शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

लोणार सरोवराच्या पाण्याच्या क्षारांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: July 22, 2015 22:50 IST

पाण्याची पातळी घटल्याचा परिणाम : पाणी झाले आणखी खारट.

लोणार (बुलडाणा): सतत ३ वर्षांंपासून अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक लोणार सरोवराचीही पाण्याची पातळी घटली असून, सरोवराच्या पाण्याची क्षारता ११.५0 एवढी वाढल्याने, पाणी आणखी खारट झाले आहे. शहरातील सांडपाण्यासह धारेचे पाणी सरोवरात वर्षानुवर्षापासून जात असल्यामुळे सरोवराचे खारे पाणी गोडे पाण्यात रुपांतरीत होऊ लागल्याने खार्‍या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्था हळूहळू नष्ट होत चालल्याची भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. उल्कापातामुळे तयार झालेल्या या सरोवरात जाणारे गोडे पाणी अडविण्याची मागणी जगभरातील शास्त्रज्ञांनी केली होती. पूर्वी सरोवराच्या खार्‍या पाण्यात दुर्मिळ चुंबकीय जिवाणूसह एकूण ३९ दुर्मीळ वास्तव्यास होते. सरोवराच्या तळापासून ६0 टक्के उंचीपर्यंंत विषारी व दुर्गंंध पसरविणारा हायड्रोजन सल्फाईड वायू होता. उरलेल्या ४0 टक्के पाण्यात ऑक्सीजनच नसल्याने, या खार्‍या पाण्यात कोणतेही प्राणी किंवा वनस्पती जिवंत राहू शकत नाही. पाण्याच्या पृष्ठभागावर हरीत निल शैवाल (ब्लू ग्रीन अँल्गी) हा शेवाळाचा दुर्मिळ प्रकार मोठय़ा प्रमाणात होता. यात स्पायरुलीना नावाचे जिवाणू आढळून येतात; मात्र मध्यंतरीच्या काळात सरोवराच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर होऊ लागल्याने खार्‍या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्था नष्ट होत असल्याची भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. गत ३ वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सरोवराच्या पाण्याची पातळी घटली असून, त्यामुळे पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब सरोवरातील दुर्मिळ जैविक संस्थेसाठी पोषक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सरोवरातील पाण्याचा सामू ९ वरुन ११.५0 पर्यंंत वाढला आहे. त्यामुळे सरोवरातील दुर्मिळ जैवीक संस्था जिवंत राहण्यास मदत होईल, असे पुणे येथील खगोल विश्‍व मंडळाचे मयुरेश प्रभुणे यांनी स्पष्ट केले. *पावसाचे प्रमाण कमी झाल्याचा परिणाम सतत ३ वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आणि पाण्याच्या पातळीत घट झाली. त्यामुळे सरोवराच्या पाण्याचा सामू ९ वरुन ११.५0 एवढा वाढल्याने सरोवराचे पाणी पुन्हा खारट झाले आहे.