शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

लोणार सरोवराच्या पाण्याच्या क्षारांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: July 22, 2015 22:50 IST

पाण्याची पातळी घटल्याचा परिणाम : पाणी झाले आणखी खारट.

लोणार (बुलडाणा): सतत ३ वर्षांंपासून अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक लोणार सरोवराचीही पाण्याची पातळी घटली असून, सरोवराच्या पाण्याची क्षारता ११.५0 एवढी वाढल्याने, पाणी आणखी खारट झाले आहे. शहरातील सांडपाण्यासह धारेचे पाणी सरोवरात वर्षानुवर्षापासून जात असल्यामुळे सरोवराचे खारे पाणी गोडे पाण्यात रुपांतरीत होऊ लागल्याने खार्‍या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्था हळूहळू नष्ट होत चालल्याची भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. उल्कापातामुळे तयार झालेल्या या सरोवरात जाणारे गोडे पाणी अडविण्याची मागणी जगभरातील शास्त्रज्ञांनी केली होती. पूर्वी सरोवराच्या खार्‍या पाण्यात दुर्मिळ चुंबकीय जिवाणूसह एकूण ३९ दुर्मीळ वास्तव्यास होते. सरोवराच्या तळापासून ६0 टक्के उंचीपर्यंंत विषारी व दुर्गंंध पसरविणारा हायड्रोजन सल्फाईड वायू होता. उरलेल्या ४0 टक्के पाण्यात ऑक्सीजनच नसल्याने, या खार्‍या पाण्यात कोणतेही प्राणी किंवा वनस्पती जिवंत राहू शकत नाही. पाण्याच्या पृष्ठभागावर हरीत निल शैवाल (ब्लू ग्रीन अँल्गी) हा शेवाळाचा दुर्मिळ प्रकार मोठय़ा प्रमाणात होता. यात स्पायरुलीना नावाचे जिवाणू आढळून येतात; मात्र मध्यंतरीच्या काळात सरोवराच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर होऊ लागल्याने खार्‍या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्था नष्ट होत असल्याची भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. गत ३ वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सरोवराच्या पाण्याची पातळी घटली असून, त्यामुळे पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब सरोवरातील दुर्मिळ जैविक संस्थेसाठी पोषक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सरोवरातील पाण्याचा सामू ९ वरुन ११.५0 पर्यंंत वाढला आहे. त्यामुळे सरोवरातील दुर्मिळ जैवीक संस्था जिवंत राहण्यास मदत होईल, असे पुणे येथील खगोल विश्‍व मंडळाचे मयुरेश प्रभुणे यांनी स्पष्ट केले. *पावसाचे प्रमाण कमी झाल्याचा परिणाम सतत ३ वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आणि पाण्याच्या पातळीत घट झाली. त्यामुळे सरोवराच्या पाण्याचा सामू ९ वरुन ११.५0 एवढा वाढल्याने सरोवराचे पाणी पुन्हा खारट झाले आहे.