शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
3
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
4
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
5
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
6
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
7
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
8
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
9
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
10
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
11
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
12
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
13
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
14
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
15
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
16
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
17
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
18
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
19
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
20
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
Daily Top 2Weekly Top 5

मतदान आलं दीड दिवसावर; काय चाललंय तरुणाईच्या मनात? 

By सायली शिर्के | Updated: April 27, 2019 18:01 IST

तरुण मतदारांची मतं ही निर्णायक ठरतील, असं बोललं जातं. त्यामुळे तो या मतदानाकडे कसं पाहतोय, यावर बरंच काही अवलंबून आहे. त्याचाच एक छोटा प्रयत्न आम्ही केलाय... बघा, काय म्हणतेय तरुणाई.

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी, २९ एप्रिलला होतंय. राज्यात पहिल्या टप्प्यात सात, दुसऱ्या टप्प्यात दहा, तिसऱ्या टप्प्यात १४ मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं. आता तब्बल १७ मतदारसंघांमधील नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात. प्रत्येक उमेदवाराने प्रतिस्पर्ध्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आपल्यालाच मत देण्याचं आवाहन केलं आहे. आपण मतदारसंघासाठी काय-काय करू, याची मोठ्ठी यादीही दिली आहे. स्टार प्रचारकांची, बड्या नेत्यांची मदत घेऊन 'इमेज बिल्डिंग'चा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता पुढचा दीड दिवस मतदारांचा आहे - आपला आहे.

लोकशाहीत जनतेचं मत अमूल्य आहे. त्यामुळे ते विचारपूर्वक देणं हे आपलं कर्तव्य आहे. पुढचा दीड दिवस हा खरं तर त्याचसाठी आहे, असं म्हणायला हरकत नाही कुणी-कुणी काय-काय सांगितलंय आणि ते तो खरंच करू शकतो का, याचा अंदाज बांधून आपल्याला आपलं मत ठरवायचं आहे. तरुण मतदारांची मतं ही निर्णायक ठरतील, असं बोललं जातं. त्यामुळे तो या मतदानाकडे कसं पाहतोय, यावर बरंच काही अवलंबून आहे. त्याचाच एक छोटा प्रयत्न आम्ही केलाय... बघा, काय म्हणतेय तरुणाई.

आपलं बहुमुल्य मत न विकता, मतदानाचा हक्क बजावा

2019 हे वर्ष राजकीय घडामोडींमुळे लक्षात राहणारं असेल. विविध पक्ष, संघटना स्वतः चं राजकीय चातुर्य पणाला लावत आहेत. एकमेकांवर टीका करून मत मिळवण्याचा प्रयत्न  चालू आहे. सध्याची निवडणूक वैचारिक न राहता ती व्यक्तिकेंद्रीत झालेली आहे. मतांसाठी मतदारांना विविध अमिष दाखवली जात आहे. मात्र लोकांनी आपलं बहुमुल्य मत न विकता आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. 

-  अनिल मटकर, भांडुप

पक्ष नाही तर उमेदवार पाहून करणार मतदान

मतदान हा खूप महत्त्वाचा हक्क असून सर्वांनी तो न चुकता बजावला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी जनजागृती केली जाते मात्र अजूनही अनेक लोक आपला हक्क बजावत नाहीत. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. नागरिक या नात्याने आता योग्य उमेदवार निवडणं गरजेचं असणार आहे. त्यामुळेच यंदा कोणत्याही पक्ष पाहून नाही तर उमेदवार आणि त्याने केलेली कामे पाहून मी मतदान करणार आहे. 

- शामली देवरे, नाशिक 

 

लोकहिताची कामं करणाऱ्या पक्षाला पाठिंबा

राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र देशाच्या सुरक्षिततेचा प्रामुख्याने विचार करणाऱ्या आणि लोकहिताची कामं करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार आहे. तसेच पाणी , वाहतूक यासारख्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर निवडणुकांनंतर प्रामुख्याने काम होणं गरजेचं आहे. त्यामुळे कामं करणाऱ्या उमेदवाराला मत देणार. 

- राहुल मोहिते, परळ

 

मतदान हा फक्त अधिकार नाही तर कर्तव्य

राजकीय पक्ष प्रचारादरम्यान लोकशाहीचे गुणगाण गाताना दिसतात. नागरिकांना मतदानाच्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असतं. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. अनेक जण आपल्या एका मताने काय फरक पडणार असा विचार करतात मात्र त्यांनी तसा विचार न करता आपलं मत हे केवळ मत नसून आपलं कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा. आपलं एक मत चांगला समाज घडवण्यास नक्कीच मदत करू शकतं. 

- सुषमा शिरसट, विक्रोळी

 

राजकारणाकडे गांभीर्याने पाहून मतदान करा

भारताचा विकास हा भारतीय नागरिकांच्या हाती आहे. विशेष म्हणजे तरुणाईची यामध्ये मुख्य भूमिका आहे. त्यामुळेच प्रत्येक सुजाण नागरिकाने राजकारणाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं असणार आहे. मतदान हा आपल्याला देण्यात आलेला विशेष अधिकार असून त्याचा सदुपयोग केला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता कायद्यांचे उल्लंघन न करणारा तसेच लोकांच्या हिताचा विचार करणारा नेता निवडणं महत्त्वाचं असणार आहे. 

- अनिकेत सुर्वे, कांदिवली

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदानElectionनिवडणूकMumbaiमुंबई