शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भाजपला २७१ जागा मिळल्यास आनंदच : राम माधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:04 IST

भारतीय जनता पक्षाला २७१ जागा मिळाल्यास आनंदच आहे. मात्र अशी शक्यता कमी असली तरी देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमतापासून दूर राहिल अशी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री अरुण जेठली भाजप पुन्हा स्पष्ट बहुमत मिळवले असं सांगत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला देखील लोकसभा निवडणुकीत नुकसान होण्याची चिंता सतावत असल्याचे समजते. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राम माधव बोलत होते.

यावेळी भारतीय जनता पक्षाला २७१ जागा मिळाल्यास आनंदच आहे. मात्र अशी शक्यता कमी असली तरी देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे. राम माधव म्हणाले की, भाजपला उत्तर भारतात नुकसान होण्याची शक्यता आहे. या भागात भाजपने २०१४ मध्ये विक्रमी कामगिरी केली होती. मात्र पूर्वोत्तर भारतातील ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला मदत होईल, असंही ते म्हणाले.

भाजप पुन्हा एकदा सत्तेत आल्यास आम्ही विकासाची धोरणे पुन्हा राबवू. यावेळी माधव यांनी पाकिस्तानचा मुद्दा देखील छेडला. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची भेट होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला उभय देशांतील संबंध सुधारण्यासाठी एका महिन्याचा कालावधी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान भाजपला स्वत:च्या बळावर बहुमतापर्यंत पोहचण्याविषयी माधव यांनी चिंता व्यक्त केल्याने अनेकांचा भूवया उंचावल्या आहेत. याआधी पंतप्रधान मोदींनी देशात २०१४ पेक्षा मोठी लाट असल्याचे म्हटले होते. परंतु, माधव यांनी व्यक्त केलेल्या अंदाजामुळे भाजपमध्ये अस्वस्थता तर नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा