शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

महाडमधील खाडी किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ

By admin | Updated: September 24, 2016 02:43 IST

रायगड जिल्ह्यातील उरण शहरात चार संशयित अतिरेकी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे.

दासगाव : पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याला काही दिवसच उलटले असून अचानक रायगड जिल्ह्यातील उरण शहरात चार संशयित अतिरेकी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे व गोरेगाव पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ केलीआहे. वाहनांची तसेच येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. रविवारी उरी येथे झालेल्या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर अचानक मुंबईला लागूनच असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथे चार सशस्त्र संशयित अतिरेकी नौदलाच्या तळाकडे जाताना शाळकरी मुलांनी पाहिल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा तसेच मुंबईत खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा तसेच मुंबई येथे सर्व सुरक्षा यंत्रणा जागी होऊन ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. या पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील दासगाव बंदर, शिरगाव चेक पोस्ट या दोन ठिकाणी दोन अधिकारी व आठ कर्मचारी नेमले आहेत. या ठिकाणची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे हे स्वत: काही कर्मचाऱ्यांसह गस्त घालत आहेत. याचबरोबर गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील खाडीलगत असलेल्या आंबेत चेकपोस्ट या ठिकाणी नेहमी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करत पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे कर्मचाऱ्यांसमवेत आंबेत, पळसप, राजबंदर अशा खाडीकिनारी असलेल्या ठिकाणी गस्त घालत आहेत.महाड तालुका पोलीस ठाण्याने मात्र याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. १९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मा. शा. पाटील यांच्याकडे संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. आंबेत ते टोल फाटा हा मार्ग पोलीस जिल्हा नियंत्रण कक्ष सांभाळत आहे. त्यांच्यामार्फत गस्त सुरू आहे असे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नलावडे यांनी लोकमशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)> टोल मार्गावर सुरक्षा नाही१९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. या ठिकाणी एकही पोलीस सुरक्षेसाठी तैनात न के ल्याने तसेच कोणत्याही प्रकारची गस्त या मार्गावर दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.