शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभमेळा - दहाही आखाड्यांचे शाही स्नान संपन्न

By admin | Updated: September 13, 2015 11:25 IST

सूर्य, चंद्र आणि गुरू हे ग्रह सिंह राशीत असतानाच श्रावणी अमावास्या, असा दुर्मिळ योग जुळून येत आज पहाटे येथील त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर साधू-संतांनी दुस-या शाहीस्नानाला सुरुवात केली.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि, १३ -  सूर्य, चंद्र आणि गुरू हे ग्रह सिंह राशीत असतानाच श्रावणी अमावास्या, असा दुर्मिळ योग जुळून येत आज त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर साधू-संतांनी दुस-या शाहीस्नानाला पहाटे तीनच्या सुमारास सुरूवात केली आणि साडे दहा पर्यंत मानाच्या दहाही आखाड्यांचे शाही स्नान पूर्ण झाले आहे. सुरुवातीला शंकराचार्य सरस्वती यांनी पहाटे तीनच्या सुमारास शाहीस्नान केले. त्यानंतर निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या साधू-संतांना शाहीस्नान करण्याचा मान मिळाला. शाहीस्नानाला येण्यापूर्वी या आखाड्यांच्या साधू-संताच्या शाहीमिरवणूकांना सुरुवात झाली होती.  निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या साधू-संतांना शाहीस्नान केल्यानंतर अग्नी, जुना आणि आवाहन या आखाड्याच्या साधू-संतांच्या शाहीस्नान केले. शाहीस्नानाचा हा महापर्वकाळ साधण्यासाठी लाखो भाविक शुक्रवारपासूनच कुंभनगरीत दाखल झाले आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर कुंभमेऴा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित आहेत. पहिल्या शाहीस्नानावेळी प्रशासनाकडून काही प्रमाणात अतिरेक झाला होता. मात्र यावेळी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काऴजी घेण्यात आली असून योग्य नियोजन करण्यात आले आहे. या दुस-या शाहीस्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. त्यामुऴे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याची शक्यता कुंभमेऴा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविली आहे. मानाच्या आखाड्यांचे शाहीस्नान पूर्ण झाल्यानंतर दुपारी बारानंतर भाविकांना शाहीस्नान करता येणार आहे. 

पहिल्या पर्वणीला भाविकांची परवड झाल्याने वाहतुकीचे फेरनियोजन करण्यात आले आहे. नाशिकला तपोवनातील साधुग्राममधून सकाळी सहा वाजता आखाडे व खालशांची शाही मिरवणूक निघाली आहे. यामध्ये निर्मोही अनी आखाडा अग्रभागी आहे. मिरवणुकीत दिगंबर आखाड्याचे ४५०, निर्वाणी आखाड्याचे १७५ तर निर्मोहीचे ७२ खालसे आहेत. सकाळी ७ वाजता रामकुंडावर सर्वात आधी निर्माेही अनी आखाड्याचे स्नान होईल. भाविकांना गोदाघाटाकडे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, याकरिता बंदोबस्ताचा विळखा सैल करण्यात आला आहे. भाविकांसाठी शहरांतर्गत बससेवा असेल. महापर्वणीला सुमारे ३० ते ३५ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. 

अमावास्या समाप्तीश्रावणी पिठोरी अमावास्या रविवारी दुपारी १२.११ वाजता समाप्त होईल. त्यानंतर गोदास्नानासाठी भाविकांची रामघाटावर प्रचंड गर्दी लोटण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी सोडलेशुक्रवारी रात्रीपासूनच गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण पर्वणीसाठी पाटबंधारे खात्याने १२५ दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडले आहे. सुनावणीपूर्वी पर्वणी आटोपतीलपर्वण्यांसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास मज्जाव करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होईल. तत्पूर्वी दुसरी पर्वणी आटोपलेली असेल. सरकारकडून स्पष्टीकरण मागितल्यानंतर अंतिम निवाडा होईल. मात्र तोपर्यंत तिसरी व अंतिम पर्वणी १८ सप्टेंबरला पार पडलेली असेल.