शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 13:08 IST

राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. देशातील जनतेने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी दिली. परंतु, केंद्रात जरी मोदींना संधी दिली असली तरी राज्यात आघाडीचं सरकार येईल, किंबाहुना मध्यप्रदेश आणि राजस्थानची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात होईल, अशी आशा आघाडीच्या नेत्यांना आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा मुद्दावर विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार पुनरागमन करताना सत्ता काबीज केली. तीनही राज्यात एकाचवेळी सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. परंतु, त्याचा फारसा उपयोग लोकसभा निवडणुकीत झाला नाही. जनतेचा कल राज्यात जरी काँग्रेसकडे असला तरी देशात मोदी सरकारवर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात होईल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत देखील हाच सूर होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरभरून मते दिली. यावरून महाराष्ट्रातील जनतेने केंद्रीतील मोदी सरकारवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले. मात्र राज्याच्या बाबतीत स्थिती वेगळी आहे. राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

दरम्यान असं झाल्यास विद्यामान सरकारला मोठा धोका आहे. भाजप-शिवसेना युतीचे राज्यात सरकार असून भाजप राज्यात सुसाट आहे. त्यामुळे राज्यात एवढ्या सहजतेने सत्तांतर होईल, याची शक्यता कमीच असल्याचे जाणकरांचे मत आहे.