शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

महाडमधील खाडी किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ

By admin | Updated: September 24, 2016 02:43 IST

रायगड जिल्ह्यातील उरण शहरात चार संशयित अतिरेकी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे.

दासगाव : पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याला काही दिवसच उलटले असून अचानक रायगड जिल्ह्यातील उरण शहरात चार संशयित अतिरेकी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे व गोरेगाव पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ केलीआहे. वाहनांची तसेच येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. रविवारी उरी येथे झालेल्या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर अचानक मुंबईला लागूनच असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथे चार सशस्त्र संशयित अतिरेकी नौदलाच्या तळाकडे जाताना शाळकरी मुलांनी पाहिल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा तसेच मुंबईत खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा तसेच मुंबई येथे सर्व सुरक्षा यंत्रणा जागी होऊन ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. या पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील दासगाव बंदर, शिरगाव चेक पोस्ट या दोन ठिकाणी दोन अधिकारी व आठ कर्मचारी नेमले आहेत. या ठिकाणची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे हे स्वत: काही कर्मचाऱ्यांसह गस्त घालत आहेत. याचबरोबर गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील खाडीलगत असलेल्या आंबेत चेकपोस्ट या ठिकाणी नेहमी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करत पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे कर्मचाऱ्यांसमवेत आंबेत, पळसप, राजबंदर अशा खाडीकिनारी असलेल्या ठिकाणी गस्त घालत आहेत.महाड तालुका पोलीस ठाण्याने मात्र याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. १९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मा. शा. पाटील यांच्याकडे संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. आंबेत ते टोल फाटा हा मार्ग पोलीस जिल्हा नियंत्रण कक्ष सांभाळत आहे. त्यांच्यामार्फत गस्त सुरू आहे असे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नलावडे यांनी लोकमशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)> टोल मार्गावर सुरक्षा नाही१९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. या ठिकाणी एकही पोलीस सुरक्षेसाठी तैनात न के ल्याने तसेच कोणत्याही प्रकारची गस्त या मार्गावर दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.