शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नळांना तोट्या बसवा... पाणी वाचवा!

By admin | Updated: May 14, 2016 02:58 IST

सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई : सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातारा, सोलापूर, औरंगाबाद आदी शहरात हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.पाण्याचे महत्त्व आता कळून चुकल्याने सातारा शहरातील युवक, महिला पाणी बचतीसाठी विविध उपाय करत आहेत. निमिश शहा यांनी शहरातील विविध भागांतील नळांना तोट्या बसवून वाया जाणारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याचे मोल समजू लागले आहे. त्यामुळे पाणी बचतीची चळवळ सुरू झाली आहे. ‘जलमित्र अभियान’अंतर्गत साताऱ्यातील निमिश शहा यांनी मित्रांना घेऊन सदर बझार येथील हौसिंग सोेसायटी, बंगले, झोपडपट्टी या भागात फिरून तोट्या नसलेल्या नळांचा सर्व्हे केला. त्यानंतर एक प्लंबर बरोबर घेऊन त्यांनी जवळपास वीस नळांना तोट्या बसविल्या. जलसाक्षरतेसाठी औरंगाबाद येथील जलमित्र समोर आले आहेत. ज्यांच्याकडील नळाची तोटी खराब असेल, पाईपमधून पाणी गळत असेल, अशा नागरिकांनी जर या जलमित्रांना फोन केला तर हे जलमित्र येऊन कोणतेही शुल्क न घेता ते दुरुस्त करून देत आहेत. शेकडो लिटर पाणी वाया जाऊ नये, यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात औरंगाबादचे मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आवाहन केले आहे की, नळाची तोटी खराब आहे, तिची दुरुस्ती होत नसल्याने शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे. दुरुस्तीअभावी जर पाणी वाया जात असेल तर हे दुर्दैव आहे. यासाठी आम्ही प्लंबरचे पथक तयार केले आहे.सोलापुरात शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीने सार्वजनिक नळांना तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेतली. आजवर या ग्रुपच्या वतीने किशननगर, मौलाली चौक, कुर्बान हुसेननगर आदी भागातील ७० नळांना तोट्या बसविण्यात आल्याची माहिती रसूल पठाण यांनी ‘लोकमत’ ला दिली. (प्रतिनिधी)पाणीटंचाई यू ट्यूबवर : पाणीटंचाईच्या दाहकतेचे चित्र समोर येण्यासाठी जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील स्वराज्य पथनाट्य गु्रपच्या काही तरुणांनी एकत्रित येऊन जनजागृतीपर गाण्याचा व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड केला आहे. यू ट्यूबवर ‘सेव्ह द ट्री, सेव्ह द वॉटर, एमजेसी जळगाव’ ही लिंक टाकल्यास हा चार मिनिटांचा व्हिडीओ पाहावयास मिळतो. सध्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.लक्षवेधी : जागतिक तज्ज्ञांच्या मते भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १५० कोटी होणार आहे. माणसाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी माणसी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरलं जातं. नागपूर, पुणे आणि मुंबईसारख्या शहरात हेच प्रमाण २०० लिटरपर्यंत आहे. पाण्याचा असाच वापर होत राहिल्यास पाणी समस्या आणखी उग्र होणार आहे.