शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदान आलं दीड दिवसावर; काय चाललंय तरुणाईच्या मनात? 

By सायली शिर्के | Updated: April 27, 2019 18:01 IST

तरुण मतदारांची मतं ही निर्णायक ठरतील, असं बोललं जातं. त्यामुळे तो या मतदानाकडे कसं पाहतोय, यावर बरंच काही अवलंबून आहे. त्याचाच एक छोटा प्रयत्न आम्ही केलाय... बघा, काय म्हणतेय तरुणाई.

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी, २९ एप्रिलला होतंय. राज्यात पहिल्या टप्प्यात सात, दुसऱ्या टप्प्यात दहा, तिसऱ्या टप्प्यात १४ मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं. आता तब्बल १७ मतदारसंघांमधील नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात. प्रत्येक उमेदवाराने प्रतिस्पर्ध्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आपल्यालाच मत देण्याचं आवाहन केलं आहे. आपण मतदारसंघासाठी काय-काय करू, याची मोठ्ठी यादीही दिली आहे. स्टार प्रचारकांची, बड्या नेत्यांची मदत घेऊन 'इमेज बिल्डिंग'चा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता पुढचा दीड दिवस मतदारांचा आहे - आपला आहे.

लोकशाहीत जनतेचं मत अमूल्य आहे. त्यामुळे ते विचारपूर्वक देणं हे आपलं कर्तव्य आहे. पुढचा दीड दिवस हा खरं तर त्याचसाठी आहे, असं म्हणायला हरकत नाही कुणी-कुणी काय-काय सांगितलंय आणि ते तो खरंच करू शकतो का, याचा अंदाज बांधून आपल्याला आपलं मत ठरवायचं आहे. तरुण मतदारांची मतं ही निर्णायक ठरतील, असं बोललं जातं. त्यामुळे तो या मतदानाकडे कसं पाहतोय, यावर बरंच काही अवलंबून आहे. त्याचाच एक छोटा प्रयत्न आम्ही केलाय... बघा, काय म्हणतेय तरुणाई.

आपलं बहुमुल्य मत न विकता, मतदानाचा हक्क बजावा

2019 हे वर्ष राजकीय घडामोडींमुळे लक्षात राहणारं असेल. विविध पक्ष, संघटना स्वतः चं राजकीय चातुर्य पणाला लावत आहेत. एकमेकांवर टीका करून मत मिळवण्याचा प्रयत्न  चालू आहे. सध्याची निवडणूक वैचारिक न राहता ती व्यक्तिकेंद्रीत झालेली आहे. मतांसाठी मतदारांना विविध अमिष दाखवली जात आहे. मात्र लोकांनी आपलं बहुमुल्य मत न विकता आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. 

-  अनिल मटकर, भांडुप

पक्ष नाही तर उमेदवार पाहून करणार मतदान

मतदान हा खूप महत्त्वाचा हक्क असून सर्वांनी तो न चुकता बजावला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी जनजागृती केली जाते मात्र अजूनही अनेक लोक आपला हक्क बजावत नाहीत. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. नागरिक या नात्याने आता योग्य उमेदवार निवडणं गरजेचं असणार आहे. त्यामुळेच यंदा कोणत्याही पक्ष पाहून नाही तर उमेदवार आणि त्याने केलेली कामे पाहून मी मतदान करणार आहे. 

- शामली देवरे, नाशिक 

 

लोकहिताची कामं करणाऱ्या पक्षाला पाठिंबा

राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र देशाच्या सुरक्षिततेचा प्रामुख्याने विचार करणाऱ्या आणि लोकहिताची कामं करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार आहे. तसेच पाणी , वाहतूक यासारख्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर निवडणुकांनंतर प्रामुख्याने काम होणं गरजेचं आहे. त्यामुळे कामं करणाऱ्या उमेदवाराला मत देणार. 

- राहुल मोहिते, परळ

 

मतदान हा फक्त अधिकार नाही तर कर्तव्य

राजकीय पक्ष प्रचारादरम्यान लोकशाहीचे गुणगाण गाताना दिसतात. नागरिकांना मतदानाच्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असतं. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. अनेक जण आपल्या एका मताने काय फरक पडणार असा विचार करतात मात्र त्यांनी तसा विचार न करता आपलं मत हे केवळ मत नसून आपलं कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा. आपलं एक मत चांगला समाज घडवण्यास नक्कीच मदत करू शकतं. 

- सुषमा शिरसट, विक्रोळी

 

राजकारणाकडे गांभीर्याने पाहून मतदान करा

भारताचा विकास हा भारतीय नागरिकांच्या हाती आहे. विशेष म्हणजे तरुणाईची यामध्ये मुख्य भूमिका आहे. त्यामुळेच प्रत्येक सुजाण नागरिकाने राजकारणाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं असणार आहे. मतदान हा आपल्याला देण्यात आलेला विशेष अधिकार असून त्याचा सदुपयोग केला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता कायद्यांचे उल्लंघन न करणारा तसेच लोकांच्या हिताचा विचार करणारा नेता निवडणं महत्त्वाचं असणार आहे. 

- अनिकेत सुर्वे, कांदिवली

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदानElectionनिवडणूकMumbaiमुंबई