शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

म:हाटमोळ्या कोल्हापुरात उरले मोजकेच कासार

By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST

सौभाग्यालंकार असलेल्या बांगडय़ांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही जात असो वा धर्म; प्रत्येक स्त्रीच्या हातात काचेच्या बांगडय़ा असतात.

इंदुमती गणोश - कोल्हापूर
सौभाग्यालंकार असलेल्या बांगडय़ांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही जात असो वा धर्म; प्रत्येक स्त्रीच्या हातात काचेच्या बांगडय़ा असतात. मात्र कमी उत्पन्न, नाजूक वस्तू असल्याने नुकसानीची सर्वाधिक शक्यता आणि समाजात नसलेला मानसन्मान यामुळे पारंपरिक पद्धतीने बांगडय़ांचा व्यवसाय करीत असलेल्या कुटुंबांतील नवी पिढी या व्यवसायात येण्यास उत्सुक नाही.
कोणत्याही स्त्रीसाठी बांगडी हा सौंदर्यालंकारातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो. शिवाय हा अलंकार सौभाग्याशी जोडलेला असल्याने त्याबद्दल स्त्रियांमध्ये अत्यंत हळव्या भावना असतात.  काही वर्षापूर्वीर्पयत केवळ काचेच्या कचकडी या प्रकारातील बांगडय़ाच आपल्याला माहीत होत्या. आता मात्र काचेमध्ये रंगीबेरंगी, प्लेन असे प्रकार आहेत. अगदी साडेतीन रुपयांपासून ते 15 रुपयांर्पयत एका बांगडीचा दर आहे. या व्यवसायातून वर्षाकाठी कोल्हापुरात चार कोटींच्या आसपास उलाढाल होते. कोल्हापूरमध्ये काचेच्या बांगडय़ा वापरणा:या महिलांचे प्रमाण जास्त आहे. या महिला शहरातील किरकोळ दुकानदारांकडे जाऊन बांगडय़ा घालतात. शहरात  घाऊक पद्धतीने हा व्यवसाय करणा:यांची संख्या मोजून सात आहे. त्यातही दोन-तीन व्यावसायिकांचे उत्पन्न अत्यल्प आहे. 
या घाऊक व्यापा:यांकडून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागांतील किरकोळ विक्रेत्यांकडे बांगडय़ा पाठविल्या जातात. हा व्यवसाय मुख्यत: मुस्लीम, जैन समाजातील नागरिकांकडून केला जातो. 
 
स्पर्धा मेटल, इमिटेशन, प्लास्टिक बांगडय़ांशी.. पूर्वी फक्त काचेच्याच बांगडय़ा प्रचलित होत्या. त्या अतिशय नाजूक असल्याने व सांभाळून ठेवण्याचाच प्रश्न अधिक असल्याने आता मेटल आणि प्लास्टिकच्या बांगडय़ांना तरुण मुली व महिलांमधून अधिक मागणी आहे. जुन्या पिढीतील महिला कायमस्वरूपी काचेच्या बांगडय़ा वापरतात. मेटल-प्लास्टिकमध्येही खडय़ांचे वर्क केलेले, इमिटेशन बांगडय़ा, पार्टीवेअर, फॅन्सी, प्लेन, बालिका वधू, मधुबाला, विद्या बालन पॅटर्न अशा अनेक प्रकारच्या बांगडय़ा बाजारात उपलब्ध आहेत, ज्या दिल्ली, मुंबई, पुण्याहून आणल्या जातात. 
 
कोल्हापुरात आम्ही मोजके लोकच बांगडी उद्योगात आहोत. शहरात बांगडी व्यवसायाला करातून वगळले आहे, पण कोल्हापुरात तशी सूट नाही. या व्यवसायात फारसे उत्पन्न नसल्याने नवी पिढी यात यायला तयार नाही, अशी हताशता अगरवाल बॅँगल्सचे ओमप्रकाश अगरवाल व्यक्त करतात.
 
नुकसानीचा फटका सर्वानाच : देशात काचेच्या बांगडय़ांची निर्मिती फिरोजाबाद या एकाच शहरात केली जाते. येथून या बांगडय़ा सर्व राज्यांत पाठविल्या जातात. स्थानिक घाऊक व्यावसायिकांच्या मागणीनुसार हा माल ट्रकमधून एकत्रच पाठवला जातो. या प्रवासात तसेच घाऊक व्यावसायिकांकडून किरकोळ विक्रेत्यांकडे बांगडय़ा पाठविताना त्या फुटण्याची शक्यता सर्वाधिकअसते. बांगडय़ा हातात चढवितानाही खूप फुटतात. या नुकसानीसाठी विमाही नसल्याने तो घाऊक विक्रेत्यांपासून ते कासारार्पयत सगळ्याच विक्रेत्यांना सोसावा लागतो. 
 
कासार पद्धती उरली ग्रामीण भागातच.. पूर्वी कासार सायकलीवर बांगडय़ांची पिशवी घेऊन गल्लोगल्लीतून फिरत असे. त्यामुळे घरोघरी जाऊन बांगडय़ा भरण्याची पद्धत होती. ही कासार पद्धती आता गावात असली तरी शहरांमधून हद्दपार झाली आहे. अगदीच घरात काही कार्यक्रम असला किंवा लग्नकार्य असले तरच कासार महिलेला घरी बोलवले जाते.