शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

मोदीजी, मुंबईतील नद्यांकडेही लक्ष द्या

By admin | Updated: April 26, 2016 02:26 IST

देश स्वच्छ करण्यासाठी सरसावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता मुंबईकरांनी शहरातील चारही नद्यांच्या स्वच्छतेसाठी हाक दिली आहे.

सचिन लुंगसे,

मुंबई- ‘स्वच्छ भारत’ अभियानाची हाक देत अवघा देश स्वच्छ करण्यासाठी सरसावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता मुंबईकरांनी शहरातील चारही नद्यांच्या स्वच्छतेसाठी हाक दिली आहे. मुंबईमधील मिठी, दहिसर, ओशिवरा आणि पोईसर या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि रिव्हर मार्चतर्फे ‘आॅनलाइन याचिका’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेला जलपुरुष राजेंद्र सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. ही ‘आॅनलाइन याचिका’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला सादर करण्यात आली आहे.२००५ साली मिठी नदीला आलेल्या महापुरानंतर अवघी मुंबई पाण्याखाली गेली होती. परिणामी मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मिठी नदीच्या खोलीकरणासह रुंदीकरणाचे काम हाती घेतले. आता मिठीचे पात्र रुंद झाले आहे. नदीची खोली वाढली असली तरी औद्योगिक जलप्रदूषणामुळे तिचा श्वास अद्यापही कोंडलेला आहे. शिवाय मुंबई पश्चिम उपनगरांतील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या नद्यांची अवस्थाही अत्यंत वाईट आहे. मिठीसह या तिन्ही नद्या स्वच्छ व्हाव्यात, याकरिता महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि रिव्हर मार्च यांनी व्यापक चळवळ हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)