शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील खाडी किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ

By admin | Updated: September 24, 2016 02:43 IST

रायगड जिल्ह्यातील उरण शहरात चार संशयित अतिरेकी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे.

दासगाव : पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याला काही दिवसच उलटले असून अचानक रायगड जिल्ह्यातील उरण शहरात चार संशयित अतिरेकी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे व गोरेगाव पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ केलीआहे. वाहनांची तसेच येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. रविवारी उरी येथे झालेल्या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर अचानक मुंबईला लागूनच असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथे चार सशस्त्र संशयित अतिरेकी नौदलाच्या तळाकडे जाताना शाळकरी मुलांनी पाहिल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा तसेच मुंबईत खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा तसेच मुंबई येथे सर्व सुरक्षा यंत्रणा जागी होऊन ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. या पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील दासगाव बंदर, शिरगाव चेक पोस्ट या दोन ठिकाणी दोन अधिकारी व आठ कर्मचारी नेमले आहेत. या ठिकाणची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे हे स्वत: काही कर्मचाऱ्यांसह गस्त घालत आहेत. याचबरोबर गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील खाडीलगत असलेल्या आंबेत चेकपोस्ट या ठिकाणी नेहमी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करत पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे कर्मचाऱ्यांसमवेत आंबेत, पळसप, राजबंदर अशा खाडीकिनारी असलेल्या ठिकाणी गस्त घालत आहेत.महाड तालुका पोलीस ठाण्याने मात्र याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. १९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मा. शा. पाटील यांच्याकडे संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. आंबेत ते टोल फाटा हा मार्ग पोलीस जिल्हा नियंत्रण कक्ष सांभाळत आहे. त्यांच्यामार्फत गस्त सुरू आहे असे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नलावडे यांनी लोकमशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)> टोल मार्गावर सुरक्षा नाही१९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. या ठिकाणी एकही पोलीस सुरक्षेसाठी तैनात न के ल्याने तसेच कोणत्याही प्रकारची गस्त या मार्गावर दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.