शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पुण्यातील लोकमान्य टिळक व भाऊसाहेब रंगारी हा वाद निव्वळ मुर्खपणा- राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 15:53 IST

पुण्यात सुरू असलेला लोकमान्य टिळक व भाऊसाहेब रंगारी हा वाद म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे.

ठळक मुद्दे पुण्यात सुरू असलेला लोकमान्य टिळक व भाऊसाहेब रंगारी हा वाद म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. आतापर्यंत थोर पुरूषांना जातीत विभागले जात होते, आता देवांचीही विभागणी केली जात आहे असे ते म्हणाले.

पुणे, दि. 19-  पुण्यात सुरू असलेला लोकमान्य टिळक व भाऊसाहेब रंगारी हा वाद म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. आतापर्यंत थोर पुरूषांना जातीत विभागले जात होते, आता देवांचीही विभागणी केली जात आहे असे ते म्हणाले.

पक्ष संघटनेच्या कामासाठी म्हणून ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर मतप्रदर्शन केले. प्रत्येक वेळी याप्रकारे संवाद साधणे शक्य होत नाही. वर्तमानपत्र, मासिक काढणे आता शक्य नाही. तसे वातावरण राहिलेले नाही. त्यामुळे आता सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह होणार आहे. लवकरच माझे फेसबूक पेज ओपन होईल, तोपर्यंत फेसव्हॅल्यू वाढवून घेत आहे अशी कोटी त्यांनी केली. या पेजवर व्यंगचित्रांपासून ताज्या घडामोडींवरील भाष्यापर्यंत सर्व काही असेल असे ते म्हणाले.

कोणताही राजकीय पक्ष घ्या, त्यांचा विकास व्हायला काही वेळ लागला आहे. आमच्याकडे दुसरी फळी नाही असे सांगितले जाते, पण त्याला काही वेळ लागेल. सध्याची स्थिती चांगली नाही. भाजपाच्या राजकीय यशामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्व कमी होत चालले आहे, त्यांचे धोरणही तसेच दिसते यावर बोलताना ठाकरे यांनी येत्या २१ सप्टेंबरला आपण मुंबईत पक्षाचा मेळावा घेणार आहोत, त्यात सर्व गोष्टी विस्ताराने बोलणार आहे असे सांगितले. पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकडून शहारातील परिस्थिती जाणून घेत आहे. लवकरच पदाधिकाºयांची नेमणुका केल्या जातील आणि त्यात नक्कीच नवे चेहरे दिसतील असे संकेत त्यांनी दिले. मुंबईतील मेळाव्यानंतर पुण्यातही मेळावा होईल अशी माहिती ठाकरे यांनी दिली.