शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंत्र्यांच्या घोषणेला एसटीचा खो

By admin | Updated: July 19, 2016 21:19 IST

विद्यार्थ्यांना दरवर्षी एसटीची सवलत पास दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन यावर्षी अशा पासेस शाळेतूनच वितरित करण्याची घोषणा परिवहन

- अविनाश साबापुरे

यवतमाळ, दि.19 - विद्यार्थ्यांना दरवर्षी एसटीची सवलत पास दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन यावर्षी अशा पासेस शाळेतूनच वितरित करण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. परंतु एसटी महामंडळाने या घोषणेची वासलात लावली असून, पासेसकरिता विद्यार्थ्यांन भर पावसात बसस्थानकावरच रांगा लावाव्या लागत आहे. राज्य परिवहन महामंडळ दरवर्षी राज्यातील साधारण १६ लाख विद्यार्थ्यांना मासिक शैक्षणिक सवलती पास वितरित केली जाते. खेडापाड्यातून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दररोज शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ६० टक्के सवलतीच्या पासमुळे मोठा आर्थिक हातभार लागतो. परंतु या पासेस मिळविण्यासाठी सर्व विद्यार्थी एकाच वेळी धाव घेत असल्यामुळे एसटी आगारात गर्दी होऊन विद्यार्थ्यांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागते. ही बाब लक्षत घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित शाळेमधूनच विद्यार्थ्यांना प्रवासी सवलतीच्या पासेस देण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. जून महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू होताच सुरूवातीच्या १० दिवसात एसटी महामंडळाचे कर्मचारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पासेस वाटप करणार अशी घोषणा होती. परंतु शैक्षणिक सत्र सुरू होऊन पंधरवडा लोटल्यावरही हा उपक्रम बासनातच गुंडाळून आहे. राज्य परिवहन महामंडळातील सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शिवाय सध्या एसटीच्या हंगामाचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पासेससाठी शाळांमध्ये अतिरिक्त कर्मचारी पाठविणे शक्य नाही, असे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. काही अधिकारी आपण आगार प्रमुखांना सूचना दिल्याचे सांगून मोकळे होत आहे, तर कर्मचारी मात्र हा उपक्रम राबविणे शक्यच नसल्याचे खासगीत स्पष्ट करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून दररोज यवतमाळात शिक्षणासाठी येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सध्या सवलतीच्या पासेससाठी बस स्थानकात रांगा लावाव्या लागत आहे. यवतमाळातील विविध शाळांमध्ये पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांना दर दिवशी बसस्थानकावरून पासेस वाटप केल्या जात आहे. त्यासाठी त्यांना शाळेतून बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन बसस्थानकावर दिवसभर रांगेत राहावे लागत आहे. खुद्द परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री यांनी घोषित केलेल्या योजनेला महामंडळाच्याच कर्मचाऱ्यांनी हरताळ फासल्याचे दिसत आहे. सर्व आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहे. मात्र हा उपक्रम कोणत्या आगाराने सुरू केला किंवा कोणत्या आगाराने नाही केला, याविषयी माहिती घेऊन कळविण्यात येईल. मात्र सध्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहेच. -मुक्तेश्वर जोशी, विभागीय वाहतूक अधिकारी, यवतमाळ