शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

राज्यात आरटीई प्रवेशाला खो

By admin | Updated: August 23, 2016 01:18 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारपर्यंत केवळ ४७ टक्के जागांवरच प्रवेश झाले आहेत. अद्यापही जवळपास ८० हजार जागा प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात आरटीईचे सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. ‘आरटीई’नुसार आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. या जागांवर प्रवेशासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणा काम करीत आहे. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. राज्यात आरटीईअंतर्गत १ लाख १७ हजार ५४५ जागा आहेत. त्यासाठी केवळ ७४ हजार अर्ज आले होते. आतापर्यंत केवळ ३७ हजार ७४५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला गोंधळाची स्थिती होती. खासगी शाळांकडून परताव्याच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे या प्रवेशाबाबत पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी अनेक पालकांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्याचे टाळल्याचे दिसते.राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. असे असले तरी राज्यातील अनेक शाळांमध्ये एकही प्रवेश झालेला नाही. पालकांकडूनही ठराविक शाळांनाच पसंती मिळाल्याचे दिसते. ज्या मुलांना प्रवेश मिळालेला आहे, त्यापैकी अनेक पालकांनी हवी असलेली शाळा न मिळाल्याने संबंधित शाळेत प्रवेश घेतलेला नाही. आॅगस्ट महिना संपत आला तरी अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरू असून शिक्षण विभाग मुलांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. यावर्षी प्रवेशासाठी तुलनेने कमी अर्ज आल्याचे शिक्षण संचालनालयातून सांगण्यात आले.दरम्यान, शाळांमध्ये रिक्त जागा राहिल्यास संस्थास्तरावर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.>आरटीईचे जिल्हानिहाय झालेले प्रवेश :पुणे ८ हजार ११७, नागपूर ४ हजार ८१८, मुंबई २ हजार ४२३, ठाणे २ हजार ५२५, नाशिक १ हजार ९९०, औरंगाबाद १ हजार ५९०, रायगड १ हजार ३८१, अकोला १ हजार ३१२, जळगाव १ हजार १३७, बुलडाणा ८०२, वाशिम २८८, अमरावती १ हजार ८५०, वर्धा ९२१, भंडारा ३३०, गोंदिया ४१४, गडचिरोली १००, चंद्रपूर ३४१, यवतमाळ ८६५, नांदेड ७६७, हिंगोली ११४, परभणी १२७, जालना ६५४, अहमदनगर १ हजार ३४७, बीड ४४३, लातूर ४९२, उस्मानाबाद ४१२, सोलापूर ५२४, सातारा ५६८, रत्नागिरी १२८, सिंधुदुर्ग ८०, कोल्हापूर २१८, सांगली १६४, पालघर ८७, नंदुरबार ६३, धुळे ३५३.