शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महाकुंभमेळा - दहाही आखाड्यांचे शाही स्नान संपन्न

By admin | Updated: September 13, 2015 11:25 IST

सूर्य, चंद्र आणि गुरू हे ग्रह सिंह राशीत असतानाच श्रावणी अमावास्या, असा दुर्मिळ योग जुळून येत आज पहाटे येथील त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर साधू-संतांनी दुस-या शाहीस्नानाला सुरुवात केली.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि, १३ -  सूर्य, चंद्र आणि गुरू हे ग्रह सिंह राशीत असतानाच श्रावणी अमावास्या, असा दुर्मिळ योग जुळून येत आज त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर साधू-संतांनी दुस-या शाहीस्नानाला पहाटे तीनच्या सुमारास सुरूवात केली आणि साडे दहा पर्यंत मानाच्या दहाही आखाड्यांचे शाही स्नान पूर्ण झाले आहे. सुरुवातीला शंकराचार्य सरस्वती यांनी पहाटे तीनच्या सुमारास शाहीस्नान केले. त्यानंतर निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या साधू-संतांना शाहीस्नान करण्याचा मान मिळाला. शाहीस्नानाला येण्यापूर्वी या आखाड्यांच्या साधू-संताच्या शाहीमिरवणूकांना सुरुवात झाली होती.  निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या साधू-संतांना शाहीस्नान केल्यानंतर अग्नी, जुना आणि आवाहन या आखाड्याच्या साधू-संतांच्या शाहीस्नान केले. शाहीस्नानाचा हा महापर्वकाळ साधण्यासाठी लाखो भाविक शुक्रवारपासूनच कुंभनगरीत दाखल झाले आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर कुंभमेऴा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित आहेत. पहिल्या शाहीस्नानावेळी प्रशासनाकडून काही प्रमाणात अतिरेक झाला होता. मात्र यावेळी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काऴजी घेण्यात आली असून योग्य नियोजन करण्यात आले आहे. या दुस-या शाहीस्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. त्यामुऴे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याची शक्यता कुंभमेऴा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविली आहे. मानाच्या आखाड्यांचे शाहीस्नान पूर्ण झाल्यानंतर दुपारी बारानंतर भाविकांना शाहीस्नान करता येणार आहे. 

पहिल्या पर्वणीला भाविकांची परवड झाल्याने वाहतुकीचे फेरनियोजन करण्यात आले आहे. नाशिकला तपोवनातील साधुग्राममधून सकाळी सहा वाजता आखाडे व खालशांची शाही मिरवणूक निघाली आहे. यामध्ये निर्मोही अनी आखाडा अग्रभागी आहे. मिरवणुकीत दिगंबर आखाड्याचे ४५०, निर्वाणी आखाड्याचे १७५ तर निर्मोहीचे ७२ खालसे आहेत. सकाळी ७ वाजता रामकुंडावर सर्वात आधी निर्माेही अनी आखाड्याचे स्नान होईल. भाविकांना गोदाघाटाकडे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, याकरिता बंदोबस्ताचा विळखा सैल करण्यात आला आहे. भाविकांसाठी शहरांतर्गत बससेवा असेल. महापर्वणीला सुमारे ३० ते ३५ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. 

अमावास्या समाप्तीश्रावणी पिठोरी अमावास्या रविवारी दुपारी १२.११ वाजता समाप्त होईल. त्यानंतर गोदास्नानासाठी भाविकांची रामघाटावर प्रचंड गर्दी लोटण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी सोडलेशुक्रवारी रात्रीपासूनच गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण पर्वणीसाठी पाटबंधारे खात्याने १२५ दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडले आहे. सुनावणीपूर्वी पर्वणी आटोपतीलपर्वण्यांसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास मज्जाव करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होईल. तत्पूर्वी दुसरी पर्वणी आटोपलेली असेल. सरकारकडून स्पष्टीकरण मागितल्यानंतर अंतिम निवाडा होईल. मात्र तोपर्यंत तिसरी व अंतिम पर्वणी १८ सप्टेंबरला पार पडलेली असेल.