin | Updated: June 20, 2015 02:32 IST

वैरण विकास, हिरवळीच्या खतांचे बियाणे बाजारात.

अकोला : उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या चाराटंचाईवर मात करण्यासाठी महाबीजच्यावतीने चारा व वैरण विकास आणि हिरवळीचे बियाणे बाजारात उपलब्ध करून देण्यात आले असून, जास्तीत जास्त प्रमाणात याचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा पाऊस वेळेवर व योग्य प्रमाणात येणार असून, खरीप हंगाम समाधानकारक राहणार असल्याचे भाकीत सर्वच स्तरांतून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामापूर्वीच महामंडळाने राज्यात बियाणे उपलब्ध करून दिले आहे. महाबीजमार्फत खरीप हंगामाकरिता विविध पिके व वाणांचे एकूण ५.४२ लाख क्विंटल प्रमाणित बियाणे राज्यातील १३५५ महाबीज विक्रेते व ग्रामपातळीवरील उपविक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ३,६१,९५६ क्विंटल, संकरित ज्वारी १२,0५६ क्विंटल, तूर १६, ७७१ क्विंटल, उडीद ११,१३४ क्विंटल, धान १,0१, २३२ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मूग, संकरित मका, बीटी कपाशी, चारा व वैरणाचे बियाणे, हिरवळीचे खत असलेले धैंचा तसेच भाजीपाल्याच्या बियाण्यांचा यामध्ये समावेश आहे. यंदाच्या हंगामाकरिता राज्य तसेच केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, तूर, मूग, उडीद, धान व सुधारित बाजरा आदी पिकांचे तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तूर, मूग, उडीद या पिकांचे व राष्ट्रीय तेलताड अभियान योजनेंतर्गत सोयाबीन पिकाच्या बियाण्यांचा तसेच हायब्रिड तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत हायब्रिड तूर वाणाचे बियाणे पुरवठा करण्यात आलेले आहे. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अरूण उन्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यात सर्वत्र बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच उन्हाळ्यात चाराटंचाई भासू नये, याकरिता चारा व वैरण विकास आणि हिरवळीचे बियाणेदेखील उपलब्ध केले असल्याचे स्पष्ट केले.