शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आरटीई प्रवेशाला खो

By admin | Updated: August 23, 2016 01:18 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारपर्यंत केवळ ४७ टक्के जागांवरच प्रवेश झाले आहेत. अद्यापही जवळपास ८० हजार जागा प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात आरटीईचे सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. ‘आरटीई’नुसार आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. या जागांवर प्रवेशासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणा काम करीत आहे. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. राज्यात आरटीईअंतर्गत १ लाख १७ हजार ५४५ जागा आहेत. त्यासाठी केवळ ७४ हजार अर्ज आले होते. आतापर्यंत केवळ ३७ हजार ७४५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला गोंधळाची स्थिती होती. खासगी शाळांकडून परताव्याच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे या प्रवेशाबाबत पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी अनेक पालकांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्याचे टाळल्याचे दिसते.राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. असे असले तरी राज्यातील अनेक शाळांमध्ये एकही प्रवेश झालेला नाही. पालकांकडूनही ठराविक शाळांनाच पसंती मिळाल्याचे दिसते. ज्या मुलांना प्रवेश मिळालेला आहे, त्यापैकी अनेक पालकांनी हवी असलेली शाळा न मिळाल्याने संबंधित शाळेत प्रवेश घेतलेला नाही. आॅगस्ट महिना संपत आला तरी अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरू असून शिक्षण विभाग मुलांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. यावर्षी प्रवेशासाठी तुलनेने कमी अर्ज आल्याचे शिक्षण संचालनालयातून सांगण्यात आले.दरम्यान, शाळांमध्ये रिक्त जागा राहिल्यास संस्थास्तरावर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.>आरटीईचे जिल्हानिहाय झालेले प्रवेश :पुणे ८ हजार ११७, नागपूर ४ हजार ८१८, मुंबई २ हजार ४२३, ठाणे २ हजार ५२५, नाशिक १ हजार ९९०, औरंगाबाद १ हजार ५९०, रायगड १ हजार ३८१, अकोला १ हजार ३१२, जळगाव १ हजार १३७, बुलडाणा ८०२, वाशिम २८८, अमरावती १ हजार ८५०, वर्धा ९२१, भंडारा ३३०, गोंदिया ४१४, गडचिरोली १००, चंद्रपूर ३४१, यवतमाळ ८६५, नांदेड ७६७, हिंगोली ११४, परभणी १२७, जालना ६५४, अहमदनगर १ हजार ३४७, बीड ४४३, लातूर ४९२, उस्मानाबाद ४१२, सोलापूर ५२४, सातारा ५६८, रत्नागिरी १२८, सिंधुदुर्ग ८०, कोल्हापूर २१८, सांगली १६४, पालघर ८७, नंदुरबार ६३, धुळे ३५३.