शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

‘लोकमत’ची भूमिका ठरली ‘लोकचळवळ’

By admin | Updated: September 28, 2015 21:32 IST

सातारा : गावोगावी नागरिकांच्या उठावातून डॉल्बीमुक्त विसर्जन

सातारा : लोकहिताबरोबरच लोकभावनेलाही जपण्याचा ‘लोकमत’चा प्रबोधनमार्ग पुन्हा एकदा यशस्वी झाला आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता तर्कसुसंगत सुस्पष्ट विचार, ठाम भूमिका, सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आणि खुली संवादप्रक्रिया अशा टप्प्यांनी ‘डॉल्बीमुक्ती’चा मार्ग मंगलमूर्तींच्या साक्षीने सातारा जिल्ह्यात प्रशस्त झाला आहे. ही लोकचळवळ गावागावात, घरोघरी पोहोचण्यासाठी सर्वांचेच सहकार्य ‘लोकमत’ला लाभले आहे. जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक गावांपैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या गावांतच डॉल्बी वाजली; तीही एकाच स्पीकरचा वापर करून!गेल्या वर्षी डॉल्बीमुळे भिंत कोसळून साताऱ्यात तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. कर्णकर्कश डॉल्बीमुळे होणारे असे दुष्परिणाम निदर्शनास आणून देतानाच पारंपरिक मिरवणुकीचा थाट अधोरेखित करून ‘लोकमत’ने यावर्षी वाचकांना साद घातली. पहिल्या दिवसापासूनच मिळालेला प्रतिसाद पाहता लोकभावना नेमकी काय आहे, हे सर्वांनाच उमगत गेले. भुर्इंज गावाने डॉल्बीमुक्तीचा श्रीगणेशा ठरावाद्वारे केला आणि अनेक गावे खडबडून जागी झाली. ‘आपल्याही गावात असा क्रांतिकारी निर्णय घ्यायचा,’ असे ठरवून गावागावांत बैठका झाल्या. अशातच तीव्र दुष्काळाची छाया राज्यासह जिल्ह्यावरही पसरली. गणेशोत्सवात पैशांची उधळपट्टी न करता दुष्काळग्रस्तांना हात द्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ने केले. पोलीस प्रशासनानेही या चळवळीला सक्रिय पाठबळ देत गावागावात बैठका घेऊन आवाहने केली. शहरासह जिल्ह्यात अनेक ढोलपथके नव्याने स्थापन करून तरुणांनी कसून सराव सुरू केला.डॉल्बीला परवानगीवरून कोर्टकचेऱ्या झाल्या; मात्र तोपर्यंत नागरिकांचा निर्णय पक्का झाला होता. शेवटच्या टप्प्यात ‘लोकमत’च्या कार्यालयात परिचर्चा घेण्यात आली. डॉल्बीमालकांच्या प्रतिनिधीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी, विधीज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ, महिला प्रतिनिधी, मंडळांचा प्रतिनिधी, ढोलपथकांचा प्रतिनिधी असे दहा समाजघटक ‘लोकमत’ने एका टेबलवर आणले. यावेळी झालेल्या चर्चेच्या वार्तांकनातून डॉल्बीच्या सर्वच अंगांवर प्रकाशझोत पडला. या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन नागरिकांनी शिस्तबद्धतेत आनंद शोधला आणि त्यांना तो भरभरून मिळालाही! (प्रतिनिधी)‘लोकमत’ ने सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अत्यंत चांगल्या प्रकारे मांडला. यामुळे वाचकांमध्येच एक सकारात्मक चळवळ निर्माण झाली. सार्वजनिक गणेश मंडळे व जनता यांनीच स्वत:हून या चळवळीला साथ दिली. त्यामुळे प्रशासनाचे काम सोपे झाले. जनतेला सुखाने राहता आलं पाहिजे, ही जिल्हा प्रशासनाची भूमिका आहे. सातारा शहरातील २५ तर संपूर्ण जिल्ह्यातील १00 क्षेत्रे शांतता क्षेत्र म्हणून आम्ही जाहीर केली होती. यातून ४00 ते ५00 डेसिबलपर्यंत जाणारे ध्वनीचे आवाज कमी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस यंत्रणेने अत्यंत चांगले काम केले. - अश्विन मुदगल, जिल्हाधिकारीचार स्पीकर, दोन ‘बास’साताऱ्यातील मिरवणुकीत डॉल्बी अभावानेच दिसत होती. मुख्य मिरवणुकीत ज्यांनी डॉल्बीचा वापर केला, त्या मंडळांनीही केवळ चार स्पीकर आणि दोन ‘बास’ किंवा ‘बेस’चा वापर केला. त्यामुळे डॉल्बीचा आवाज आपोआपच मर्यादित राहिला. मुख्य मिरवणुकीतून डॉल्बीच्या भिंती गायब होऊन जास्तीत जास्त सात स्पीकर पाहायला मिळाले.