शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

युतीतील तणावामुळे मनसेचे वेट अॅण्ड वॉच!

By admin | Updated: September 16, 2014 02:44 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी औरंगाबादेत इच्छुकांच्या मुलाखती घेत असतानाच अचानक काढता पाय घेतला.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी औरंगाबादेत इच्छुकांच्या मुलाखती घेत असतानाच अचानक काढता पाय घेतला. तसेच सायंकाळी प्रसिद्धिमाध्यमांनाही सामोरे जाण्याचे टाळले. दोन्हींमागे त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले. मात्र, यामागील खरे कारण हे शिवसेना-भाजपा युतीतील वाढता तणाव असल्याचे बोलले जात आहे. युतीत बेबनाव झाला तर मनसेने भाजपाचा नवीन मित्रपक्ष बनण्याची तयारी चालवल्याचे सूत्रंनी सांगितले. 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी मराठवाडा आणि खान्देशातील इच्छुकांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या. सकाळी 11 वाजता मुलाखतींना सुरुवात झाली. काही मुलाखती झाल्यानंतर प्रकृतीचे कारण सांगून राज तेथून बाहेर पडले. त्यानंतर उर्वरित मुलाखती घेण्याची जबाबदारी गटनेते बाळा नांदगावकर, आ. प्रवीण दरेकर, आ. मंगेश सांगळे आदींवर सोपवून त्यांनी हॉटेल गाठले. दरम्यान, राज हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याने त्यांना मुलाखतींच्या काळातही सतत दिल्ली-मुंबईहून भाजपा नेत्यांचे फोन येत होते. याच कारणामुळे त्यांनी सायंकाळी प्रसिद्धिमाध्यमांनाही टाळले. नियोजित कार्यक्रमानुसार राज ठाकरे सायंकाळी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधणार होते. त्यानुसार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हॉटेलमध्ये गर्दी केली होती. मात्र, राज दोन तास उशिराने प्रसिद्धिमाध्यमांना सामोरे गेले; पण त्यांनी प्रकृती बरी नसल्याचे सांगत आज बोलणार नसल्याचे सांगितले. त्याचे कारणही युतीतील तणाव असल्याचे बोलले जाते. जर शिवसेना-भाजपा युती झाली नाही, तर भाजपाचा सहकारी म्हणून मनसेची महाराष्ट्रात भाजपा-रिपाइं-स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशी युती होण्याची शक्यता आहे.  युतीत बेबनाव झाल्यास राज ठाकरे भाजपाचे नवीन सहकारी राहतील व त्यामुळे त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेण्याचे टाळले. युतीचे काय होते ते बघून राज ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपासोबत जायचे झाल्यास मनसेसाठी 5क् जागाही पुरेशा ठरतील, असे मनसेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. (प्रतिनिधी)