शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अत्यल्प पावसाने नाशकात मका, सोयाबीनचा उतारा घटला, आवकही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:01 IST

बाजारगप्पा :कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे नाशिक जिल्ह्यात खरीप पिकांची स्थिती गंभीर आहे.

- संजय दुनबळे (नाशिक)

कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे नाशिक जिल्ह्यात खरीप पिकांची स्थिती गंभीर आहे. त्याचा परिणाम बाजार समित्यांमधील आवकवर झाला आहे. जिल्ह्यातील लासलगाव, नांदगाव, मालेगाव या बाजार समित्यांमध्ये मका, सोयाबीन, बाजरी या पिकांची आवक सुरू झाली असून, मक्याला साधारणत: १३५० ते १४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. सध्या बाजारात येणारा मका ओला असल्यामुळे भाव कमी-जास्त होत आहे.

लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला २००० ते ३४२८ रुपये प्रतिक्विं टलचा दर मिळत आहे. मक्याला आर्द्रता पाहून भाव मिळत असून, सध्या बाजारात येणारा मका ओला असल्याने साधारणत: १३५० रुपये क्विं टल भाव मिळत आहे. सुका मका असल्यास त्यास १०० ते १२५ रुपये अधिकचा भाव मिळत आहे. लासलगाव बाजार समितीत इतर भुसार मालाचे भाव स्थिर असल्याचे भुसार मालाचे व्यापारी सचिन ब्रह्मेचा यांनी सांगितले. यावर्षी पाऊस कमी असल्याने मालाच्या उताऱ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. याशिवाय ऐन काढणीच्या हंगामात वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने त्याचाही पिकांच्या उताऱ्यावर परिणाम होत आहे. कमी उताऱ्याचा शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही फटका बसण्याची शक्यता ब्रह्मेचा यांनी व्यक्त केली. 

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी ३९ ट्रॉली मक्याची आवक झाली. भाव साधारणत: १०९१ ते १४४६ आणि सरासरी १३४५ रुपये प्रतिक्विं टलपर्यंत होते. बाजरीची ७८ पोती आवक होती. बाजरीला १४२१ ते १७५६ सरासरी १६९० रुपये प्रतिक्विं टल भाव मिळाला. नांदगावी सोयाबीनची आवक नाही. मात्र हरभरा, मूग, गहू, भुईमूग शेंगा यांची आवक आहे. नांदगाव तालुक्यात अत्यल्प पावसाचा सर्वच पिकांना फटका बसला. परिणामी आवक घटली आहे. यामुळे भुसार मालाच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार मालाचे हंगामी लिलाव होत असतात. या ठिकाणी अद्याप कोणतीही आवक सुरू झाली नाही.

मालेगावात गुरुवारी ४० ते ५० ट्रॉली मक्याची आवक झाली. मक्याला येथे १३८० ते १४६० रुपये प्रतिक्विं टलचा दर मिळाला. मक्यात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यास त्याला १२५० ते १३५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. येथे बाजरीची चांगली आवक सुरू झाली असून, बाजरीची प्रतही चांगली असल्याचे व्यापारी भिका कोतकर यांनी सांगितले. पीक काढणीच्या मोसमात पाऊस झाला नसल्याने बाजरी काळी किंवा डागी झालेली नाही.

येथे बाजरीला १४०० पासून १७६० रुपये प्रतिक्विं टलपर्यंत दर मिळाला आहे. गुरुवारी येथे बाजरीची ४०० ते ५०० पोत्यांची आवक झाली होती. या बाजार समितीत गव्हाला १९०० ते २२०० रुपये क्विं टल दर मिळत आहे. मालेगाव बाजार समितीत या काळात १०० ट्रॉली आवक होणे अपेक्षित असताना केवळ ४० ते ५० ट्रॉलीच आवक झाली. अनेक ठिकाणी मका, सोयाबीनला फटका बसला असल्याने या पिकांचा उताराही कमी झाला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी