शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 13:08 IST

राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. देशातील जनतेने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी दिली. परंतु, केंद्रात जरी मोदींना संधी दिली असली तरी राज्यात आघाडीचं सरकार येईल, किंबाहुना मध्यप्रदेश आणि राजस्थानची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात होईल, अशी आशा आघाडीच्या नेत्यांना आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा मुद्दावर विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार पुनरागमन करताना सत्ता काबीज केली. तीनही राज्यात एकाचवेळी सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. परंतु, त्याचा फारसा उपयोग लोकसभा निवडणुकीत झाला नाही. जनतेचा कल राज्यात जरी काँग्रेसकडे असला तरी देशात मोदी सरकारवर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात होईल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत देखील हाच सूर होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरभरून मते दिली. यावरून महाराष्ट्रातील जनतेने केंद्रीतील मोदी सरकारवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले. मात्र राज्याच्या बाबतीत स्थिती वेगळी आहे. राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

दरम्यान असं झाल्यास विद्यामान सरकारला मोठा धोका आहे. भाजप-शिवसेना युतीचे राज्यात सरकार असून भाजप राज्यात सुसाट आहे. त्यामुळे राज्यात एवढ्या सहजतेने सत्तांतर होईल, याची शक्यता कमीच असल्याचे जाणकरांचे मत आहे.