शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 आघाडीची पापे धुण्यात गेली पाच वर्षे--आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 15:29 IST

काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कारकीर्दीत झालेली पापे धुण्यासाठी आमची पाच वर्षे गेली आहेत. आता आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र बनविण्यासाठी

ठळक मुद्देआमच्यातील वाद हा सत्तेसाठी नव्हता, तर जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न होता

शिराळा : काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कारकीर्दीत झालेली पापे धुण्यासाठी आमची पाच वर्षे गेली आहेत. आता आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र बनविण्यासाठी युतीची सत्ता केंद्रात येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जर काँग्रेस आघाडीची सत्ता आली, तर काश्मीर देशापासून तुटेल, असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

शिराळा येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव नाईक, धैर्यशील माने, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, राहुल महाडिक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, अभिजित नाईक, जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, उदयसिंह नाईक, अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाकरे म्हणाले, शिवसेना व भाजप यांचे एकत्र सरकार असतानाही आम्ही योग्य कामासाठी साथ व चूक तेथे विरोध करत होतो. आमच्यातील वाद हा सत्तेसाठी नव्हता, तर जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न होता. ज्यात आम्ही यशस्वी झालो. 

यावेळी आमदार नाईक म्हणाले, आम्ही जिवंत नागाची पूजा करतो, मात्र कुणी डिवचले तर सोडत नाही. आमच्यावर टीका करणारे वाळव्याच्या नेत्याच्या जिवावर नाचत आहेत. अ‍ॅड. भगतसिंग नाईक, भरत गराडे, स्वप्नील निकम, नीलेश आवटे, विद्याधर कुलकर्णी, प्रकाश पाटील यांनीही विचार मांडले. सभेस देवयानी नाईक, राजश्री यादव, सत्यजित कदम, विकास देशमुख, वैभवी कुलकर्णी, सीमा कदम उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगली