शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदीजी, मुंबईतील नद्यांकडेही लक्ष द्या

By admin | Updated: April 26, 2016 02:26 IST

देश स्वच्छ करण्यासाठी सरसावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता मुंबईकरांनी शहरातील चारही नद्यांच्या स्वच्छतेसाठी हाक दिली आहे.

सचिन लुंगसे,

मुंबई- ‘स्वच्छ भारत’ अभियानाची हाक देत अवघा देश स्वच्छ करण्यासाठी सरसावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता मुंबईकरांनी शहरातील चारही नद्यांच्या स्वच्छतेसाठी हाक दिली आहे. मुंबईमधील मिठी, दहिसर, ओशिवरा आणि पोईसर या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि रिव्हर मार्चतर्फे ‘आॅनलाइन याचिका’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेला जलपुरुष राजेंद्र सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. ही ‘आॅनलाइन याचिका’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला सादर करण्यात आली आहे.२००५ साली मिठी नदीला आलेल्या महापुरानंतर अवघी मुंबई पाण्याखाली गेली होती. परिणामी मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मिठी नदीच्या खोलीकरणासह रुंदीकरणाचे काम हाती घेतले. आता मिठीचे पात्र रुंद झाले आहे. नदीची खोली वाढली असली तरी औद्योगिक जलप्रदूषणामुळे तिचा श्वास अद्यापही कोंडलेला आहे. शिवाय मुंबई पश्चिम उपनगरांतील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या नद्यांची अवस्थाही अत्यंत वाईट आहे. मिठीसह या तिन्ही नद्या स्वच्छ व्हाव्यात, याकरिता महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि रिव्हर मार्च यांनी व्यापक चळवळ हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)