शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 13:08 IST

राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. देशातील जनतेने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी दिली. परंतु, केंद्रात जरी मोदींना संधी दिली असली तरी राज्यात आघाडीचं सरकार येईल, किंबाहुना मध्यप्रदेश आणि राजस्थानची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात होईल, अशी आशा आघाडीच्या नेत्यांना आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा मुद्दावर विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार पुनरागमन करताना सत्ता काबीज केली. तीनही राज्यात एकाचवेळी सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. परंतु, त्याचा फारसा उपयोग लोकसभा निवडणुकीत झाला नाही. जनतेचा कल राज्यात जरी काँग्रेसकडे असला तरी देशात मोदी सरकारवर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात होईल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत देखील हाच सूर होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरभरून मते दिली. यावरून महाराष्ट्रातील जनतेने केंद्रीतील मोदी सरकारवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले. मात्र राज्याच्या बाबतीत स्थिती वेगळी आहे. राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

दरम्यान असं झाल्यास विद्यामान सरकारला मोठा धोका आहे. भाजप-शिवसेना युतीचे राज्यात सरकार असून भाजप राज्यात सुसाट आहे. त्यामुळे राज्यात एवढ्या सहजतेने सत्तांतर होईल, याची शक्यता कमीच असल्याचे जाणकरांचे मत आहे.