शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ची भूमिका ठरली ‘लोकचळवळ’

By admin | Updated: September 28, 2015 21:32 IST

सातारा : गावोगावी नागरिकांच्या उठावातून डॉल्बीमुक्त विसर्जन

सातारा : लोकहिताबरोबरच लोकभावनेलाही जपण्याचा ‘लोकमत’चा प्रबोधनमार्ग पुन्हा एकदा यशस्वी झाला आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता तर्कसुसंगत सुस्पष्ट विचार, ठाम भूमिका, सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आणि खुली संवादप्रक्रिया अशा टप्प्यांनी ‘डॉल्बीमुक्ती’चा मार्ग मंगलमूर्तींच्या साक्षीने सातारा जिल्ह्यात प्रशस्त झाला आहे. ही लोकचळवळ गावागावात, घरोघरी पोहोचण्यासाठी सर्वांचेच सहकार्य ‘लोकमत’ला लाभले आहे. जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक गावांपैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या गावांतच डॉल्बी वाजली; तीही एकाच स्पीकरचा वापर करून!गेल्या वर्षी डॉल्बीमुळे भिंत कोसळून साताऱ्यात तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. कर्णकर्कश डॉल्बीमुळे होणारे असे दुष्परिणाम निदर्शनास आणून देतानाच पारंपरिक मिरवणुकीचा थाट अधोरेखित करून ‘लोकमत’ने यावर्षी वाचकांना साद घातली. पहिल्या दिवसापासूनच मिळालेला प्रतिसाद पाहता लोकभावना नेमकी काय आहे, हे सर्वांनाच उमगत गेले. भुर्इंज गावाने डॉल्बीमुक्तीचा श्रीगणेशा ठरावाद्वारे केला आणि अनेक गावे खडबडून जागी झाली. ‘आपल्याही गावात असा क्रांतिकारी निर्णय घ्यायचा,’ असे ठरवून गावागावांत बैठका झाल्या. अशातच तीव्र दुष्काळाची छाया राज्यासह जिल्ह्यावरही पसरली. गणेशोत्सवात पैशांची उधळपट्टी न करता दुष्काळग्रस्तांना हात द्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ने केले. पोलीस प्रशासनानेही या चळवळीला सक्रिय पाठबळ देत गावागावात बैठका घेऊन आवाहने केली. शहरासह जिल्ह्यात अनेक ढोलपथके नव्याने स्थापन करून तरुणांनी कसून सराव सुरू केला.डॉल्बीला परवानगीवरून कोर्टकचेऱ्या झाल्या; मात्र तोपर्यंत नागरिकांचा निर्णय पक्का झाला होता. शेवटच्या टप्प्यात ‘लोकमत’च्या कार्यालयात परिचर्चा घेण्यात आली. डॉल्बीमालकांच्या प्रतिनिधीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी, विधीज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ, महिला प्रतिनिधी, मंडळांचा प्रतिनिधी, ढोलपथकांचा प्रतिनिधी असे दहा समाजघटक ‘लोकमत’ने एका टेबलवर आणले. यावेळी झालेल्या चर्चेच्या वार्तांकनातून डॉल्बीच्या सर्वच अंगांवर प्रकाशझोत पडला. या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन नागरिकांनी शिस्तबद्धतेत आनंद शोधला आणि त्यांना तो भरभरून मिळालाही! (प्रतिनिधी)‘लोकमत’ ने सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अत्यंत चांगल्या प्रकारे मांडला. यामुळे वाचकांमध्येच एक सकारात्मक चळवळ निर्माण झाली. सार्वजनिक गणेश मंडळे व जनता यांनीच स्वत:हून या चळवळीला साथ दिली. त्यामुळे प्रशासनाचे काम सोपे झाले. जनतेला सुखाने राहता आलं पाहिजे, ही जिल्हा प्रशासनाची भूमिका आहे. सातारा शहरातील २५ तर संपूर्ण जिल्ह्यातील १00 क्षेत्रे शांतता क्षेत्र म्हणून आम्ही जाहीर केली होती. यातून ४00 ते ५00 डेसिबलपर्यंत जाणारे ध्वनीचे आवाज कमी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस यंत्रणेने अत्यंत चांगले काम केले. - अश्विन मुदगल, जिल्हाधिकारीचार स्पीकर, दोन ‘बास’साताऱ्यातील मिरवणुकीत डॉल्बी अभावानेच दिसत होती. मुख्य मिरवणुकीत ज्यांनी डॉल्बीचा वापर केला, त्या मंडळांनीही केवळ चार स्पीकर आणि दोन ‘बास’ किंवा ‘बेस’चा वापर केला. त्यामुळे डॉल्बीचा आवाज आपोआपच मर्यादित राहिला. मुख्य मिरवणुकीतून डॉल्बीच्या भिंती गायब होऊन जास्तीत जास्त सात स्पीकर पाहायला मिळाले.