शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला ‘खो’

By admin | Updated: July 22, 2014 22:13 IST

वृक्षरोपणावर पैशासारखा पाऊस, सहा वर्षात २९७.३८ कोटींचा खर्च, वनक्षेत्र वाढीचा दुष्काळ कायमच,

वाशिम: वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडला जात आहे तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांची अवैध कटाई सुरूच आहे. वृक्षरोपणाचे उद्दिष्ट देणारी यंत्रणा वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला मात्र 'खो' देत आहे. वृक्षरोपणाचा गाजावाजा करणार्‍या यंत्रणेने वृक्ष संवर्धनही गांभीर्याने घेतले तर वनराईच्या घटणार्‍या प्रमाणाला आळा बसल्याशिवाय राहणार नाही.समतोल निसर्गचक्रावरच आपले अस्तित्व असल्याच्या जाणीवेचा मानवाला विसर पडत चालल्याने पर्यावरणाचे ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव जीवसृष्टी पदोपदी घेत आहे. भूमीच्या पोटात शिरून मानवाने अनेक धातू शोधून काढले, कृत्रिम पाऊस पाडला. काही प्रमाणात मानवाने निसर्गावर विजयही मिळविला. मात्र, असे करताना त्याचे पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष होत गेल्याने पर्यावरण प्रदुषित झाले. प्रदुषित पर्यावरणाचे गंभीर परिणाम मानव भोगत आहे. गरजांची पुर्तता आणि भौतिक सुख-संपन्नतेसाठी निसर्गाला संकटात टाकून स्वत:ला सुरक्षित समजणार्‍या मानवाला आता भूतलावरील आपल्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे अनिवार्य ठरू पाहत आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि पावसाळ्यात उन्हाचा उकाडा, हे बनू पाहणारे समिकरण पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालल्याचे द्योतक ठरत आहे. वनविभागाच्या लेखी वाशिम जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५१८४ चौ.कि.मी. असून त्यापैकी केवळ पाच टक्क्याच्या आसपास वनराई डोलत आहे. वनक्षेत्राचा आकडा फुगविण्यासाठी दरवर्षी विविध विभागाच्या सहकार्यातून वृक्षारोपण मोहीम राबविली जाते. मात्र, वृक्ष संवर्धनासाठी ठोस उपाययोजना नसल्याने 'जीवंत' झाडांची संख्या अपेक्षेपेक्षाही कमीच राहत असल्याचे आकडेवारी सांगते. २0१३ या वर्षात जिल्ह्यात सात लाख ४७ हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ठ होते. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाते. मात्र, वृक्ष संवर्धनाचे उद्दिष्टच नसल्याने 'जीवंत' झाडांची संख्या गुलदस्त्यातच आहे. एकिकडे वृक्षारोपण तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर ह्यकुर्‍हाडह्ण कोसळली जात असल्याने वनराईचे प्रत्यक्षातील प्रमाण 'जैसे थे'च राहत आहे. पर्यावरण र्‍हासाच्या संभाव्य धोक्याच्या पृष्ठभूमीवर पर्यावरण संवर्धन करणे, काळाची गरज बनले आहे. प्राचीन काळी निसर्ग नियमांच्या चौकटीत राहणार्‍या मानवाने आता सदर चौकटी उद्ध्वस्त करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. निसर्गावर नानाविध प्रयोग करीत वर्तमानाशी जुळवून घेताना त्याचे भविष्याकडे पार दुर्लक्ष होत गेले आणि येथूनच खर्‍या अर्थाने पर्यावरण र्‍हासाची प्रक्रिया सुरू झाली. मानवाने आपल्या दैनंदिन व अनावश्यक गरजा भागविण्यासाठी निसर्गाशी खेटे घेण्यातदेखील मागे-पुढे पाहिले नाही. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. मानवाने आपल्या या वर्तनात बदल केले नाहीत तर पर्यावरणच मानवी जीवन बदलवून टाकेल.