शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

श्रमलेल्या बापाची बुलंद कहाणी... आजूबाजूच्या जागांवर सोडलं पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 06:08 IST

भाजपची व्यूहरचना यशस्वी; पवारांना अडकवले बालेकिल्ल्यातच

- सचिन जवळकोटेराष्ट्रवादीची खरी ताकद म्हणजे केवळ शरद पवार. त्यामुळं या ‘पॉवर’बाज नेत्याला बारामतीतच अडकवून ठेवून बाकीच्या मतदारसंघांवर आक्रमण करण्याचा ‘भाजप’ नेत्यांचा मनसुबा प्रत्यक्षात उतरला गेला. पवारांच्या आघाडीतील सोलापूर, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली अन् उस्मानाबादच्या उमेदवारांना याचा नेमका फटका बसला. गेलेल्या जागा मिळवणं तर सोडाच, हातातल्याही गमवाव्या लागल्या.

बारामतीच्या विजयानंतर सुप्रियातार्इंनी ‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी’ कविता सोशल मीडियावर सादर केली असली तरी ‘आजूबाजूच्या मतदारसंघावर सोडावं लागलं पाणी..’ हे पुढचं वाक्य मात्र कार्यकर्त्यांसाठी गुपितच ठरलेलं.प्रत्येक तालुक्यातील मातब्बर नेत्याला आपल्यासोबत ठेवून त्या-त्या जिल्ह्याचं राजकारण यशस्वीपणे हाकणाऱ्या शरद पवारांची काही गणितं यंदाच्या लोकसभेला भलतीच चुकली. त्यामुळं निकालाची समीकरणं पार बदलून गेली. पवार भलेही अवघ्या महाराष्ट्राच्या जीवावर देशाचं नेतृत्व करू पाहत असले तरी त्यांची खरी ताकद केवळ पश्चिम महाराष्ट्रातच.

गेल्यावेळी २०१४ साली त्यांचे चार खासदार निवडून आलेले. त्यापैकी माढ्यात मोहिते-पाटील, साताºयात उदयनराजे अन् कोल्हापुरात महाडिक स्वत:च्या ताकदीवरच निवडून आलेले. बारामतीच्या सुप्रियातार्इंचा कसाबसा निसटता विजय. कोल्हापूर अन् माढाही हातातून गमवावं लागलं.महाराष्टÑात काँग्रेसपेक्षाही राष्टÑवादीच आपल्याला अधिक त्रासदायक ठरतेय, हे अचूक ओळखलेल्या भाजप नेत्यांनी यंदा पवारांच्या बालेकिल्ल्यावरच तुफानी मारा केला. चंद्रकांतदादा पाटील कोल्हापुरात नसतील एवढे ते माढा अन् बारामतीत फिरले. मुख्यमंत्री फडणवीसही मुंबईत बसूनच इथल्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात राहून व्यूहरचना आखत गेले. पवारांना बारामतीतच पॅक केलं तर बाकी ठिकाणी त्यांना प्रचारासाठी बाहेर पडता येणार नाही, याचा पुरेपूर बंदोबस्त केला गेला.दौंडचे कूल, अकलूजचे मोहिते-पाटील अन् इंदापूरचे हर्षवर्धन बंधू यांच्या गुफ्तगूचे फोटो पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘बारामती’ अधिकच सावध बनली. सतर्क झाली. गेल्यावेळी झालेल्या चुका दुरुस्त करण्यावर अधिक भर दिला गेला... अन् याच व्यूहरचनेत माढ्याचे उमेदवार संजयमामा शिंदे अडकले. राष्ट्रवादीचा बुलंद बालेकिल्ला पाहता पाहता ढासळला. रामराजे, बबनदादा शिंदे, प्रभाकर देशमुख अन् गणपतराव देशमुख यांच्या तालुक्यातील साम्राज्याचे बुरुज खिळखिळे झाले. कारण या टापूत भाजपला प्रथमच एवढी भरभरून मतं मिळाली.
च्स्वत: शरद पवार बारामतीच्या प्रचार यंत्रणेवर काळजीपूर्वक लक्ष देऊ लागले. याचा व्हायचा तो परिणाम बरोबर झाला. ज्या पद्धतीनं पवारांनी महाराष्ट्रभर नेहमीप्रमाणं झंझावाती दौरे आखायला हवे होते, ते अपेक्षेप्रमाणे घडलेच नाही.च्अशातच दर चार-पाच दिवसाला भाजप-सेनेची टीम आलटून-पालटून ‘तार्इंचा पराभव’ या मुद्यावर जोरजोरात चॅलेंज देऊ लागली. बारामतीवर राजकीय बॉम्ब टाकला तर त्याचा धुरळा आजूबाजूच्या मतदारसंघात उडू शकतो,हे या मंडळींनी अचूक ओळखलेलं..

टॅग्स :baramati-pcबारामती