शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

महंत मोहनदास बेपत्ता; आखाडा परिषद चिंतित, अपहरणाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:32 IST

राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणा-या देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्तेमहंत तथा श्री. पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान बेपत्ता झाले आहेत.

नाशिक : राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणा-या देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्तेमहंत तथा श्री. पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान बेपत्ता झाले आहेत.१० दिवस उलटूनही त्यांचा शोध न लागल्याने अखिल भारतीय षटदर्शन आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सकाळी आखाडा परिषदेची स्वामी सागरानंद यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली.महंत मोहनदास हे १५ सप्टेंबरला हरिद्वारहून मुंबईकडे रेल्वेने निघाले, मात्र बेपत्ता झाले. हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख तसेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली.हरिद्वारच्या पोलीस अधिकाºयांचे पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी दिली.आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केल्यानंतर मोहनदास यांना अनोळखी व्यक्तींकडून धमकीचे फोन येत होते. त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर महंत मोहनदास यांचे संबंधित गुंडांकडून अपहरण करण्यात आले, अशी शंका हरिगिरी महाराज यांनी व्यक्त केली.मेरठपर्यंत महंत मोहनदास यांच्या मोबाईलचे लोकेशन मिळत आहे, त्यानंतर मात्र फोनही लागत नाही. परिषदेचे प्रवक्ते योगीराज डॉ. बिंदूजी महाराज यांनीही सरकार अद्यापही महंतांचा शोध न घेऊ शकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.