शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आता निवडणुकीतही 'थर्ड अम्पायर' ! पुढाऱ्यांच्या अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 11:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ पूर्वी आणि सत्तेत आल्यानंतरचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. यातून काही व्हिडिओ काढून पंतप्रधान मोदींची त्यावेळची आणि आताची भूमिका यात पडलेला फरक दाखविण्यात येत आहे.

मुंबई - प्रगत तंत्रज्ञानामुळे क्रिकेट आणि विविध खेळांमध्ये पंचांचा निर्णय योग्य की आयोग्य हे पाहणे शक्य झाले. कालांतराने पंच अर्थात अम्पायर निर्णय देण्यास असमर्थ असेल किंवा त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्यास ते निर्णयाची जबाबदारी थर्ड अम्पायरकडे पाठवतात. थर्ड अम्पायर काळजीपूर्वी स्लो मोशनमध्ये व्हिडिओ पाहतात आणि त्यावर निर्णय देतात. तशीच काहीशी स्थिती आता राजकारणात देखील पाहायला मिळत आहे. यामध्ये 'थर्ड अम्पायर' जनता जरी असली तरी मुख्य अम्पायरची भूमिका राजकीय पुढारीच निभावत असल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ पूर्वी आणि सत्तेत आल्यानंतरचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. यातून काही व्हिडिओ काढून पंतप्रधान मोदींची त्यावेळची आणि आताची भूमिका यात पडलेला फरक दाखविण्यात येत आहे. ही बाब भाजपसाठी आणि भाजपच्या लोकसभा उमेदवारांसाठी अडचणीची ठरत आहे. तर विरोधकांकडून या व्हिडिओचा धारदार शस्त्राप्रमाणे वापर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारविरुद्ध यलगार पुकारला आहे. राज ठाकरे सध्या मोदींचे जुने व्हिडिओ दाखवून पुराव्यासह भाजपवर जाहीर सभांमधून घणाघाती टीका करत आहेत. त्यातच राज यांची भाषणे लाईव्ह असतात, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. राज यांनी मोदींच्या पूर्वीची भाषणे दाखविण्यास सुरुवात केल्यापासून भाजपविषयी चौकाचौकात चर्चा रंगत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील राज यांच्या भाषणांच्या क्लिप शेअर करण्यात येत आहे. हे सगळं व्हिडिओ तयार करणे सोपे झाल्यामुळे शक्य होत आहे. सध्या व्हिडिओ तयार करणे अवघड नसून मोबाईलच्या मदतीने देखील चांगल्या प्रतीचे रेकॉर्डींग करता येते. तसेच रेकॉर्डेड तो व्हिडिओ आपल्याकडे कायम ठेवता येतो.

व्हिडिओमुळे क्रिकेट सारख्या खेळात रिप्ले पाहून थर्ड अम्पायरला निर्णय देणे शक्य झाले. त्याप्रमाणे आता जुन्या व्हिडिओमुळे जनतेला देखील 'थर्ड अम्पायर'ची भूमिका निभावता येणार आहे. यामध्ये ग्राउंडवरील अम्पायरची भूमिका भलेही राजकीय नेते निभवत असतील, तरी अंतिम निर्णय मतदानाच्या माध्यमातून जनताच देणार आहे. यामुळे राजकीय पक्षांसमोर प्रगत तंत्रज्ञानाने अडचणच उभी केल्याचे अनेकांचे मत आहे.

अशक्यप्राय घोषणांवर येणार नियंत्रण

निवडणुका जिंकण्यासाठी अशक्यप्राय आश्वासनं देण्यास आता नेत्यांवर आपोआपच निर्बंध येणार आहेत. सध्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ होत आहे. हेच व्हिडिओ येणाऱ्या काळात नेत्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देणार आहे. त्यामुळे सहाजिकच नेत्यांचा खोटेपणा दिसून येण्याची शक्यता निर्माण होते. हे टाळण्यासाठी नेतेमंडळी वाटेल त्या घोषणा करणे टाळणार हे मात्र निश्चित.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी