शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आता निवडणुकीतही 'थर्ड अम्पायर' ! पुढाऱ्यांच्या अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 11:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ पूर्वी आणि सत्तेत आल्यानंतरचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. यातून काही व्हिडिओ काढून पंतप्रधान मोदींची त्यावेळची आणि आताची भूमिका यात पडलेला फरक दाखविण्यात येत आहे.

मुंबई - प्रगत तंत्रज्ञानामुळे क्रिकेट आणि विविध खेळांमध्ये पंचांचा निर्णय योग्य की आयोग्य हे पाहणे शक्य झाले. कालांतराने पंच अर्थात अम्पायर निर्णय देण्यास असमर्थ असेल किंवा त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्यास ते निर्णयाची जबाबदारी थर्ड अम्पायरकडे पाठवतात. थर्ड अम्पायर काळजीपूर्वी स्लो मोशनमध्ये व्हिडिओ पाहतात आणि त्यावर निर्णय देतात. तशीच काहीशी स्थिती आता राजकारणात देखील पाहायला मिळत आहे. यामध्ये 'थर्ड अम्पायर' जनता जरी असली तरी मुख्य अम्पायरची भूमिका राजकीय पुढारीच निभावत असल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ पूर्वी आणि सत्तेत आल्यानंतरचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. यातून काही व्हिडिओ काढून पंतप्रधान मोदींची त्यावेळची आणि आताची भूमिका यात पडलेला फरक दाखविण्यात येत आहे. ही बाब भाजपसाठी आणि भाजपच्या लोकसभा उमेदवारांसाठी अडचणीची ठरत आहे. तर विरोधकांकडून या व्हिडिओचा धारदार शस्त्राप्रमाणे वापर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारविरुद्ध यलगार पुकारला आहे. राज ठाकरे सध्या मोदींचे जुने व्हिडिओ दाखवून पुराव्यासह भाजपवर जाहीर सभांमधून घणाघाती टीका करत आहेत. त्यातच राज यांची भाषणे लाईव्ह असतात, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. राज यांनी मोदींच्या पूर्वीची भाषणे दाखविण्यास सुरुवात केल्यापासून भाजपविषयी चौकाचौकात चर्चा रंगत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील राज यांच्या भाषणांच्या क्लिप शेअर करण्यात येत आहे. हे सगळं व्हिडिओ तयार करणे सोपे झाल्यामुळे शक्य होत आहे. सध्या व्हिडिओ तयार करणे अवघड नसून मोबाईलच्या मदतीने देखील चांगल्या प्रतीचे रेकॉर्डींग करता येते. तसेच रेकॉर्डेड तो व्हिडिओ आपल्याकडे कायम ठेवता येतो.

व्हिडिओमुळे क्रिकेट सारख्या खेळात रिप्ले पाहून थर्ड अम्पायरला निर्णय देणे शक्य झाले. त्याप्रमाणे आता जुन्या व्हिडिओमुळे जनतेला देखील 'थर्ड अम्पायर'ची भूमिका निभावता येणार आहे. यामध्ये ग्राउंडवरील अम्पायरची भूमिका भलेही राजकीय नेते निभवत असतील, तरी अंतिम निर्णय मतदानाच्या माध्यमातून जनताच देणार आहे. यामुळे राजकीय पक्षांसमोर प्रगत तंत्रज्ञानाने अडचणच उभी केल्याचे अनेकांचे मत आहे.

अशक्यप्राय घोषणांवर येणार नियंत्रण

निवडणुका जिंकण्यासाठी अशक्यप्राय आश्वासनं देण्यास आता नेत्यांवर आपोआपच निर्बंध येणार आहेत. सध्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ होत आहे. हेच व्हिडिओ येणाऱ्या काळात नेत्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देणार आहे. त्यामुळे सहाजिकच नेत्यांचा खोटेपणा दिसून येण्याची शक्यता निर्माण होते. हे टाळण्यासाठी नेतेमंडळी वाटेल त्या घोषणा करणे टाळणार हे मात्र निश्चित.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी