शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला २७१ जागा मिळल्यास आनंदच : राम माधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:04 IST

भारतीय जनता पक्षाला २७१ जागा मिळाल्यास आनंदच आहे. मात्र अशी शक्यता कमी असली तरी देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमतापासून दूर राहिल अशी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री अरुण जेठली भाजप पुन्हा स्पष्ट बहुमत मिळवले असं सांगत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला देखील लोकसभा निवडणुकीत नुकसान होण्याची चिंता सतावत असल्याचे समजते. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राम माधव बोलत होते.

यावेळी भारतीय जनता पक्षाला २७१ जागा मिळाल्यास आनंदच आहे. मात्र अशी शक्यता कमी असली तरी देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे. राम माधव म्हणाले की, भाजपला उत्तर भारतात नुकसान होण्याची शक्यता आहे. या भागात भाजपने २०१४ मध्ये विक्रमी कामगिरी केली होती. मात्र पूर्वोत्तर भारतातील ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला मदत होईल, असंही ते म्हणाले.

भाजप पुन्हा एकदा सत्तेत आल्यास आम्ही विकासाची धोरणे पुन्हा राबवू. यावेळी माधव यांनी पाकिस्तानचा मुद्दा देखील छेडला. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची भेट होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला उभय देशांतील संबंध सुधारण्यासाठी एका महिन्याचा कालावधी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान भाजपला स्वत:च्या बळावर बहुमतापर्यंत पोहचण्याविषयी माधव यांनी चिंता व्यक्त केल्याने अनेकांचा भूवया उंचावल्या आहेत. याआधी पंतप्रधान मोदींनी देशात २०१४ पेक्षा मोठी लाट असल्याचे म्हटले होते. परंतु, माधव यांनी व्यक्त केलेल्या अंदाजामुळे भाजपमध्ये अस्वस्थता तर नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा