शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला ‘खो’

By admin | Updated: July 22, 2014 22:13 IST

वृक्षरोपणावर पैशासारखा पाऊस, सहा वर्षात २९७.३८ कोटींचा खर्च, वनक्षेत्र वाढीचा दुष्काळ कायमच,

वाशिम: वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडला जात आहे तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांची अवैध कटाई सुरूच आहे. वृक्षरोपणाचे उद्दिष्ट देणारी यंत्रणा वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला मात्र 'खो' देत आहे. वृक्षरोपणाचा गाजावाजा करणार्‍या यंत्रणेने वृक्ष संवर्धनही गांभीर्याने घेतले तर वनराईच्या घटणार्‍या प्रमाणाला आळा बसल्याशिवाय राहणार नाही.समतोल निसर्गचक्रावरच आपले अस्तित्व असल्याच्या जाणीवेचा मानवाला विसर पडत चालल्याने पर्यावरणाचे ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव जीवसृष्टी पदोपदी घेत आहे. भूमीच्या पोटात शिरून मानवाने अनेक धातू शोधून काढले, कृत्रिम पाऊस पाडला. काही प्रमाणात मानवाने निसर्गावर विजयही मिळविला. मात्र, असे करताना त्याचे पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष होत गेल्याने पर्यावरण प्रदुषित झाले. प्रदुषित पर्यावरणाचे गंभीर परिणाम मानव भोगत आहे. गरजांची पुर्तता आणि भौतिक सुख-संपन्नतेसाठी निसर्गाला संकटात टाकून स्वत:ला सुरक्षित समजणार्‍या मानवाला आता भूतलावरील आपल्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे अनिवार्य ठरू पाहत आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि पावसाळ्यात उन्हाचा उकाडा, हे बनू पाहणारे समिकरण पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालल्याचे द्योतक ठरत आहे. वनविभागाच्या लेखी वाशिम जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५१८४ चौ.कि.मी. असून त्यापैकी केवळ पाच टक्क्याच्या आसपास वनराई डोलत आहे. वनक्षेत्राचा आकडा फुगविण्यासाठी दरवर्षी विविध विभागाच्या सहकार्यातून वृक्षारोपण मोहीम राबविली जाते. मात्र, वृक्ष संवर्धनासाठी ठोस उपाययोजना नसल्याने 'जीवंत' झाडांची संख्या अपेक्षेपेक्षाही कमीच राहत असल्याचे आकडेवारी सांगते. २0१३ या वर्षात जिल्ह्यात सात लाख ४७ हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ठ होते. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाते. मात्र, वृक्ष संवर्धनाचे उद्दिष्टच नसल्याने 'जीवंत' झाडांची संख्या गुलदस्त्यातच आहे. एकिकडे वृक्षारोपण तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर ह्यकुर्‍हाडह्ण कोसळली जात असल्याने वनराईचे प्रत्यक्षातील प्रमाण 'जैसे थे'च राहत आहे. पर्यावरण र्‍हासाच्या संभाव्य धोक्याच्या पृष्ठभूमीवर पर्यावरण संवर्धन करणे, काळाची गरज बनले आहे. प्राचीन काळी निसर्ग नियमांच्या चौकटीत राहणार्‍या मानवाने आता सदर चौकटी उद्ध्वस्त करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. निसर्गावर नानाविध प्रयोग करीत वर्तमानाशी जुळवून घेताना त्याचे भविष्याकडे पार दुर्लक्ष होत गेले आणि येथूनच खर्‍या अर्थाने पर्यावरण र्‍हासाची प्रक्रिया सुरू झाली. मानवाने आपल्या दैनंदिन व अनावश्यक गरजा भागविण्यासाठी निसर्गाशी खेटे घेण्यातदेखील मागे-पुढे पाहिले नाही. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. मानवाने आपल्या या वर्तनात बदल केले नाहीत तर पर्यावरणच मानवी जीवन बदलवून टाकेल.