शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

‘मॅगी’बंदी उठली!

By admin | Updated: August 14, 2015 02:38 IST

देशभरातील मुलांचा अत्यंत आवडता तयार अल्पोपाहार असलेल्या नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घातलेली

मुंबई : देशभरातील मुलांचा अत्यंत आवडता तयार अल्पोपाहार असलेल्या नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. तरीही मॅगी नूडल्स लगेच पुन्हा बाजारात येणार नाही. या नूडल्सच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करून घ्यावी व त्यातून हे खाद्यान्न सेवनासाठी अपायकारक नाही असे निष्पन्न झाले तरच कंपनीला हे उत्पादन पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणता येईल. नेस्ले इंडिया कंपनीच्या नऊ विविध स्वाद आणि चवीच्या मॅगी नूडल्स बाजारात उपलब्ध होत्या. यात स्वत:ची अशी कोणतीही चव नसलेल्या मैद्याच्या नूडल्स आणि त्यांना चव आणण्यासाठी स्वतंत्रपणे दिलेले मसाल्याचे पाकीट असायचे. या नूडल्सच्या वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशात घेतलेल्या नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण अधिक असल्याचे व मसाल्याच्या पाकिटात ‘अजिनो मोटो’ असल्याचे दिसून आले होते. यावरून राष्ट्रीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) व राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व नऊ प्रकारच्या मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती. या बंदीच्या एक दिवस आधीच नेस्ले इंडिया कंपनीने मॅगीचा सर्व साठा बाजारातून स्वत:हून परत घेतला होता. त्यानंतर कंपनीने या बंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका केली. न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करून बंदी आदेश रद्द केला. कंपनीने अनेक मुद्दे मांडले असले तरी अन्नसुरक्षा प्राधिकरणाने हा निर्णय घेताना नैसर्गिक न्याय तत्त्वांचे पालन केले नाही, एवढा एकच मुद्दा बंदी रद्द करण्यास पुरेसा आहे, असे न्यायालयाने म्हटले. बंदीनंतर कंपनीने या नूडल्सचा बाजारातून परत घेतलेला २५ हजार टन साठा जाळून नष्ट केला असला तरी त्यावेळी उत्पादन केलेल्या सर्व प्रकारच्या नूडल्सचे ७५० नमुने जपून ठेवले आहेत. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने त्यातील पाच प्रकारच्या नूडल्सचे प्रत्येकी तीन नमुने घेऊन त्यांची पंजाब, आंध्र व जयपूर येथील प्रयोगशाळांकडून चाचण्या केल्या जाव्यात. या प्रयोगशाळा ‘नॅशनल अ‍ॅक्रिडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरिज’ने मान्यता दिलेल्या आहेत. या चाचण्यांमधून मॅगी नूडल्समध्ये शिशाचे प्रमाण निर्धारित पातळीहून जास्त नाही असे निष्पन्न झाले तरच हे उत्पादन पुन्हा बाजारात व्रिक्रीसाठी आणता येईल, असे न्यायालयाने म्हटले. या चाचण्या सहा आठवड्यांत करायच्या आहेत. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र कंपनीने बंदीच्या आधीच माल बाजारातून काढून घेतला होता व आताही तो लगेच बाजारात येणार नाही. त्यामुळे स्थगिती द्यायची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. (विशेष प्रतिनिधी)