शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

Lok Sabha Election 2019 आघाडीची पापे धुण्यात गेली पाच वर्षे--आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 15:29 IST

काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कारकीर्दीत झालेली पापे धुण्यासाठी आमची पाच वर्षे गेली आहेत. आता आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र बनविण्यासाठी

ठळक मुद्देआमच्यातील वाद हा सत्तेसाठी नव्हता, तर जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न होता

शिराळा : काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कारकीर्दीत झालेली पापे धुण्यासाठी आमची पाच वर्षे गेली आहेत. आता आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र बनविण्यासाठी युतीची सत्ता केंद्रात येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जर काँग्रेस आघाडीची सत्ता आली, तर काश्मीर देशापासून तुटेल, असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

शिराळा येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव नाईक, धैर्यशील माने, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, राहुल महाडिक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, अभिजित नाईक, जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, उदयसिंह नाईक, अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाकरे म्हणाले, शिवसेना व भाजप यांचे एकत्र सरकार असतानाही आम्ही योग्य कामासाठी साथ व चूक तेथे विरोध करत होतो. आमच्यातील वाद हा सत्तेसाठी नव्हता, तर जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न होता. ज्यात आम्ही यशस्वी झालो. 

यावेळी आमदार नाईक म्हणाले, आम्ही जिवंत नागाची पूजा करतो, मात्र कुणी डिवचले तर सोडत नाही. आमच्यावर टीका करणारे वाळव्याच्या नेत्याच्या जिवावर नाचत आहेत. अ‍ॅड. भगतसिंग नाईक, भरत गराडे, स्वप्नील निकम, नीलेश आवटे, विद्याधर कुलकर्णी, प्रकाश पाटील यांनीही विचार मांडले. सभेस देवयानी नाईक, राजश्री यादव, सत्यजित कदम, विकास देशमुख, वैभवी कुलकर्णी, सीमा कदम उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगली