शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

नळांना तोट्या बसवा... पाणी वाचवा!

By admin | Updated: May 14, 2016 02:58 IST

सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई : सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातारा, सोलापूर, औरंगाबाद आदी शहरात हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.पाण्याचे महत्त्व आता कळून चुकल्याने सातारा शहरातील युवक, महिला पाणी बचतीसाठी विविध उपाय करत आहेत. निमिश शहा यांनी शहरातील विविध भागांतील नळांना तोट्या बसवून वाया जाणारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याचे मोल समजू लागले आहे. त्यामुळे पाणी बचतीची चळवळ सुरू झाली आहे. ‘जलमित्र अभियान’अंतर्गत साताऱ्यातील निमिश शहा यांनी मित्रांना घेऊन सदर बझार येथील हौसिंग सोेसायटी, बंगले, झोपडपट्टी या भागात फिरून तोट्या नसलेल्या नळांचा सर्व्हे केला. त्यानंतर एक प्लंबर बरोबर घेऊन त्यांनी जवळपास वीस नळांना तोट्या बसविल्या. जलसाक्षरतेसाठी औरंगाबाद येथील जलमित्र समोर आले आहेत. ज्यांच्याकडील नळाची तोटी खराब असेल, पाईपमधून पाणी गळत असेल, अशा नागरिकांनी जर या जलमित्रांना फोन केला तर हे जलमित्र येऊन कोणतेही शुल्क न घेता ते दुरुस्त करून देत आहेत. शेकडो लिटर पाणी वाया जाऊ नये, यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात औरंगाबादचे मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आवाहन केले आहे की, नळाची तोटी खराब आहे, तिची दुरुस्ती होत नसल्याने शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे. दुरुस्तीअभावी जर पाणी वाया जात असेल तर हे दुर्दैव आहे. यासाठी आम्ही प्लंबरचे पथक तयार केले आहे.सोलापुरात शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीने सार्वजनिक नळांना तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेतली. आजवर या ग्रुपच्या वतीने किशननगर, मौलाली चौक, कुर्बान हुसेननगर आदी भागातील ७० नळांना तोट्या बसविण्यात आल्याची माहिती रसूल पठाण यांनी ‘लोकमत’ ला दिली. (प्रतिनिधी)पाणीटंचाई यू ट्यूबवर : पाणीटंचाईच्या दाहकतेचे चित्र समोर येण्यासाठी जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील स्वराज्य पथनाट्य गु्रपच्या काही तरुणांनी एकत्रित येऊन जनजागृतीपर गाण्याचा व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड केला आहे. यू ट्यूबवर ‘सेव्ह द ट्री, सेव्ह द वॉटर, एमजेसी जळगाव’ ही लिंक टाकल्यास हा चार मिनिटांचा व्हिडीओ पाहावयास मिळतो. सध्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.लक्षवेधी : जागतिक तज्ज्ञांच्या मते भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १५० कोटी होणार आहे. माणसाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी माणसी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरलं जातं. नागपूर, पुणे आणि मुंबईसारख्या शहरात हेच प्रमाण २०० लिटरपर्यंत आहे. पाण्याचा असाच वापर होत राहिल्यास पाणी समस्या आणखी उग्र होणार आहे.