शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलांचे लग्न लावून सरकारने सुरक्षित घर द्यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 04:29 IST

आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याने प्रेमी युगुलास वा त्यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यासह दिला जाणारा छळ

नवी दिल्ली : आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याने प्रेमी युगुलास वा त्यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यासह दिला जाणारा छळ कसा रोखावा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधात्मक, सुधारक व दंडात्मक असे अनेक निर्देश दिले आहेत. संसदेने योग्य कायदा करेपर्यंत यांचे पालन करणे सर्व राज्यांना बंधनकारक असून, त्यासाठी व्यवस्था करण्यासाठी राज्यांना सहा महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.काही महत्वाचे निर्देश प्रतिबंधक उपाय : गेल्या पाच वर्षांत ‘आॅनर किलिंग’च्या वा खाप पंचायतींनी बळजबरी केल्याच्या घटना घडल्या, अशी ठिकाणे हुडकून त्याकडे लक्ष द्यावे. खाप पंचायतीची बैठक बैठक होणार नाही यासाठी पोलिसांनी उपाय योजावेत. तरीही बैठक झाल्यास तिला संबंधित पोलीस उप अधीक्षकांनी उपस्थित राहून व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. बैठकीत प्रेमी युगुल वा त्यांच्या कुटुंबीयांविरोधात निर्णय होणार नाही, याची खात्री करावी.सुधारक उपायतरीही खाप पंचायत भरून, त्यांनी संबंधितांना शिक्षा करण्याचा निर्णय केल्यास संबंधितांवर गुन्हे नोंदवून अटक करावी. अशा तपासात पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे. प्रेमी युगुलास व कुटुंबियांना सुरक्षा देण्याचे उपाय योजावेत. गरजेनुसार त्यांना त्याच वा अन्य जिल्ह्यात हलवावे व धोका दूर होईपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षित घरे’ उपलब्ध करावीत. प्रेमी युगुल स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम आहे का, याची माहिती घ्यावी. त्यांची इच्छा असल्यास त्यांना लग्नास मदत करावी. लग्नानंतरही गरज असणाऱ्या युगुलास नाममात्र शुल्क आकारून एक वर्षापर्यंत राहण्यासाठी ‘सुरक्षित घर’ मिळवून द्यावे.दंडात्मक उपायआंतरजातीय विवाहामुळे होणाºया त्रासाच्या तक्रारी नोंदवून त्यावर त्वरीत कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष सेल स्थापावा. यात जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा समाजकल्याण अधिकारी असावेत. तक्रार नोंदणी, सल्ला व समुपदेश व संरक्षणासाठी विशेष सेलने अहोरात्र हेल्पलाइन सुरु करावी. आॅनर किलिंग वा प्रतिष्ठेसाठी छळाची प्रकरणे विशेष वा जलद गती न्यायालयांत चालवावीत. रोज सुनावणी घेऊन ती शक्यतो सहा महिन्यांत निकाली काढावी. आधी माहिती मिळूनही अशी घटना न रोखणाºया, घटना घडल्यावर आरोपींना लगेच अटक करून खटले दाखल न करणाºया वा कर्तव्यात कसूर करणाºयांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार