शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार हा सत्याच्या बाजूने हवा, राजकीयदृष्ट्या माध्यमांचे धुव्रीकरण - मंत्री सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:25 IST

Lokmat National Media Conclave: देशात कधीही माध्यमांचे धुव्रीकरण होऊ शकत नाही असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

नागपूर - कुणीही पत्रकार सत्तेच्या विरोधात नव्हे, सत्तेच्या बाजूने नव्हे तर सत्याच्या बाजूने असायला हवं. त्यामुळे धुव्रीकरणाचा विषयच येत नाही. जेव्हा संधी मिळते तेव्हा विचार बेधडक मांडा, मी जे वाचले, शिकले ते समोर मांडले. विचारात बदलाची आवश्यकता असू शकते. आपल्याला समाजाला बदलायचं आहे. त्यात माझे योगदान सकारात्मक आहे की नकारात्मक आहे त्याचे आत्मचिंतन स्वत: करायला हवा असं मत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले. 

नागपूर इथं होणाऱ्या लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते, मुनगंटीवार म्हणाले की, माध्यमांचे धुव्रीकरण होतंय तर माझं उत्तर आहे - नाही, देशात कधीही माध्यमांचे धुव्रीकरण होऊ शकत नाही. विश्वातील ३ संस्कृतींना महान मानले जाते. त्यातील २ संस्कृती नष्ट झाली परंतु भारतीय संस्कृती तशीच कायम आहे. आपल्या संस्कृतीत सहिष्णुता आहे. आपल्या देशात लुटायला खूप होते म्हणून आक्रमण झाली. नाहीतर ना मुघल आले असते ना इंग्रज. कुठल्याही देशात राहिलो तर सूर्य एकच असतो. धुव्रीकरण भाषा आपण का करतो? प्रत्येकजण आपापल्या नजरेने पाहतो. प्रत्येकाचा आपापला विचार आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत दुषित दृष्टीनं जे पाहू ते दुषितच दिसते. धुव्रीकरण कसं होऊ शकते? राजकीय चौकटीच्या बाहेर हजारो विषय आहे ते आपण देऊ शकतो. राजकारणाच्या दृष्टीने धुव्रीकरण दिसते. मोदींच्या विरोधात आणि बाजूने कोण त्यातून आपण हे पाहतोय. आर्थिकदृष्ट्या लोकांना साक्षर बनवणे, जलप्रदूषण, पर्यावरण असे अनेक विषय चिंतनासाठी आहेत. वृत्तपत्र राजकीय केंद्रीत का असतं? वेगवेगळे विषय मांडू शकतात. या देशाला अनेक विषयांवर पुढे नेण्यासाठी काम होऊ शकते. पर्यावरणाला सुरक्षित ठेवणे हा धुव्रीकरणाचा विषय कसा होऊ शकतो? महिलांना स्वावलंबी करणे यात कुठे धुव्रीकरण? पत्रकारांची जबाबदारी आहे असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

दरम्यान, मोदींनी वाईट काम केले तर निश्चित त्यावर लिहिलेच पाहिजे. चंद्रपूरात कुठलीही बातमी आली तरी गांभीर्याने घ्या असं मी कार्यालयात सर्वांना सूचित केले आहे. मी अनेकदा यूट्युबर पत्रकारांची भाषणे ऐकतो. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहतो. काहींच्या चेहऱ्यावर धुतराष्ट्राचा भाव असतो. धुव्रीकरणात प्रेम असू नाही. निंदा असू नये. टीका करायला हवी. जिथे चांगले होत आहे तिथे कौतुकही असायला हवं. विरोधही तर्कसंगत असायला हवा. जे काम करायचं ते प्रामाणिकपणे करा. बातमी लिहिताना तर्क असायला हवा. आपण तोंड बंद करू शकतो, डोळे बंद करू शकतो पण कान बंद करू शकत नाही असंही मुनगंटीवार म्हणाले. 

मी पण पत्रकारितेची पदवी घेतलीयमी राजकीय नेता आहे परंतु मी माध्यमाची पदवी घेतली आहे. Bacholor of Journalisum केलंय, मी M.com, MA केलंय. आणि ही पदवी त्या काळात घेतलीय जेव्हा नागपूर विद्यापीठात हा कोर्स होतो. त्यासाठी ६०० अर्ज यायचे आणि त्यातील ४० जणांची निवड व्हायची. आम्हाला १२ विषय होते, एकाही विषयात अनुत्तीर्ण झाले तरी पुरवणी परीक्षेत पुन्हा सर्व विषयांची परीक्षा द्यावी लागते. जर एक चुकीची बातमी दिली तर त्याचा प्रभाव सर्व समाजावर पडू शकतो असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार