शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भगवान बालाजींचे चरण स्पर्श करुन दर्शन

By admin | Updated: October 13, 2016 20:46 IST

शहरातील १३६ वर्षाची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता झाली. त्यानंतर भगवान बालाजी आणि श्रीदेवी व भूदेवी

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 13 -  शहरातील १३६ वर्षाची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता झाली. त्यानंतर भगवान बालाजी आणि श्रीदेवी व भूदेवी यांची मूर्ती या रथातून खाली उतरावून गाभाऱ्याबाहेर भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवण्यात आल्या. वर्षातून फक्त एकदाच भाविकांना भगवान बालाजी यांच्या मूर्तीचे चरण स्पर्श करुन दर्शन घेण्याची संधी मिळते. त्यामुळे दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीघ लागली होती.दरवर्षी विजयादशमीनंतर एकादशीला शहरातून बालाजी रथयात्रा निघते. यंदाही एकादशीला बुधवारी १२ आॅक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता बालाजी रथयात्रा पारंपारिक मार्गाने रथयात्रा मार्गस्थ झाली. रथयात्रेचा समारोप दुसऱ्यादिवशी सकाळी ११ वाजता खोलगल्लीतील बालाजी मंदिराजवळ झाला.विधीपूर्वक मूर्त्या उतरविल्या - रथयात्रा मंदिरावर पोहचल्यानंतर भगवान बालाजी आणि श्रीदेवी व भूदेवी यांच्या मूर्र्तींची विधीपूर्वक पूजाअर्चा केल्यानंतर रथातून खाली उतरविण्यात आल्या. मूर्ती खाली उतरवितांना आपला हात मूर्तीला लागावा यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.रथातून तीनही मूर्ती खाली उतरविल्यानंतर त्यांची गाभाऱ्याबाहेर पूजा करुन त्या भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. वर्षातून एकदाच भगवान बालाजी यांचे अगदी जवळून चरण स्पर्श करुन दर्शन होते. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी उसळली होती. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मूर्ती दर्शनासाठी बाहेर ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी पंचामृताने अभिषेक- सायंकाळी सहा वाजता तिघा मूर्त्यांचा पंचामृताने विधीपूर्वक अभिषेक करण्यात येतो. हा विधी सुमारे एक तास चालतो. त्यानंतर रात्री नेहमीप्रमाणे आरती होती.बालाजींची पालखी - रात्री आरतीनंतर तिघी मूर्त्या बाहेरच ठेवलेल्या असता. दुसऱ्या दिवशी पालखीतून भगवान बालाजीसह तिनही मूर्ती पांझरा नदीकाठावरील घाटावर नेण्यात येतात. याठिकाणी मूर्र्तींना अभ्यंग स्रान केल्यानंतर पालखी ही गरुड बागेत परंपरेनुसार मुक्कामी राहते. याठिकाणी एक दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी दुसऱ्या सकाळी मंदिराकडे मार्गस्थ झाली. पालखी मंदिरावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी विधीपूर्वक पूजाअर्चा केल्यानंतर तीनही मूर्र्तींची गाभाऱ्यात स्थापना केली जाते. त्यानंतर बालाजी रथोत्सव सोहळा पूर्ण होतो.