शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

महाडमधील खाडी किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ

By admin | Updated: September 24, 2016 02:43 IST

रायगड जिल्ह्यातील उरण शहरात चार संशयित अतिरेकी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे.

दासगाव : पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याला काही दिवसच उलटले असून अचानक रायगड जिल्ह्यातील उरण शहरात चार संशयित अतिरेकी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे व गोरेगाव पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ केलीआहे. वाहनांची तसेच येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. रविवारी उरी येथे झालेल्या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर अचानक मुंबईला लागूनच असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथे चार सशस्त्र संशयित अतिरेकी नौदलाच्या तळाकडे जाताना शाळकरी मुलांनी पाहिल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा तसेच मुंबईत खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा तसेच मुंबई येथे सर्व सुरक्षा यंत्रणा जागी होऊन ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. या पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील दासगाव बंदर, शिरगाव चेक पोस्ट या दोन ठिकाणी दोन अधिकारी व आठ कर्मचारी नेमले आहेत. या ठिकाणची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे हे स्वत: काही कर्मचाऱ्यांसह गस्त घालत आहेत. याचबरोबर गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील खाडीलगत असलेल्या आंबेत चेकपोस्ट या ठिकाणी नेहमी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करत पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे कर्मचाऱ्यांसमवेत आंबेत, पळसप, राजबंदर अशा खाडीकिनारी असलेल्या ठिकाणी गस्त घालत आहेत.महाड तालुका पोलीस ठाण्याने मात्र याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. १९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मा. शा. पाटील यांच्याकडे संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. आंबेत ते टोल फाटा हा मार्ग पोलीस जिल्हा नियंत्रण कक्ष सांभाळत आहे. त्यांच्यामार्फत गस्त सुरू आहे असे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नलावडे यांनी लोकमशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)> टोल मार्गावर सुरक्षा नाही१९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. या ठिकाणी एकही पोलीस सुरक्षेसाठी तैनात न के ल्याने तसेच कोणत्याही प्रकारची गस्त या मार्गावर दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.