शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या ‘आवक’चा नीचांक

By admin | Updated: June 5, 2015 23:47 IST

राज्यातील स्थिती; २0१४ मध्ये शेतमालाची आवक निम्यावर.

संतोष वानखडे / वाशिम : २0१४ मध्ये अल्प पावसामुळे राज्यातील बाजार समित्यांमधील शेतमालाच्या आवकने नीचांक गाठला आहे. २0१३ मध्ये ३५९ लाख मेट्रीक टन असलेली शेतमालाची आवक मार्च २0१५ अखेर १६२ लाख मेट्रीक टनावर आली आहे. गत चार वर्षातील हा नीचांक मानला जात आहे. कृषीक्षेत्रात क्रांतीकारक बदल घडत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतकरी नानाविध प्रयोग राबवित असल्याने, साहजिकच शेतमालाचे उत्पादनदेखील वाढत आहे. साधारणत: १0-१२ वर्षात शेतमालाच्या उत्पादनात कमालिची वाढ होत असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आकडेवारीवरून दिसून येते. शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ म्हणून राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील बाजार समित्यांच्या कामांमध्ये समन्वय साधणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास करणे, सर्व बाजार समित्यांमध्ये झालेली आवक व त्यांचे मुल्य याबाबतचा लेखाजोखा ठेवणे आदी जबाबदार्‍या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर सोपविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमांतर्गत राज्यात २0१४ या वर्षात १८0 पणन परवाने दिले आहेत. यापैकी ७0 कार्यरत आहेत. तसेच ३५ खासगी बाजारांना परवाने देण्यात आले असून यापैकी २१ बाजारामध्ये शेतमालाची उलाढाल सुरू आहे. गत पाच वर्षात राज्यभरातील बाजार समित्यांमधील शेतमालाच्या आवकवर नजर टाकली, तर २0१४ या वर्षात शेतमालाच्या आवकने निच्चांक गाठला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. २0१0 मध्ये २२६.११ लाख मेट्रीक टन शेतमालाची आवक होती. २0११ मध्ये २२७.५१, २0१२ मध्ये २४0.९४ लाख मेट्रीक टन शेतमालाची आवक होती. २0१३ मध्ये शेतमालाच्या आवकने उच्चांक गाठला होता. या वर्षात शेतमालाची आवक ३५९.७0 लाख मेट्रीक टनावर गेली होती. २0१४ मध्ये याऊलट घडले. २0१३ मध्ये उच्चांकावर असलेली शेतमालाची आवक २0१४ मध्ये निच्चांकी पातळीवर आली. २0१४ मध्ये १६२.५२ लाख मेट्रीक टनावर शेतमालाची आवक येण्याला विविध घटक कारणीभूत आहेत. अत्यल्प पाऊस, विलंबाने झालेली पेरणी, परतीच्या पावसाने दडी मारणे, पिकांवरील विविध प्रकारची रोगराई यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक २0१४-१५ या वर्षात निच्चांक पातळीवर आल्याचा दावा कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.