शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तापल्या ऊन्हात रांगा वाढल्या....टॅक्सीवाले, रिक्षावाले गेले तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 17:31 IST

भर उन्हाळ्यात टॅक्सी आणि रिक्षाचालकांचा पत्ता नसल्याने सामान्य प्रवाशी त्रस्त झाले. तापत्या उन्हातील वाढत्या रांगांमागे नेमके कारण काय?

तुम्ही जर मुंबई, ठाण्यात रहात असाल तर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला टॅक्सी किंवा रिक्षा मिळणे अधिकच कठिण झाल्याचे लक्षात आले असेल. राज ठाकरेंच्या मनसेचे काही खळखटॅक सुरु नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी रिक्षा तोडफोडीची नवी मोहीम सुरु केलेली नाही तरीही टॅक्सी, रिक्षा का वेळेवर मिळत नाही, हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल. डोक्यावर तापत्या ऊन्हात उभे राहून टॅक्सी-रिक्षांची वाट पाहताना जवळपास निम्म्यापेक्षाही जास्त टॅक्सी, रिक्षा कुठे गायब झाल्या यी विचारानं तुमचे डोके अधिकच तापलेही असेल.

www.lokmat.com ने गायब झालेल्या टॅक्सी-रिक्षांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. काही चालकांशी संवाद साधला तेव्हा लक्षात आले नोकरदार जसे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बाहेरगावी जातात. आपल्या गावी जातात तसेच टॅक्सी-रिक्षा-टॅक्सीचालक दीर्घ काळासाठी जात असतात. रामनरेश गुप्ता या कांदिवलीच्या रिक्षाचालकाने दिलेली माहिती खूपच धक्कादायक. तो म्हणाला, आमच्या एका स्टॅण्डवर १४३५ रिक्षा आहेत. त्यापैकी सध्या ७०० रिक्षाही धावत नाहीत. त्यांच्या स्टॅण्डवरचे बहुसंख्य रिक्षाचालक लग्नासाठी तर काही इतर काही कामांसाठी गेले आहेत. रिक्षा टॅक्सी चालवणारे मुख्यत्वे उत्तर भारतीय आहेत. मे-जून हे दोन महिने उत्तरप्रदेश-बिहारसाठी लग्नाच्या मुहुर्तांचे. संयुक्त कुटुंबातून आलेल्या या उत्तरभारतीयांना कौटुंबिक कार्यक्रमांना त्यातही लग्नसोहळ्यांना जाणे एकप्रकारे बंधनकारकच असते. जर घरातील कुणी नातेवाईकांच्या लग्नास हजेरी लावली नाही तर ते अपमानास्पद मानले जाते. त्या कुटुंबाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे उत्तरभारतीय परवडो न परवडो लग्नसोहळ्यासाठी उत्तर भारतातील गावी जातातच जातात. आताही तसेच घडले आहे. त्यामुळे तुम्ही टॅक्सी शोधाल तर मिळत नाही. नेहमीच लवकर न मिळणारी रिक्षा आणखी वेळ खाते आहे. सुभाष ठाकूर या टॅक्सीचालकाच्या मते उत्तरप्रदेशात जाणे सोपे नसते, आधी तिकिटच मिळत नाही. मिळाले तरी ते वेळेत मिळेल असे नाही. त्यात पुन्हा येण्यासाठी लागणारा काही दिवसांचा वेळ लक्षात घेऊन आमची लोकं फुर्सतनेच जातात. एकदा गेले की मग्न लग्नसोहळे, घराची डागडुजी तसेच शेतीचीही काही कामे उरकतात. त्यामुळे किमान महिनाभर तरी फटका बसतो. त्यामुळे आता टॅक्सी-रिक्षा नेहमीप्रमाणे वेळेवर मिळत नसेल तर उगाच डोके तापवू नका. शांत रहा. रागाला सुट्टी दिल्याशिवाय पर्यायच नाही. कारण टॅक्सी-रिक्षाच सुट्टीवर आहेत.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकMumbaiमुंबईthaneठाणे