शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
5
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
6
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
7
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
8
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
9
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
10
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
11
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
12
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
13
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
14
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
15
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
16
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
17
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
18
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
19
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
20
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर

भगवान बालाजींचे चरण स्पर्श करुन दर्शन

By admin | Updated: October 13, 2016 20:46 IST

शहरातील १३६ वर्षाची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता झाली. त्यानंतर भगवान बालाजी आणि श्रीदेवी व भूदेवी

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 13 -  शहरातील १३६ वर्षाची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता झाली. त्यानंतर भगवान बालाजी आणि श्रीदेवी व भूदेवी यांची मूर्ती या रथातून खाली उतरावून गाभाऱ्याबाहेर भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवण्यात आल्या. वर्षातून फक्त एकदाच भाविकांना भगवान बालाजी यांच्या मूर्तीचे चरण स्पर्श करुन दर्शन घेण्याची संधी मिळते. त्यामुळे दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीघ लागली होती.दरवर्षी विजयादशमीनंतर एकादशीला शहरातून बालाजी रथयात्रा निघते. यंदाही एकादशीला बुधवारी १२ आॅक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता बालाजी रथयात्रा पारंपारिक मार्गाने रथयात्रा मार्गस्थ झाली. रथयात्रेचा समारोप दुसऱ्यादिवशी सकाळी ११ वाजता खोलगल्लीतील बालाजी मंदिराजवळ झाला.विधीपूर्वक मूर्त्या उतरविल्या - रथयात्रा मंदिरावर पोहचल्यानंतर भगवान बालाजी आणि श्रीदेवी व भूदेवी यांच्या मूर्र्तींची विधीपूर्वक पूजाअर्चा केल्यानंतर रथातून खाली उतरविण्यात आल्या. मूर्ती खाली उतरवितांना आपला हात मूर्तीला लागावा यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.रथातून तीनही मूर्ती खाली उतरविल्यानंतर त्यांची गाभाऱ्याबाहेर पूजा करुन त्या भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. वर्षातून एकदाच भगवान बालाजी यांचे अगदी जवळून चरण स्पर्श करुन दर्शन होते. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी उसळली होती. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मूर्ती दर्शनासाठी बाहेर ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी पंचामृताने अभिषेक- सायंकाळी सहा वाजता तिघा मूर्त्यांचा पंचामृताने विधीपूर्वक अभिषेक करण्यात येतो. हा विधी सुमारे एक तास चालतो. त्यानंतर रात्री नेहमीप्रमाणे आरती होती.बालाजींची पालखी - रात्री आरतीनंतर तिघी मूर्त्या बाहेरच ठेवलेल्या असता. दुसऱ्या दिवशी पालखीतून भगवान बालाजीसह तिनही मूर्ती पांझरा नदीकाठावरील घाटावर नेण्यात येतात. याठिकाणी मूर्र्तींना अभ्यंग स्रान केल्यानंतर पालखी ही गरुड बागेत परंपरेनुसार मुक्कामी राहते. याठिकाणी एक दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी दुसऱ्या सकाळी मंदिराकडे मार्गस्थ झाली. पालखी मंदिरावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी विधीपूर्वक पूजाअर्चा केल्यानंतर तीनही मूर्र्तींची गाभाऱ्यात स्थापना केली जाते. त्यानंतर बालाजी रथोत्सव सोहळा पूर्ण होतो.