शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅगी’बंदी उठली!

By admin | Updated: August 14, 2015 02:38 IST

देशभरातील मुलांचा अत्यंत आवडता तयार अल्पोपाहार असलेल्या नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घातलेली

मुंबई : देशभरातील मुलांचा अत्यंत आवडता तयार अल्पोपाहार असलेल्या नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. तरीही मॅगी नूडल्स लगेच पुन्हा बाजारात येणार नाही. या नूडल्सच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करून घ्यावी व त्यातून हे खाद्यान्न सेवनासाठी अपायकारक नाही असे निष्पन्न झाले तरच कंपनीला हे उत्पादन पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणता येईल. नेस्ले इंडिया कंपनीच्या नऊ विविध स्वाद आणि चवीच्या मॅगी नूडल्स बाजारात उपलब्ध होत्या. यात स्वत:ची अशी कोणतीही चव नसलेल्या मैद्याच्या नूडल्स आणि त्यांना चव आणण्यासाठी स्वतंत्रपणे दिलेले मसाल्याचे पाकीट असायचे. या नूडल्सच्या वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशात घेतलेल्या नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण अधिक असल्याचे व मसाल्याच्या पाकिटात ‘अजिनो मोटो’ असल्याचे दिसून आले होते. यावरून राष्ट्रीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) व राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व नऊ प्रकारच्या मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती. या बंदीच्या एक दिवस आधीच नेस्ले इंडिया कंपनीने मॅगीचा सर्व साठा बाजारातून स्वत:हून परत घेतला होता. त्यानंतर कंपनीने या बंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका केली. न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करून बंदी आदेश रद्द केला. कंपनीने अनेक मुद्दे मांडले असले तरी अन्नसुरक्षा प्राधिकरणाने हा निर्णय घेताना नैसर्गिक न्याय तत्त्वांचे पालन केले नाही, एवढा एकच मुद्दा बंदी रद्द करण्यास पुरेसा आहे, असे न्यायालयाने म्हटले. बंदीनंतर कंपनीने या नूडल्सचा बाजारातून परत घेतलेला २५ हजार टन साठा जाळून नष्ट केला असला तरी त्यावेळी उत्पादन केलेल्या सर्व प्रकारच्या नूडल्सचे ७५० नमुने जपून ठेवले आहेत. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने त्यातील पाच प्रकारच्या नूडल्सचे प्रत्येकी तीन नमुने घेऊन त्यांची पंजाब, आंध्र व जयपूर येथील प्रयोगशाळांकडून चाचण्या केल्या जाव्यात. या प्रयोगशाळा ‘नॅशनल अ‍ॅक्रिडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरिज’ने मान्यता दिलेल्या आहेत. या चाचण्यांमधून मॅगी नूडल्समध्ये शिशाचे प्रमाण निर्धारित पातळीहून जास्त नाही असे निष्पन्न झाले तरच हे उत्पादन पुन्हा बाजारात व्रिक्रीसाठी आणता येईल, असे न्यायालयाने म्हटले. या चाचण्या सहा आठवड्यांत करायच्या आहेत. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र कंपनीने बंदीच्या आधीच माल बाजारातून काढून घेतला होता व आताही तो लगेच बाजारात येणार नाही. त्यामुळे स्थगिती द्यायची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. (विशेष प्रतिनिधी)