शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...जेव्हा ड्रायव्हरला मतदानापासून रोखणारा उमेदवार एका मताने पडतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 18:01 IST

माझ्या एका मताने काय होणार, अशी अनेकांची भावना असते. मात्र भारताच्या इतिहासात अनेकांना एका मतामुळे पराभव पत्करावा लागला आहे. या एका मताची किंमत या उमेदवारांना नक्कीच कळली असेल.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत प्रत्येकांन मतदान करावे यासाठी विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत आहे. आजही अनेक जण मतदानाच्या दिवशी मिळालेली सुट्टी मतदान न करता बाहेरगावी घालवतात. माझ्या एका मताने काय होणार, अशी अनेकांची भावना असते. मात्र भारताच्या इतिहासात अनेकांना एका मतामुळे पराभव पत्करावा लागला आहे. या एका मताची किंमत या उमेदवारांना नक्कीच कळली असेल.

कर्नाटकमध्ये २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल धर्मनिरपेक्षचे उमेदवार ए.आर. कृष्णमूर्ती यांचा काँग्रेसच्या आर. ध्रुवनारायण यांच्याविरुद्ध संथेमाराहल्ली दक्षिण मतदार संघातून एका मताने पराभव झाला होता. कृष्णामूर्ती यांना ४०७५१ मते मिळाली होती. तर ध्रुवनारायण यांना ४०७५२ मते पडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, कृष्णमूर्ती यांनी आपल्या ड्रायव्हरलाच मतदान करण्यापासून रोखले होते.

राजस्थानमध्ये २००८ विधानसभा निवडणुकीत देखील अशी घटना घडली होती. राजस्थान काँग्रेसचे प्रमुख सी.पी. जोशी यांचा भाजपच्या कल्याणसिंह चौहान यांच्याविरुद्ध एका मताने पराभव झाला होता. जोशी यांना ६२२१५ तर चौहान यांना ६२२१६ मते मिळाली होती. जोशी यांची आई, बायको आणि ड्रायव्हर यांनी मतदान केले नव्हते. त्यामुळे मतदान करण्याचे महत्त्व जोशी यांना खऱ्या अर्थाने कळले यात शंका नाही.

मुंबई महानगर पालिकेत २०१७ मध्ये अशीच घटना घडली होती. महापालिकेतील २२० वार्डमधील उमेदवारांना एका मताचे महत्त्व नक्कीच कळले असेल. या निवडणुकीत सुरुवातीला शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांचा विजय झाला होता. परंतु, भाजप उमेदवार अतुल शाह यांनी नव्याने मतमोजणी घेण्याची मागणी केली. त्यात दोघांना प्रत्येक ५९४६ मते मिळाली होती. त्यानंतर लॉटरी काढण्यात आली. यामध्ये नगरसेवक पदाची माळ शाह यांच्या गळ्यात पडली होती. परंतु या ठिकाणी दोघांपैकी एकाला एक मत मिळाले असते, तरी निकाल वेगळाच राहिला असता. या घटनांवरून एक मत किती महत्त्वाचे हे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या महत्त्वपूर्ण मताचे दान करायलाच हवे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान