शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वाऱ्याची दिशा ओळखूनच पवारांची माघार; मुख्यमंत्र्यांनी घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 18:53 IST

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत आज 'आजोबा' शरद पवार यांनी दिले.

ठळक मुद्दे'राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवारांची माघार हा भाजपा-शिवसेना युतीचा विजय'नातवासाठी आपण माघार घेणार असल्याचं शरद पवार यांनी सूचित केलं आहे.

'वारा कोणत्या दिशेने वाहतोय, हे शरद पवार अचूक ओळखतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. त्यानुसारच, वाऱ्याची दिशा ओळखून पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे', अशी टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवारांची माघार हा भाजपा-शिवसेना युतीचा विजय असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. 

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत आज 'आजोबा' शरद पवार यांनी दिले. एकाच कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवावी?, असा प्रश्न करत, नातवासाठी आपण माघार घेणार असल्याचंही त्यांनी सूचित केलं. स्वाभाविकच, शरद पवारांची माघार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

पुन्हा युतीचंच सरकार येईल आणि आपल्याला पंतप्रधान होता येणार नाही, याची जाणीव झाल्यानंच शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचा टोमणा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या निर्णयावर मारला. तर, माढा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव पाहूनच पवारांनी माघार घेतल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

शरद पवारांची माघार हा युतीचा मोठा विजय असल्याचं नमूद करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची हळूच फिरकी घेतली. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस