शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या ‘आवक’चा नीचांक

By admin | Updated: June 5, 2015 23:47 IST

राज्यातील स्थिती; २0१४ मध्ये शेतमालाची आवक निम्यावर.

संतोष वानखडे / वाशिम : २0१४ मध्ये अल्प पावसामुळे राज्यातील बाजार समित्यांमधील शेतमालाच्या आवकने नीचांक गाठला आहे. २0१३ मध्ये ३५९ लाख मेट्रीक टन असलेली शेतमालाची आवक मार्च २0१५ अखेर १६२ लाख मेट्रीक टनावर आली आहे. गत चार वर्षातील हा नीचांक मानला जात आहे. कृषीक्षेत्रात क्रांतीकारक बदल घडत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतकरी नानाविध प्रयोग राबवित असल्याने, साहजिकच शेतमालाचे उत्पादनदेखील वाढत आहे. साधारणत: १0-१२ वर्षात शेतमालाच्या उत्पादनात कमालिची वाढ होत असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आकडेवारीवरून दिसून येते. शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ म्हणून राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील बाजार समित्यांच्या कामांमध्ये समन्वय साधणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास करणे, सर्व बाजार समित्यांमध्ये झालेली आवक व त्यांचे मुल्य याबाबतचा लेखाजोखा ठेवणे आदी जबाबदार्‍या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर सोपविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमांतर्गत राज्यात २0१४ या वर्षात १८0 पणन परवाने दिले आहेत. यापैकी ७0 कार्यरत आहेत. तसेच ३५ खासगी बाजारांना परवाने देण्यात आले असून यापैकी २१ बाजारामध्ये शेतमालाची उलाढाल सुरू आहे. गत पाच वर्षात राज्यभरातील बाजार समित्यांमधील शेतमालाच्या आवकवर नजर टाकली, तर २0१४ या वर्षात शेतमालाच्या आवकने निच्चांक गाठला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. २0१0 मध्ये २२६.११ लाख मेट्रीक टन शेतमालाची आवक होती. २0११ मध्ये २२७.५१, २0१२ मध्ये २४0.९४ लाख मेट्रीक टन शेतमालाची आवक होती. २0१३ मध्ये शेतमालाच्या आवकने उच्चांक गाठला होता. या वर्षात शेतमालाची आवक ३५९.७0 लाख मेट्रीक टनावर गेली होती. २0१४ मध्ये याऊलट घडले. २0१३ मध्ये उच्चांकावर असलेली शेतमालाची आवक २0१४ मध्ये निच्चांकी पातळीवर आली. २0१४ मध्ये १६२.५२ लाख मेट्रीक टनावर शेतमालाची आवक येण्याला विविध घटक कारणीभूत आहेत. अत्यल्प पाऊस, विलंबाने झालेली पेरणी, परतीच्या पावसाने दडी मारणे, पिकांवरील विविध प्रकारची रोगराई यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक २0१४-१५ या वर्षात निच्चांक पातळीवर आल्याचा दावा कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.