शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तापल्या ऊन्हात रांगा वाढल्या....टॅक्सीवाले, रिक्षावाले गेले तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 17:31 IST

भर उन्हाळ्यात टॅक्सी आणि रिक्षाचालकांचा पत्ता नसल्याने सामान्य प्रवाशी त्रस्त झाले. तापत्या उन्हातील वाढत्या रांगांमागे नेमके कारण काय?

तुम्ही जर मुंबई, ठाण्यात रहात असाल तर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला टॅक्सी किंवा रिक्षा मिळणे अधिकच कठिण झाल्याचे लक्षात आले असेल. राज ठाकरेंच्या मनसेचे काही खळखटॅक सुरु नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी रिक्षा तोडफोडीची नवी मोहीम सुरु केलेली नाही तरीही टॅक्सी, रिक्षा का वेळेवर मिळत नाही, हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल. डोक्यावर तापत्या ऊन्हात उभे राहून टॅक्सी-रिक्षांची वाट पाहताना जवळपास निम्म्यापेक्षाही जास्त टॅक्सी, रिक्षा कुठे गायब झाल्या यी विचारानं तुमचे डोके अधिकच तापलेही असेल.

www.lokmat.com ने गायब झालेल्या टॅक्सी-रिक्षांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. काही चालकांशी संवाद साधला तेव्हा लक्षात आले नोकरदार जसे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बाहेरगावी जातात. आपल्या गावी जातात तसेच टॅक्सी-रिक्षा-टॅक्सीचालक दीर्घ काळासाठी जात असतात. रामनरेश गुप्ता या कांदिवलीच्या रिक्षाचालकाने दिलेली माहिती खूपच धक्कादायक. तो म्हणाला, आमच्या एका स्टॅण्डवर १४३५ रिक्षा आहेत. त्यापैकी सध्या ७०० रिक्षाही धावत नाहीत. त्यांच्या स्टॅण्डवरचे बहुसंख्य रिक्षाचालक लग्नासाठी तर काही इतर काही कामांसाठी गेले आहेत. रिक्षा टॅक्सी चालवणारे मुख्यत्वे उत्तर भारतीय आहेत. मे-जून हे दोन महिने उत्तरप्रदेश-बिहारसाठी लग्नाच्या मुहुर्तांचे. संयुक्त कुटुंबातून आलेल्या या उत्तरभारतीयांना कौटुंबिक कार्यक्रमांना त्यातही लग्नसोहळ्यांना जाणे एकप्रकारे बंधनकारकच असते. जर घरातील कुणी नातेवाईकांच्या लग्नास हजेरी लावली नाही तर ते अपमानास्पद मानले जाते. त्या कुटुंबाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे उत्तरभारतीय परवडो न परवडो लग्नसोहळ्यासाठी उत्तर भारतातील गावी जातातच जातात. आताही तसेच घडले आहे. त्यामुळे तुम्ही टॅक्सी शोधाल तर मिळत नाही. नेहमीच लवकर न मिळणारी रिक्षा आणखी वेळ खाते आहे. सुभाष ठाकूर या टॅक्सीचालकाच्या मते उत्तरप्रदेशात जाणे सोपे नसते, आधी तिकिटच मिळत नाही. मिळाले तरी ते वेळेत मिळेल असे नाही. त्यात पुन्हा येण्यासाठी लागणारा काही दिवसांचा वेळ लक्षात घेऊन आमची लोकं फुर्सतनेच जातात. एकदा गेले की मग्न लग्नसोहळे, घराची डागडुजी तसेच शेतीचीही काही कामे उरकतात. त्यामुळे किमान महिनाभर तरी फटका बसतो. त्यामुळे आता टॅक्सी-रिक्षा नेहमीप्रमाणे वेळेवर मिळत नसेल तर उगाच डोके तापवू नका. शांत रहा. रागाला सुट्टी दिल्याशिवाय पर्यायच नाही. कारण टॅक्सी-रिक्षाच सुट्टीवर आहेत.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकMumbaiमुंबईthaneठाणे