शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महाडिक कुटुंबाचे पवारांकडून सांत्वन

By admin | Updated: November 25, 2015 03:45 IST

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांना ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये नोकरी देण्याची, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याची

सातारा : शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांना ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये नोकरी देण्याची, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याची ग्वाही, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी दिली. महाडिक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांनी कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेतली.सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे महाडिक यांच्या मूळगावी पवार यांनी मंगळवारी भेट दिली. महाडिक यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्यांनी महाडिक कुटुंबीयांशी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. स्वाती महाडिक या उच्चविद्याविभूषित आहेत. एम. एस. डब्ल्यू., बी. एड. असलेल्या स्वाती महाडिक या उधमपूर (काश्मीर) येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत होत्या. सरकारकडून नोकरीसाठी आता कोणते ठिकाण देण्यात येते हे पाहा. ते ठिकाण दूरचे असल्यास बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांना नोकरी देण्यात येईल. संस्थेतर्फे ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या तीन शाळा चालविल्या जातात. तेथे स्वाती महाडिक यांना काम करता येईल. तसेच कार्तिकी आणि स्वराज या महाडिक यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)इस्लामपूर (सांगली) : दीड वर्षांत ऊसदराच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले गेलेले नाही. सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी अनुकूल धोरण आखले जात नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जीवनातील हे दिवस बदलण्याची धमक लोकशाहीत आहे, असे सूचक वक्तव्य करीत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मोदींना सत्तेवरून पायउतार व्हायला लावण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावरील माजी आमदार दिवंगत व्यंकाप्पा पत्की यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पवार यांच्याहस्ते झाले. पवार म्हणाले की, साखरेचा दर तीन हजार ते एकतीसशे रुपयांपर्यंत जाणे आवश्यक होते. मात्र आज हीच साखर तेवीसशे ते चोवीसशे दराने विकली जात आहे. त्यामुळे मागणी करण्यात येणारा ऊस दर आणि साखरेच्या दरात मोठी तफावत आहे. याचा वास्तववादी विचार व्हायला हवा. कारखानदारी बंद पाडून ठेवण्यापेक्षा साखरेसह वीज आणि इथेनॉल निर्मितीमधून चार पैसे जादा मिळवून शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दर देण्याची भूमिका घ्यायला हवी. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात मर्यादित जमीन, मर्यादित पाणी आणि अधिक साखरेचे प्रमाण असणारे पीक घेतले पाहिजे. (प्रतिनिधी)